शहरं
Join us  
Trending Stories
1
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
2
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
3
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
4
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
5
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
6
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
7
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीसोबत करणार हातमिळवणी?
8
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
9
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
10
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
11
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
12
India Pakistan Update: हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ओझरचे एचएएल 'हाय अलर्ट'वर !
13
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
14
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
15
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
16
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
18
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
19
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
20
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."

पवारांमुळेच मराठा समाज आरक्षणापासून वंचित

By admin | Updated: September 21, 2016 05:45 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळेच मराठा समाजाला आरक्षणापासून दीर्घकाळ वंचित राहावे लागले

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळेच मराठा समाजाला आरक्षणापासून दीर्घकाळ वंचित राहावे लागले, अशी टीका मराठा सुराज्य संघाचे प्रदेश अध्यक्ष प्रणय सावंत यांनी केली आहे. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून मराठा सुराज्य संघाने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत २७ सप्टेंबरला एकाच दिवशी मोर्चे काढण्याची घोषणा केली आहे.सावंत म्हणाले की, शरद पवार यांमुळेच मराठा आरक्षणाला दीर्घकाळ लागला. आघाडी सरकारने काढलेल्या शासन निर्णयात त्रुटी असल्याने मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात टिकले नाही. तरी प्रस्थापित राजकारण्यांमुळेच मराठा समाजाला वाईट दिवस आले आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावा, अशी मागणीही सावंत यांनी केली. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील दाहकता मराठा आणि दलित समाजाला कळालेली नाही, त्यामुळेच त्याचा गैरवापर होत आहे, असा दावा त्यांनी केला.ग्रामीण भागात सत्ता असलेल्या प्रस्थापित मराठा समाजाने समाजबांधवांसाठी काहीही केलेले नाही, असे सावंत म्हणाले. शिवाय ज्येष्ठ राजकीय नेते पतंगराव कदम आणि डी. वाय. पाटील यांनी सुरू केलेल्या शिक्षणसंस्थांमधून घेतल्या जाणाऱ्या डोनेशनमुळे मराठा समाजाला शैक्षणिक प्रगतीपासूनही वंचित राहावे लागले. म्हणूनच राजकीय पक्षांत विभागलेले मराठा समाजबांधव एकत्र आले आहेत. या प्रस्थापितांना बाजूला ठेवत ‘विस्थापितां’नी काढलेले हे मोर्चे नक्कीच आरक्षण मिळवतील, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)>शिक्षणसंस्थांवरही टीकास्त्रज्येष्ठ राजकीय नेते पतंगराव कदम आणि डी. वाय. पाटील यांनी सुरू केलेल्या शिक्षणसंस्थांमधून मराठा समाजाला शैक्षणिक प्रगतीची संधी उपलब्ध होती. मात्र याठिकाणी घेतल्या जाणाऱ्या डोनेशनमुळे मराठा समाजाला शैक्षणिक प्रगतीपासूनही वंचित राहावे लागले, अशी टीका सावंत यांनी केली.