शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी
2
कर्तव्यदक्ष महिला अधिकारी सोनाली मिश्रा सांभाळणार रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालकपद
3
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
8
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
9
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
10
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
11
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
12
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
13
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

अधिवेशनात कुपोषण मुद्दा गाजणार

By admin | Updated: March 6, 2017 04:11 IST

राज्यातील वाढते बालमृत्यू, कुपोषण कमी करण्यात आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे.

सुरेश लोखंडे,ठाणे- राज्यातील वाढते बालमृत्यू, कुपोषण कमी करण्यात आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. राज्यातील ६१ तालुक्यांमध्ये ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड आणि भिवंडी या तालुक्यांतील १५ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. या प्रश्नावर आर्थसंकल्पीय अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. तत्पूर्वीच मुंबई मंडलच्या आरोग्य उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे यांनी बैठक घेऊन जिल्ह्यातील डॉक्टरांना शनिवारी धारेवर धरले.माता, बालमृत्यूचे प्रमाण अधिक असलेले आदिवासी तालुके संवेदनशील म्हणून घोषित केले आहेत. ठाणे जिल्ह्याच्या शहापूर, भिवंडी, मुरबाड या तीन तालुक्यांतील आदिवासी, दुर्गम क्षेत्रांतील १५ आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. त्यात, पालघर जिल्ह्यातील सुमारे सहा तालुके आहेत. यातील माता व बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी या भागाला नवसंजीवनी क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या क्षेत्रात वर्षभर झालेल्या माता, बालमृत्यूंचा आढावा बैठक रावखंडे यांनी शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात घेतली.जागतिक कीर्तीच्या मुंबई महानगरास लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातही २११ कुपोषण व बालमृत्यू मोठ्या प्रमाणात झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन येथील आदिवासी, दुर्गम भाग नवसंजीवनी क्षेत्रात समाविष्ट करण्यात आला. यातील गावपाड्यांमध्ये वर्षभरात सुमारे ९० बालमृत्यू, तर पाच मातांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याचे अहवालाअंती उघड झाले. यातील दोन माता रुग्णालयात, दोन रस्त्यावर आणि एक माता घरी प्रसूतीदरम्यान दगावली आहे. तीन वर्षांपूर्वी म्हणजे २०१४ ला २०० बालकांसह २५ मातांचा मृत्यू झाल्यामुळे या वर्षाचे हे प्रमाण कमी आहे. मृत्यूचे हे प्रमाण कमी करण्यासाठी भिवंडीच्या तीन आरोग्य केंद्रांसह शहापूरच्या नऊ आणि मुरबाड तालुक्यातील तीन आरोग्य केंद्रांच्या नियंत्रणातील गावपाड्यांमध्ये नवसंजीवनी योजना लागू केली आहे.>जिल्ह्यातील माता बालमृत्यूपाच वर्षांत ५९ माता विविध आजारांनी दगावल्या आहेत. याशिवाय, मागील पाच वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील सहा वर्षे वयोगटापर्यंतच्या ५९५ बालकांचा मृत्यू झाला आहे. यामधील २०१५ ला ५३ बालके विविध कारणांनी दगावले आहेत. २०१२-१३ मध्ये सर्वाधिक २५६ बालकांचा, तर २०१३-१४ मध्ये २३३ बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद या पाच वर्षांत करण्यात आली आहे. याप्रमाणेच एक हजार ६२९ अर्भक पाच वर्षांत दगावले आहेत.