शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

मराठय़ांना स्वकियांविरोधातच लढावे लागेल !

By admin | Updated: October 13, 2016 03:16 IST

अकोला येथील धम्मचक्र प्रवर्तन सोहळय़ात अँड. प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन; मराठा मोर्चाची दिशा कायम ठेवण्याचे आवाहन.

अकोला, दि. १२- मराठा समाजाचे मोर्चे कौतुकास्पद आहेत. समाज विकासाच्या मागण्याही रास्त आहेत. मात्र, समाजाच्या या परिस्थितीला जबाबदार कोण, याचा शोध घेतल्यास स्वकियांविरोधातच लढा द्यावा लागणार आहे. त्यासाठी मराठा समाज तयार आहे का? असा प्रश्न उपस्थित करीत विषमतावाद्यांकडून समूहमन कलुषित करून मोर्चाच्या निमित्ताने भरकटवले जात आहे. या स्थितीत संयमाने मोर्चाची दिशा कायम ठेवण्याचे आवाहनही अँड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले. धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवानिमित्त भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने अकोल्यात आयोजित धम्म मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र दारोकार गुरुजी, तर मंचावर चैत्यभूमीचे व्यवस्थापक भन्ते बी. संघपाल यांच्यासह भारिप-बमसंचे पदाधिकारी उपस्थित होते. अँड आंबेडकर म्हणाले की, शेतीचे प्रश्न सुटायला हवेत. त्यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी तयार केलेली बाजार समिती, पर्यायी बाजार व्यवस्था शेतकर्‍यांसाठी हिताची होती. आता ती ताब्यात असणार्‍यांनी शेतकर्‍यांच्या लुटीची व्यवस्था केली आहे. ही व्यवस्थाही बदलावी लागणार आहे. शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी भावाने शेतमाल खरेदी करणार्‍यांविरोधात बाजार समितीने शेतकर्‍यांची तक्रार घ्यायला हवी. त्यामध्ये व्यापारी दोषी आढळल्यास त्याला किमान सात वर्ष शिक्षा आणि त्याची संपत्ती जप्त करण्याची मागणी मराठा समाजाने मोर्चात करावी, ती मान्य झाल्यास शेतकर्‍यांचे अर्धे दु:ख क्षणात नाहिसे होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. त्यासाठी जुन्या मानसिकतेतून बाहेर यावे लागणार आहे. जातीसाठी माती खाण्याऐवजी समप्रश्नी लोकांसाठी लढण्याची तयारी करावी लागेल, असे ते म्हणाले. आरक्षणाच्या माध्यमातून विकास होईल, असे मानले तर अनेक जाती आरक्षण मागत आहेत. आरक्षणाच्या कमी जागांसाठी भांडणारांची संख्या वाढत आहे. त्यातून नोकरी, बेरोजगारीची समस्या संपूर्ण सुटणार आहे का, याचा विचारही व्हायला हवा. मराठा समाजाच्या मोर्चाने शासन कोंडीत सापडले आहे. ही वेळ साधली पाहिजे. त्याउलट जातीय दंगली भडकवून हाताला काहीच लागणार नाही. सरकारला जबाबदारीतून सुटण्याची संधी देऊ नका, समाजाचे दु:ख सरकार सोडवेल, असे नाही. त्यासाठी शासनाला मनुवाद सोडून मानवतावाद स्वीकारावा लागेल, ते शासनाला शक्य नाही. त्यासाठी शांतता आणि संयम ठेवा, समूहातील संवाद कायम ठेवा, भिंती उभारणार्‍यांना ओळखा, असेही अँड. आंबेडकर म्हणाले.