शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
7
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
8
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
9
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
10
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
11
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
12
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
13
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
14
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
15
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
18
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
19
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
20
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...

मराठी माणूस हद्दपार होतोय!

By admin | Updated: November 23, 2015 02:22 IST

मुंबापुरीतूनच मराठी माणूस हद्दपार होत चालला आहे, अशी खंत व्यक्त करत नव्या पिढीतील साहित्यिकांनीही मुंबईचे बदलते विदारक चित्र साहित्यातून मांडले पाहिजे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य नगरी मुंबापुरीतूनच मराठी माणूस हद्दपार होत चालला आहे, अशी खंत व्यक्त करत नव्या पिढीतील साहित्यिकांनीही मुंबईचे बदलते विदारक चित्र साहित्यातून मांडले पाहिजे, असे मत पानिपतकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.कोकण मराठी साहित्य परिषदेच्या १६ व्या कोकण मराठी साहित्य संमेलनाची सांगता रविवारी झाली, या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. या वेळेस संमेलनाध्यक्ष जयंत पवार, स्वागताध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, कोमसापचे केंद्रीय अध्यक्ष डॉ.महेश केळुसकर, डॉ.बाळ फोंडके, सारस्वत बँकेचे उपाध्यक्ष गौतम ठाकूर, उपमहापौर अलका केरकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी हल्ली जगण्यापेक्षा मार्केटिंगला महत्त्व येत आहे, असे म्हणत ‘मेंटेनन्स’नावाचा राक्षस मराठी माणसाला गिळत चालला आहे, अशी खंत व्यक्त केली.१६ व्या कोकण मराठी साहित्य संमेलनात समारोप समारंभाचे प्रास्ताविक करताना ‘कोमसाप’चे केंद्रीय अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर म्हणाले की, ‘हे संमेलन यशस्वी करण्यासाठी कोमसापच्या कुटुंबाने एकत्रितरीत्या मेहनत केली आहे.’ या संमेलनाचा राज्यातील, देशातील आणि परदेशातील जवळपास ८ लाख ७० हजार साहित्यरसिकांनी आस्वाद घेतल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली. या प्रसंगी नाट्यसंमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांचा सत्कार करण्यात आला. मालवणीतून सुरुवात : सत्काराला उत्तर देताना गवाणकरांनी अस्सल मालवणीत भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले की, ‘कोकणातल्या माणसाची खासियत आहे, खिशात पैसे असो वा नसो, पण सगळे दणक्यात करुन दाखवतात, तसेच हे संमेलनही कोमसापने दणक्यात करुन दाखवले आहे.’