शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषणाचे खापर फोडले ‘खावटी’वर

By admin | Updated: September 30, 2016 02:25 IST

आदिवासी भागातील बालकांच्या कुपोषणाच्या मुद्द्यावरुन अडचणीत आलेले राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांनी कुपोषणाचे खापर खावटी योजनेवर फोडले.

नाशिक : आदिवासी भागातील बालकांच्या कुपोषणाच्या मुद्द्यावरुन अडचणीत आलेले राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांनी कुपोषणाचे खापर खावटी योजनेवर फोडले.पावसाळ्यात तीन महिने काम नसल्यानेच आदिवासी बांधवांची उपासमार होते. त्यामुळे कुपोषण वाढते. यासाठी पुन्हा खावटी योजना सुरू करण्याचा सरकार गांभीर्याने विचार करीत असल्याचे सावरा यांनी सांगितले. आदिवासी विकास महामंडळाच्या ४३ वी वार्षिक सभा गुरुवारी येथे पडली. कुपोषणासह वार्षिक सभेच्या एक दिवस अगोदर वार्षिक अहवालास घेतलेली मंजुरी, वर्षानुवर्षे उघड्यावर पडणाऱ्या धान्यामुळे होणारे लाखोंचे नुकसान, आदिवासी विकास कार्यकारी संस्थांची दयनीय अवस्था यांसह अनेक प्रश्नांवर सभासदांनी संचालक मंडळासह महामंडळाचे अध्यक्ष सावरा यांना धारेवर धरले. खासदार हरिश्चंद्र चव्हाण, संचालक धनराज महाले, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दिनकर जगदाळे व्यासपीठावर उपस्थित होते. सभासद शंकरलाल मडावी यांनी महामंडळाच्या धान्य खरेदीच्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी केली. जयराम इदे यांनी शासनाकडून आदिवासी सहकारी संस्थांचे शोषण सुरू असल्याचा आरोप करीत रक्त आटवू नका, असे सुनावले. शिवराम झोले यांनी २०१४ च्या परिपत्रकानुसार आदिवासी सहकारी संस्थांना महामंडळाकडून एक लाख २५ हजाराचा मंजूर केलेला अग्रीम अद्याप दिला जात नाही. त्याची अंमलबजावणी करण्याची सूचना केली. (प्रतिनिधी)नोकरभरतीत भ्रष्टाचार; खासदारांनी दिले पुरावे आदिवासी विकास विभागात दोन वर्षांपूर्वी झालेल्या नोकरभरतीत शेकडो उमेदवारांकडून लाखो रुपये उकळण्यात आली. मात्र ज्यांना नोकरी लागली नाही, अशा लोकांना पैसे करत करण्याच्या बहाण्याने दिलेले धनादेश वटले नाहीत. ते आपल्याकडे असल्याचे सांगत आदिवासी विकास विभागाच्या शिक्षण विभागातील कर्मचारी विनोद परदेशी यांनी पेठ तालुक्यातील १० ते १२ उमेदवारांना लाखो रुपयांचे दिलेले धनादेश वटलेले नाहीत. ही गंभीर बाब असून, याप्रकरणी दोषी कर्मचाऱ्याला निलंबित करावे अशी मागणी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केली. सभेतील निर्णय धान्य खरेदी योजनेतील आदिवासी विकास सहकारी संस्थांचे कमिशन २५ रुपयांवरून वाढवून ३० रुपये करण्याचा निर्णय जाहीर केला. आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित शाळांमध्ये चुकीची वागणूक मिळत असून, त्यासंदर्भात शिक्षण संस्थांची बैठक घेणारसंचालक मंडळाची वर्षभर बैठक घेता आली नाही परंतु यापुढे नियमित दोन-तीन महिन्यांनी बैठक घेणार