शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
2
‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर
3
६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्नेहाचा मृतदेह सापडला; आई-वडिलांचा टाहो, मैत्रिणीचा मोठा दावा
4
Good Luck Cafe: बन मस्क्यामध्ये काचेचे तुकडे; एफ. सी. रोडवरील गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित
5
Accident: आंब्याने भरलेली लॉरी मिनी ट्रकवर उलटली; ९ जण ठार, अनेकजण जखमी!
6
गृहप्रवेशानंतर नववधू चक्कर येऊन पडली, पतीने थेट प्रेग्नन्सी टेस्ट किटच आणली! चिडलेल्या नवरीने काय केलं वाचाच... 
7
Pravin Gaikwad : 'माझ्या हत्येचा कट होता, याला पूर्णपणे सरकार जबाबदार'; प्रवीण गायकवाडांचा आरोप
8
स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्याने अंत्यविधीस परवानगी नाकारली; भरपावसात डिझेल ओतून पेटवली चिता
9
नवी मुंबई: बेलापूरमधील पारसिक टेकडीवर भूस्खलन; मातीच्या ढिगाऱ्यासह झाडे उन्मळून पडली
10
Anthem Biosciences IPO आजपासून गुंतवणुकीसाठी खुला; कधीपर्यंत आणि किती करावी लागेल गुंतवणूक, GMP किती?
11
मनसेचे २ दिवसीय शिबिर, ठाकरे बंधू युतीवर भूमिका ठरणार; राज ठाकरे काय देणार 'कानमंत्र'?
12
'ते गप्पा चांगल्या मारतात, पण रात्रीच्या अंधारात लोकांवर बॉम्ब टाकतात', ट्रम्प पुतीन यांच्यावर भडकले
13
अरे देवा! आई वारंवार भेंडीची भाजी बनवायची म्हणून लेक चिडला, १२०० किमी दूर पळून गेला अन्...
14
नोकरीसाठी डिग्री आणि सीव्हीची गरज नाही! थेट १ कोटी रुपयांचं पॅकेज, फक्त 'या' २ अटी पूर्ण करा
15
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
16
रशियाकडून क्रुड ऑईलची विक्रमी आयात; पेट्रोलियम मंत्री म्हणाले, "भारताचं ऊर्जा धोरण कोणत्याही दबावाखाली..."
17
"कलाकाराला ऐकून घ्यावंच लागतं, पण..." शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेचं पुन्हा प्रत्युत्तर
18
ठाणे स्टेशनजवळ भीषण आग! स्कायवॉकजवळच्या आगीमुळे प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ
19
साप्ताहिक राशीभविष्य: २ राजयोगांचा ९ राशींना दुपटीने लाभ, सुबत्ता-भरभराट; गुंतवणुकीत नफा!
20
गुडबाय ISS! पृथ्वीवर परतण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांचे फोटो आले समोर, आजपासून परतीचा प्रवास सुरू होणार

मराठा आरक्षण सुनावणी पुन्हा लांबली

By admin | Updated: October 14, 2016 03:48 IST

मराठा आरक्षणासंबंधी अतिरिक्त प्रतिज्ञापत्रे आणि अन्य काही कागदपत्रे सादर करण्यासाठी आणखी काही दिवसांचा वेळ देण्याची राज्य सरकारची विनंती उच्च न्यायालयाने गुरुवारी मान्य

मुंबई : मराठा आरक्षणासंबंधी अतिरिक्त प्रतिज्ञापत्रे आणि अन्य काही कागदपत्रे सादर करण्यासाठी आणखी काही दिवसांचा वेळ देण्याची राज्य सरकारची विनंती उच्च न्यायालयाने गुरुवारी मान्य केली. सरकारसह सर्वच पक्षकारांना प्रतिज्ञापत्रे करण्याची शेवटची संधी देत मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर येत्या ७ डिसेंबरपासून अंतिम सुनावणी सुरू होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.गुरुवारी हे प्रकरण अंतिम सुनावणीची तारीख ठरविण्यासाठी न्या. अनूप मोहता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे आले होते. ३० सप्टेंबर रोजी न्यायालयाने सर्व वादी-प्रतिवादींना आपापली प्रतिज्ञापत्रे, पुरवणी प्रतिज्ञापत्रे तसेच संक्षेपात लेखी कायदेशीर युक्तिवादाचे मुद्दे सादर करण्यास सांगितले होते. सरकारला खंडपीठाने वेळ दिली, पण त्याचबरोबर प्रतिज्ञापत्र व लेखी स्वरूपात युक्तिवाद सादर करण्यासाठी सरकारला आतापर्यंत पुरेसा वेळ देण्यात आला आहे; शिवाय सर्वोच्च न्यायालयाने या याचिकांवरील सुनावणी जलदगतीने घेण्याची सूचना केली असल्याची आठवणही करून दिली. सरकारतर्फे आणखी वेळ देण्याची विनंती करताना ज्येष्ठ वकील विजय एम. थोरात म्हणाले की, सरकारला आरक्षणाच्या निर्णयाच्या समर्थनार्थ आणखी काही कागदपत्रे सादर करायची आहेत. शिवाय ज्यांनी या सुनावणीत सहभागी होण्यासाठी अर्ज केले आहेत त्यांच्या उत्तराची प्रतिज्ञापत्रेही करायची आहेत.या मागणीचे तपशीलवार कारण देताना अ‍ॅड. थोरात म्हणाले की, अनेक जातींचा मिळून मराठा समाज निर्माण झाला आहे. जातीनिहाय जनगणना करण्याची पद्धत केंद्र सरकारने थांबवल्याने मराठा समाजाची निश्चित आकडेवारी काढणे कठीण झाले आहे. ती आकडेवारी काढण्याचे काम सुरू आहे. यावर, सरकार मुद्दाम विलंब करत आहे, असा सूर मराठा आरक्षणाविरोधी व आरक्षणाचे समर्थन करणाऱ्या याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी आळवला. तर, आता आकडेवारी गोळा करून तुम्ही काय करणार आहात, असे न्या. कुलकर्णी यांनी विचारले. मात्र सरकारची विनंती मान्य करत न्या. मोहता म्हणाले, या टप्प्प्यावर सरकारवर विश्वास ठेवण्याशिवाय आमच्याकडे अन्य कोणताच पर्याय उपलब्ध नाही. त्याशिवाय अशा प्रकारच्या याचिकांवर सुनावणी करताना त्या समाजाची आकडेवारी उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकारला त्यांचे काम करू द्यायला हवे. साहाजिकच, सरकारला या गुंतागुंतीच्या विषयावर खूप काही मांडायचे असेल. त्यामुळे सरकारला त्यांचे सर्व म्हणणे मांडण्यासाठी वेळ देत आहोत. मात्र ही अखेरची संधी असेल. युक्तिवाद सुरू झाला की आम्ही त्यांच्या सगळया दाव्यांची पडताळणी करू, असेही खंडपीठाने बजावले. या सुनावणीत सरकारतर्फे ज्येष्ठ वकील थोरात यांच्यासह ज्येष्ठ वकील रवी कदम व सरकारी वकील अभिनंदन वाग्यानी काम पाहात आहेत.. (प्रतिनिधी)