शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार तरी कधी ?

By admin | Updated: May 2, 2017 22:29 IST

यंदाच्या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.

मयूर देवकर/ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 2 - यंदाच्या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठीजनांच्या पदरी निराशा पडली. महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त लागोपाठ तिसऱ्यांदा हुकला. त्यामुळे अभिजात भाषेचा दर्जा मिळणार तरी कधी? असा संतप्त सवाल मराठी सारस्वतांकडून विचारला जात आहे.अभिजात दर्जाच्या मुद्द्याची गत आता लांडगा आला रे आलाप्रमाणे झाली असून, दरवर्षी जागतिक मराठी दिन किंवा महाराष्ट्र दिन जवळ येताच सर्वांना याचे वेध लागतात. सर्व पुराव्यांसह अहवाल सादर केल्यानंतरही केवळ राजकीय अनास्था व उदासीनतेमुळे हा मुद्दा गेली चार वर्षे औपचारिकतेच्या सोपस्कारामध्ये अडकला आहे. राज्य शासन गठीत अभिजात मराठी भाषा समितीने तयार केलेल्या अहवालास अकादमीच्या भाषा समितीने एकमताने सकारात्मक लेखी अभिप्राय देऊन २०१५ साली तो केंद्र सरकारकडे वर्ग केला. दर्जा देण्याच्या विरोधात वकील आर. गांधी यांनी मद्रास उच्च न्यायालयात दाखल के लेल्या याचिकेमुळे दोन वर्षांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी हा निर्णय प्रलंबित होता. गेल्या मार्च महिन्यात मद्रास उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आणि महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधून केंद्र सरकार दर्जाची घोषणा करेल, अशी आस निर्माण झाली होती.केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असूनही मराठीला दर्जा मिळवण्यास एवढा विलंब होतो म्हटल्यावर पराकोटीची राजकीय अनास्था याखेरीज दुसरे काय म्हणणार, असे निराशायुक्त उद्गार अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे यांनी लोकमतशी बोलताना काढले. संपूर्ण भारतभर मराठी माणसे विखुरलेली आहेत. आपापल्या परीने ही लाखो मंडळी आजही मराठी जिवंत ठेवून आहेत. अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर भाषा संवर्धनासाठी आर्थिक पाठबळ मिळेलच परंतु या सर्व लोकांना जोडण्यास खूप मदत होईल. तसेच विविध बोलींचे कोश करण्याचे काम पूर्ण होऊ शकेल. मराठी भाषिकांचा आत्मविश्वास वाढेल हे वेगळे सांगायला नको, असे ते म्हणाले.दिल्लीवर मोर्चा काढा!राजकीय यंत्रणेवर दबाव निर्माण करण्यासाठी आता जनसामान्यांनाच पुढाकार घेण्याची गरज आली आहे. साहित्य संस्था, बुद्धिवंत, भाषाप्रेमी आणि माध्यमांनी एकत्र येऊन शासन दरबारी आवाज चढवला तर कदाचित काही फरक पडेल. दिल्लीत जाऊन मोर्चा काढला पाहिजे, असे प्रा. पठारे म्हणाले. एवढे मुहूर्त चुकवले आता बस! उगीच एखाद्या औचित्याची वाट पाहणे सोडा आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा घोषित करावा. त्यासाठी चांगल्या मुहूर्ताची प्रतीक्षा करण्याची वेळ आता सरून गेली, अशी प्रतिक्रिया कवी दासू वैद्य यांनी व्यक्त केली.छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी महाराष्ट्राला नेहमीच केंद्राशी झगडावे लागले आहे. आपले शासनकर्तेही यामध्ये कमी पडतात. आता सर्वसामान्य जनतेनेच त्यांना जाब विचारला पाहिजे.- प्रा. रंगनाथ पठारे, ज्येष्ठ साहित्यिकसर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करूनही आमच्या हक्काची मागणी मिळू नये याला काय म्हणायचे? जबरदस्तीने दर्जाची मागणी नाही करीत आहोत. विधायक मार्गानेच पण जलद दर्जा हवा.- दासू वैद्य, कवी