शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
3
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
4
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
5
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
6
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
7
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
8
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
9
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
10
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
11
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
12
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
13
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
14
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
15
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
16
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
17
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
18
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
19
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ

अधिवेशनात कुपोषण मुद्दा गाजणार

By admin | Updated: March 6, 2017 04:11 IST

राज्यातील वाढते बालमृत्यू, कुपोषण कमी करण्यात आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे.

सुरेश लोखंडे,ठाणे- राज्यातील वाढते बालमृत्यू, कुपोषण कमी करण्यात आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. राज्यातील ६१ तालुक्यांमध्ये ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड आणि भिवंडी या तालुक्यांतील १५ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. या प्रश्नावर आर्थसंकल्पीय अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. तत्पूर्वीच मुंबई मंडलच्या आरोग्य उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे यांनी बैठक घेऊन जिल्ह्यातील डॉक्टरांना शनिवारी धारेवर धरले.माता, बालमृत्यूचे प्रमाण अधिक असलेले आदिवासी तालुके संवेदनशील म्हणून घोषित केले आहेत. ठाणे जिल्ह्याच्या शहापूर, भिवंडी, मुरबाड या तीन तालुक्यांतील आदिवासी, दुर्गम क्षेत्रांतील १५ आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. त्यात, पालघर जिल्ह्यातील सुमारे सहा तालुके आहेत. यातील माता व बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी या भागाला नवसंजीवनी क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या क्षेत्रात वर्षभर झालेल्या माता, बालमृत्यूंचा आढावा बैठक रावखंडे यांनी शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात घेतली.जागतिक कीर्तीच्या मुंबई महानगरास लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातही २११ कुपोषण व बालमृत्यू मोठ्या प्रमाणात झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन येथील आदिवासी, दुर्गम भाग नवसंजीवनी क्षेत्रात समाविष्ट करण्यात आला. यातील गावपाड्यांमध्ये वर्षभरात सुमारे ९० बालमृत्यू, तर पाच मातांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याचे अहवालाअंती उघड झाले. यातील दोन माता रुग्णालयात, दोन रस्त्यावर आणि एक माता घरी प्रसूतीदरम्यान दगावली आहे. तीन वर्षांपूर्वी म्हणजे २०१४ ला २०० बालकांसह २५ मातांचा मृत्यू झाल्यामुळे या वर्षाचे हे प्रमाण कमी आहे. मृत्यूचे हे प्रमाण कमी करण्यासाठी भिवंडीच्या तीन आरोग्य केंद्रांसह शहापूरच्या नऊ आणि मुरबाड तालुक्यातील तीन आरोग्य केंद्रांच्या नियंत्रणातील गावपाड्यांमध्ये नवसंजीवनी योजना लागू केली आहे.>जिल्ह्यातील माता बालमृत्यूपाच वर्षांत ५९ माता विविध आजारांनी दगावल्या आहेत. याशिवाय, मागील पाच वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील सहा वर्षे वयोगटापर्यंतच्या ५९५ बालकांचा मृत्यू झाला आहे. यामधील २०१५ ला ५३ बालके विविध कारणांनी दगावले आहेत. २०१२-१३ मध्ये सर्वाधिक २५६ बालकांचा, तर २०१३-१४ मध्ये २३३ बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद या पाच वर्षांत करण्यात आली आहे. याप्रमाणेच एक हजार ६२९ अर्भक पाच वर्षांत दगावले आहेत.