शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

मराठी माणूस हद्दपार होतोय!

By admin | Updated: November 23, 2015 02:22 IST

मुंबापुरीतूनच मराठी माणूस हद्दपार होत चालला आहे, अशी खंत व्यक्त करत नव्या पिढीतील साहित्यिकांनीही मुंबईचे बदलते विदारक चित्र साहित्यातून मांडले पाहिजे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य नगरी मुंबापुरीतूनच मराठी माणूस हद्दपार होत चालला आहे, अशी खंत व्यक्त करत नव्या पिढीतील साहित्यिकांनीही मुंबईचे बदलते विदारक चित्र साहित्यातून मांडले पाहिजे, असे मत पानिपतकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.कोकण मराठी साहित्य परिषदेच्या १६ व्या कोकण मराठी साहित्य संमेलनाची सांगता रविवारी झाली, या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. या वेळेस संमेलनाध्यक्ष जयंत पवार, स्वागताध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, कोमसापचे केंद्रीय अध्यक्ष डॉ.महेश केळुसकर, डॉ.बाळ फोंडके, सारस्वत बँकेचे उपाध्यक्ष गौतम ठाकूर, उपमहापौर अलका केरकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पाटील यांनी हल्ली जगण्यापेक्षा मार्केटिंगला महत्त्व येत आहे, असे म्हणत ‘मेंटेनन्स’नावाचा राक्षस मराठी माणसाला गिळत चालला आहे, अशी खंत व्यक्त केली.१६ व्या कोकण मराठी साहित्य संमेलनात समारोप समारंभाचे प्रास्ताविक करताना ‘कोमसाप’चे केंद्रीय अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर म्हणाले की, ‘हे संमेलन यशस्वी करण्यासाठी कोमसापच्या कुटुंबाने एकत्रितरीत्या मेहनत केली आहे.’ या संमेलनाचा राज्यातील, देशातील आणि परदेशातील जवळपास ८ लाख ७० हजार साहित्यरसिकांनी आस्वाद घेतल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली. या प्रसंगी नाट्यसंमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांचा सत्कार करण्यात आला. मालवणीतून सुरुवात : सत्काराला उत्तर देताना गवाणकरांनी अस्सल मालवणीत भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले की, ‘कोकणातल्या माणसाची खासियत आहे, खिशात पैसे असो वा नसो, पण सगळे दणक्यात करुन दाखवतात, तसेच हे संमेलनही कोमसापने दणक्यात करुन दाखवले आहे.’