शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
2
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
3
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
4
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
5
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
6
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
7
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
8
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
9
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
10
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
11
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?
12
एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ मधल्या फळीतील फलंदाज!
13
मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती;२००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा
14
Pitru Paksha 2025: पितृपक्षाची सुरुवात कोणी व कोणासाठी केली? प्रत्येकाला हे माहीत असलेच पाहिजे!
15
अफगाणिस्तानात भूकंप आला त्यात फक्त पुरुषांना वाचवलं, महिलांना नाही; कारण ऐकून धक्का बसेल
16
शाब्बास हरभजन सिंग!! पूरग्रस्तांसाठी दिल्या ११ बोटी, ३ रूग्णवाहिका; ५० लाखांचा निधीही जमवला
17
सोशल मीडिया स्टारला करायचंय लग्न, सुयोग्य 'वर' शोधून देणाऱ्यास मिळणार ८८ लाख! पण...
18
बायको असावी तर अशी! 'सावित्री' घेतेय सत्यवानाची मुलासारखी काळजी; डोळे पाणावणारा Video
19
सणासुदीपूर्वी स्वस्त झालं सोनं, एकाच दिवसात मोठी घसरण; चांदीचे दरही घसरले, जाणून घ्या
20
Pitru Paksha 2025: पितृपक्षात आमसुलाच्या चटणीशिवाय नैवेद्याला पूर्णत्त्व नाही; वाचा महत्त्व आणि रेसिपी

मराठी माणसांना हद्दपार करण्याचा डाव

By admin | Updated: August 14, 2016 03:21 IST

गिरणी कामगारांना मिळणाऱ्या घरांवर दलालांचा डोळा आहे. त्यांच्याकडून ही घरे विकत घेऊन मराठी माणसांना मुंबईतून हद्दपार करण्याचा डाव असून तो हाणून पाडावा, असे आवाहन

मुंबई : गिरणी कामगारांना मिळणाऱ्या घरांवर दलालांचा डोळा आहे. त्यांच्याकडून ही घरे विकत घेऊन मराठी माणसांना मुंबईतून हद्दपार करण्याचा डाव असून तो हाणून पाडावा, असे आवाहन शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केले. वरळी येथील आचार्य अत्रे चौकातील पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण व सुशोभीकरणाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. ‘मराठी मातीसाठी आवाज उठविणारे आचार्य अत्रे हे खऱ्या अर्थाने योद्धा होते, त्यांचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर झालेला वाद हा दुर्दैवी होता,’ अशी खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. यावेळी महापौर स्नेहल आंबेकर, शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई,शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, ‘पुन्हा एकदा मराठी माणसांना मुंबईतून हद्दपार करण्याचा डाव दलालांकडून आखला जात आहे. ज्या गिरणी कामगारांना म्हाडा किंवा इतर माध्यमांतून मुंबईत घरे मिळाली, त्या कामगारांच्या मागे दलालांनी तगादा लावला आहे. कामगारांची इच्छा नसतानाही घर विकण्याचा आग्रह धरला जात आहे. मात्र गिरणी कामगारांनी दलालांना बळी पडू नये. या दलालांचा बंदोबस्त शिवसेना आपल्या पद्धतीने करेल. अत्रे आणि ठाकरे कुटुंबीयांचे पूर्वीपासून ऋणानुबंध आहेत. लिहिणारे खूप असतात पण आचार्य अत्रे यांच्यासारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या सिद्धहस्त लेखणीतून जे काही उतरले ते महत्त्वाचे आहे. भावी पिढीपर्यंत ते पोहोचले पाहिजे आणि संयुक्त महाराष्ट्राचा लढा, त्यांना कळला पाहिजे,’ असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)पुतळ्याचे अनावरण...वरळी येथील आचार्य अत्रे चौकातील पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, महापौर स्नेहल आंबेकर, शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई, शिक्षणमंत्री विनोद तावडे उपस्थित होते.