शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

मालजीपाडा ग्रामपंचायत अखेर बरखास्त

By admin | Updated: July 12, 2017 03:11 IST

कोकण आयुक्तांनी मालजीपाडा ग्रामंपचायत बरखास्त करून सरपंच, उपसरपंचासह सदस्यांना अपात्र ठरवले आहे.

शशी करपे। लोकमत न्यूज नेटवर्कसार्वजनिक बांधकाम विभागाची इमारत असलेल्या जागेवर स्वत:च्या नावाने घरपट्टी लावून ती बेकायदेशीरपणे हडप करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कोकण आयुक्तांनी मालजीपाडा ग्रामंपचायत बरखास्त करून सरपंच, उपसरपंचासह सदस्यांना अपात्र ठरवले आहे. मालजीपाडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन इमारती आहेत. त्यातील एका इमारतीसह जागेवर घरपट्टी लावून सदर जागा हडप करण्याचा प्रयत्न सरपंच सतीश म्हात्रे, उपसरपंच देवराम गांगड यांच्यासह भामिनी भेटाल, तुषार पागी, जयश्री पाटील, रेखा नानकर, सुनंदा पाटील या सदस्यांनी केल्याची तक्रार ग्रामसेवकांनी केली होती. मासिक सभेत घरपट्टी लावण्याचा ठराव मांडण्यात आल्यानंतर ग्रामसेवकांनी त्याला विरोध केला होता. सरकारी इमारत आणि जमीन ग्रामपंचायतीच्या नावे करण्याऐवजी पदाचा गैरवापर करून स्वत:च्या नावे करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेकडे तक्रार करण्यात आली होती. त्यावरून गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी करून आपला अहवाल जिल्हा परिषदेला सादर केला होता. या अहवालावरून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांना अपात्र ठरवण्याची शिफारस कोकण आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात केली होती. मालजीपाडा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारती आपल्या नावे करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच हॉटेल व्यवसायाला ठरावाद्वारे परवानगी नाकारलेली असताना कर आकारणी केली होती. त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ३९ (१) नुसार सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कोकण आयुक्तांना पाठवला होता. >कोकण आयुक्तांनी चौकशी अहवालाच्या आधारे घेतला निर्णययाप्रकरणी कोकण आयुक्त जगदीश पाटील यांनी सुनावणी घेतली. यावेळी सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांच्या वकिलांनी हा हस्तदोष असल्याचा दावा करीत आरोप फेटाळून लावले होते. मात्र, कोकण आयुक्त पाटील यांनी जिल्हा परिषदेचा चौकशी अहवालानुसार सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले. सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांना अपात्र ठरवत कोकण आयुक्तांनी ग्रामपंचायत बरखास्तीचा निर्णय दिला. दरम्यान, गेल्याच महिन्यात पाली ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत सर्व सदस्यांनी एकत्र येत सरपंचांविरोधात अविश्वासाचा ठराव संमत केला होता. सरपंचांनी ग्रामसेवक, मासिक सभा आणि ग्रामपंचायतीला विश्वासात न घेताच एका बिल्डरला बांधकामासाठी ना हरकत दाखला दिला होता. त्या दाखल्यावर बिल्डरने अनधिकृत बांधकाम सुरु केले आहे. आता याप्रकरणी जिल्हा परिषदेकडून कोणती कारवाई करण्यात येते याकडे वसईकरांचे लक्ष लागले आहे.