शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
2
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
3
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
4
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
5
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
8
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
9
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
10
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
11
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
14
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
15
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
16
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
17
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
18
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
19
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
20
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार

केंद्रीय अभ्यासक्रमांमध्ये मराठीची सक्ती - शिक्षणमंत्री

By admin | Updated: March 12, 2016 04:21 IST

आयजीसीएसई, आयबी या केंद्रीय अभ्यासक्रमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत मराठी भाषा शिकविणे बंधनकारक करण्यात आले आहे, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत सांगितले.

मुंबई : आयजीसीएसई, आयबी या केंद्रीय अभ्यासक्रमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत मराठी भाषा शिकविणे बंधनकारक करण्यात आले आहे, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत सांगितले. केंद्रीय अभ्यासक्रमाच्या शाळांना राज्याच्या शिक्षण विभागातर्फे दर तीन वर्षांनी ना हरकत प्रमाणपत्र देताना त्यांच्या पहिली ते सातवीपर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये मराठी भाषा विषयाचे बंधन घालूनच असे प्रमाणपत्र दिले जात आहे, असे तावडे यांनी स्पष्ट केले. या शाळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करावा, असा राज्य विधिमंडळाचा ठराव केंद्र सरकारकडे लवकरच पाठविण्यात येईल, असे तावडे म्हणाले. पूर्व प्राथमिक शाळांवर (नर्सरी) शिक्षण विभागाचे नियंत्रण नसते. त्यामुळे त्यांच्या फीवरही अंकुश लावता येत नाही, अशी कबुली त्यांनी दिली. या शाळा शिक्षण विभागाच्या अखत्यारीत आणण्याची मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख आदींनी केली. वर्षा गायकवाड, देवयानी फरांदे, राधाकृष्ण विखे-पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. पूर्व प्राथमिक शाळा शिक्षण विभागाच्या अखत्यारीत घेण्याबाबत विचार केला जाईल. त्याच्या आर्थिक उत्तरदायित्वाचा विचार करूनच निर्णय घ्यावा लागेल, असे तावडे म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)शाळाबाह्य मुले दाखवा हजार रुपये मिळवाराज्यात शाळाबाह्य मुले-मुली दाखवा आणि १ हजार रुपये मिळवा, अशी योजना लवकरच सुरू केली जाईल, असे तावडे यांनी जाहीर केले. यातील ७५० रुपये शिक्षणाधिकारी तर २५० रुपये आपण स्वत:च्या खिशातून देऊ, असे ते म्हणाले. राज्यात ‘लेक शिकवा’ योजनेकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राजेश टोपे, दिलीप वळसे-पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. कस्तुरबा बालिका विद्यालयांवर संक्रांतशाळाबाह्य मुलींसाठी चालविण्यात येत असलेली कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये बंद करणार की नाही, याबाबत तावडे यांनी कोणतेही ठोस उत्तर दिले नाही. या मुलींची पर्यायी दर्जेदार शिक्षणाची सोय होत असेल तर विचार करावा लागेल, असे ते म्हणाले. त्यामुळे या विद्यालयांच्या राज्यातील भवितव्याबाबतची अनिश्चितता कायम असल्याचे स्पष्ट झाले.