शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार तरी कधी ?

By admin | Updated: May 2, 2017 22:29 IST

यंदाच्या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.

मयूर देवकर/ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 2 - यंदाच्या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठीजनांच्या पदरी निराशा पडली. महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त लागोपाठ तिसऱ्यांदा हुकला. त्यामुळे अभिजात भाषेचा दर्जा मिळणार तरी कधी? असा संतप्त सवाल मराठी सारस्वतांकडून विचारला जात आहे.अभिजात दर्जाच्या मुद्द्याची गत आता लांडगा आला रे आलाप्रमाणे झाली असून, दरवर्षी जागतिक मराठी दिन किंवा महाराष्ट्र दिन जवळ येताच सर्वांना याचे वेध लागतात. सर्व पुराव्यांसह अहवाल सादर केल्यानंतरही केवळ राजकीय अनास्था व उदासीनतेमुळे हा मुद्दा गेली चार वर्षे औपचारिकतेच्या सोपस्कारामध्ये अडकला आहे. राज्य शासन गठीत अभिजात मराठी भाषा समितीने तयार केलेल्या अहवालास अकादमीच्या भाषा समितीने एकमताने सकारात्मक लेखी अभिप्राय देऊन २०१५ साली तो केंद्र सरकारकडे वर्ग केला. दर्जा देण्याच्या विरोधात वकील आर. गांधी यांनी मद्रास उच्च न्यायालयात दाखल के लेल्या याचिकेमुळे दोन वर्षांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी हा निर्णय प्रलंबित होता. गेल्या मार्च महिन्यात मद्रास उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आणि महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधून केंद्र सरकार दर्जाची घोषणा करेल, अशी आस निर्माण झाली होती.केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असूनही मराठीला दर्जा मिळवण्यास एवढा विलंब होतो म्हटल्यावर पराकोटीची राजकीय अनास्था याखेरीज दुसरे काय म्हणणार, असे निराशायुक्त उद्गार अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे यांनी लोकमतशी बोलताना काढले. संपूर्ण भारतभर मराठी माणसे विखुरलेली आहेत. आपापल्या परीने ही लाखो मंडळी आजही मराठी जिवंत ठेवून आहेत. अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर भाषा संवर्धनासाठी आर्थिक पाठबळ मिळेलच परंतु या सर्व लोकांना जोडण्यास खूप मदत होईल. तसेच विविध बोलींचे कोश करण्याचे काम पूर्ण होऊ शकेल. मराठी भाषिकांचा आत्मविश्वास वाढेल हे वेगळे सांगायला नको, असे ते म्हणाले.दिल्लीवर मोर्चा काढा!राजकीय यंत्रणेवर दबाव निर्माण करण्यासाठी आता जनसामान्यांनाच पुढाकार घेण्याची गरज आली आहे. साहित्य संस्था, बुद्धिवंत, भाषाप्रेमी आणि माध्यमांनी एकत्र येऊन शासन दरबारी आवाज चढवला तर कदाचित काही फरक पडेल. दिल्लीत जाऊन मोर्चा काढला पाहिजे, असे प्रा. पठारे म्हणाले. एवढे मुहूर्त चुकवले आता बस! उगीच एखाद्या औचित्याची वाट पाहणे सोडा आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा घोषित करावा. त्यासाठी चांगल्या मुहूर्ताची प्रतीक्षा करण्याची वेळ आता सरून गेली, अशी प्रतिक्रिया कवी दासू वैद्य यांनी व्यक्त केली.छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी महाराष्ट्राला नेहमीच केंद्राशी झगडावे लागले आहे. आपले शासनकर्तेही यामध्ये कमी पडतात. आता सर्वसामान्य जनतेनेच त्यांना जाब विचारला पाहिजे.- प्रा. रंगनाथ पठारे, ज्येष्ठ साहित्यिकसर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करूनही आमच्या हक्काची मागणी मिळू नये याला काय म्हणायचे? जबरदस्तीने दर्जाची मागणी नाही करीत आहोत. विधायक मार्गानेच पण जलद दर्जा हवा.- दासू वैद्य, कवी