शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

मराठा आरक्षण सुनावणी पुन्हा लांबली

By admin | Updated: October 14, 2016 03:48 IST

मराठा आरक्षणासंबंधी अतिरिक्त प्रतिज्ञापत्रे आणि अन्य काही कागदपत्रे सादर करण्यासाठी आणखी काही दिवसांचा वेळ देण्याची राज्य सरकारची विनंती उच्च न्यायालयाने गुरुवारी मान्य

मुंबई : मराठा आरक्षणासंबंधी अतिरिक्त प्रतिज्ञापत्रे आणि अन्य काही कागदपत्रे सादर करण्यासाठी आणखी काही दिवसांचा वेळ देण्याची राज्य सरकारची विनंती उच्च न्यायालयाने गुरुवारी मान्य केली. सरकारसह सर्वच पक्षकारांना प्रतिज्ञापत्रे करण्याची शेवटची संधी देत मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर येत्या ७ डिसेंबरपासून अंतिम सुनावणी सुरू होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.गुरुवारी हे प्रकरण अंतिम सुनावणीची तारीख ठरविण्यासाठी न्या. अनूप मोहता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे आले होते. ३० सप्टेंबर रोजी न्यायालयाने सर्व वादी-प्रतिवादींना आपापली प्रतिज्ञापत्रे, पुरवणी प्रतिज्ञापत्रे तसेच संक्षेपात लेखी कायदेशीर युक्तिवादाचे मुद्दे सादर करण्यास सांगितले होते. सरकारला खंडपीठाने वेळ दिली, पण त्याचबरोबर प्रतिज्ञापत्र व लेखी स्वरूपात युक्तिवाद सादर करण्यासाठी सरकारला आतापर्यंत पुरेसा वेळ देण्यात आला आहे; शिवाय सर्वोच्च न्यायालयाने या याचिकांवरील सुनावणी जलदगतीने घेण्याची सूचना केली असल्याची आठवणही करून दिली. सरकारतर्फे आणखी वेळ देण्याची विनंती करताना ज्येष्ठ वकील विजय एम. थोरात म्हणाले की, सरकारला आरक्षणाच्या निर्णयाच्या समर्थनार्थ आणखी काही कागदपत्रे सादर करायची आहेत. शिवाय ज्यांनी या सुनावणीत सहभागी होण्यासाठी अर्ज केले आहेत त्यांच्या उत्तराची प्रतिज्ञापत्रेही करायची आहेत.या मागणीचे तपशीलवार कारण देताना अ‍ॅड. थोरात म्हणाले की, अनेक जातींचा मिळून मराठा समाज निर्माण झाला आहे. जातीनिहाय जनगणना करण्याची पद्धत केंद्र सरकारने थांबवल्याने मराठा समाजाची निश्चित आकडेवारी काढणे कठीण झाले आहे. ती आकडेवारी काढण्याचे काम सुरू आहे. यावर, सरकार मुद्दाम विलंब करत आहे, असा सूर मराठा आरक्षणाविरोधी व आरक्षणाचे समर्थन करणाऱ्या याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी आळवला. तर, आता आकडेवारी गोळा करून तुम्ही काय करणार आहात, असे न्या. कुलकर्णी यांनी विचारले. मात्र सरकारची विनंती मान्य करत न्या. मोहता म्हणाले, या टप्प्प्यावर सरकारवर विश्वास ठेवण्याशिवाय आमच्याकडे अन्य कोणताच पर्याय उपलब्ध नाही. त्याशिवाय अशा प्रकारच्या याचिकांवर सुनावणी करताना त्या समाजाची आकडेवारी उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकारला त्यांचे काम करू द्यायला हवे. साहाजिकच, सरकारला या गुंतागुंतीच्या विषयावर खूप काही मांडायचे असेल. त्यामुळे सरकारला त्यांचे सर्व म्हणणे मांडण्यासाठी वेळ देत आहोत. मात्र ही अखेरची संधी असेल. युक्तिवाद सुरू झाला की आम्ही त्यांच्या सगळया दाव्यांची पडताळणी करू, असेही खंडपीठाने बजावले. या सुनावणीत सरकारतर्फे ज्येष्ठ वकील थोरात यांच्यासह ज्येष्ठ वकील रवी कदम व सरकारी वकील अभिनंदन वाग्यानी काम पाहात आहेत.. (प्रतिनिधी)