शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

मराठी शाळांना ‘अच्छे दिन’!

By admin | Updated: October 3, 2016 05:10 IST

गेल्या काही वर्षांपासून मराठी माध्यमातून इंग्रजी माध्यम शाळांमध्ये स्थलांतरित होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत होती

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून मराठी माध्यमातून इंग्रजी माध्यम शाळांमध्ये स्थलांतरित होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत होती. मात्र गेल्या शैक्षणिक वर्षात मराठी माध्यम शाळांत इंग्रजी माध्यमातून प्रवेश बदल केलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या शैक्षणिक वर्षात एकूण १४ हजार ६४७ विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमातून मराठी माध्यमात प्रवेश बदल केला आहे. मराठी आणि शासकीय शाळांबाबत सुरू असलेल्या जनजागृतीचा परिणाम म्हणून मराठी शाळांकडे पालकांचा ओढा वळू लागला आहे. मराठी व जिल्हा परिषदांच्या शाळांमध्येही गुणवत्ता दिसून आल्याने हजारो पालकांनी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत घालायला सुरूवात केली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्यासाठी शिक्षकांनी खूप मेहनत घेतली आहे. शासकीय मदतीअभावी अनेक शाळांची गुणवत्ता सुधारण्याचे काम शिक्षक करत आहेत. शैक्षणिक गुणवत्तेसाठीचे कार्यक्रमही यशस्वी ठरत आहेत. राज्याच्या शैक्षणिक प्रगतीसह शिक्षकांच्या हितासाठी ही मोठी बाब ठरेल, असे मत शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)>ही तर सुरुवात...गेल्या दोन वर्षांत शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात गुणवत्ता सुधारण्यासाठी केलेल्या अनेक उपक्रमांचे हे यश आहे. त्यामुळेच इंग्रजी माध्यम शाळांतील मुले जिल्हा परिषद शाळांमध्ये दाखल होत आहेत. भविष्यात हे प्रमाण अधिक वाढेल, अशी प्रतिक्रिया शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली.>पुणे जिल्हा आघाडीवरइंग्रजीतून मराठी शाळांत प्रवेश बदल करण्यात पुणे जिल्हा आघाडीवर आहे. एकट्या पुणे जिल्ह्णातील एकूण ३ हजार ७७९ विद्यार्थ्यांनी प्रवेश बदल केला आहे.त्याखालोखाल औरंगाबाद जिल्ह्यात २ हजार ०८०, अहमदनगर जिल्ह्यातील १ हजार ९८०, बुलढाणा जिल्ह्यात ८७९, नागपूर जिल्ह्यात ६९० आणि वर्धा जिल्ह्यातील ५४९ विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमातून मराठी शाळांत प्रवेश घेतला आहे.