शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
3
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
4
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
5
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
7
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
8
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
9
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
10
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
11
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
12
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
13
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
14
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
15
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
16
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
17
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
18
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
19
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
20
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

हेक्टरी 25 हजार नुकसान भरपाई द्या

By admin | Updated: December 11, 2014 01:33 IST

राज्य शासनाच्या धोरणांवर हल्लाबोल करीत विरोधकांनी शेतक:यांना हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.

नागपूर : राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर बुधवारी विधान परिषदेत चर्चेला सुरुवात झाली. राज्य शासनाच्या धोरणांवर हल्लाबोल करीत विरोधकांनी शेतक:यांना हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. तर सत्ताधा:यांनी या परिस्थितीला मागील शासन जबाबदार असल्याचा आरोप लावला. जर ‘पॅकेज’ जाहीर झाले नाही तर विधिमंडळाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारादेखील देण्यात आला.
शेतक:यांच्या मुद्यावर चर्चा घेण्यात येऊन तातडीने ‘पॅकेज’ जाहीर करण्यात यावे, या मागणीवरून विरोधकांनी मंगळवारी गोंधळ केला होता. बुधवारीदेखील प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान या मागणीसाठी परत गदारोळ झाला व सभागृह 12 वाजेर्पयत तहकूब झाले. त्यानंतर काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी 26क् अन्वये दुष्काळ व शेतक:यांच्या परिस्थितीवर चर्चा करण्याचा प्रस्ताव मांडला. शासनासमोर अडचणी असतात हे मान्य असले तरी संकटात सापडलेल्या शेतक:याला मदत करण्याचे धैर्य शासनात आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. शेतक:यांनी यापुढे आत्महत्या केल्या तर त्याची जबाबदारी शासनावरच राहील. राज्य शासनाने अद्याप दुष्काळ जाहीर केलेला नाही. त्यामुळे केंद्राकडून मदत आलेली नाही. केंद्रीय कृषिमंत्र्यांनीच ही बाब बोलून दाखवली आहे. यावरून शासनाची उदासिनता दिसून येत आहे, असे म्हणत खडसेंवर त्यांनी टीका केली. राज्य शासनाने ओलिताखालील शेतीसाठी हेक्टरी 5क् हजार व कोरडवाहू शेतीसाठी 25 हजार रुपयांची घोषणा करावी, अशी मागणी त्यांनी केली. जर ‘पॅकेज’ जाहीर केले नाही तर कामकाज चालू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
शासनाने शेतीची पाहणी करुन शेतक:यांना मदत द्यावी. आणोवारी काढत असताना ‘टेबल’ बदलण्याची आवश्यकता आहे. शिवाय कालबद्ध कार्यक्रम आखून आत्महत्याग्रस्त शेतक:यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याची गरज असल्याचे मत भाजपच्या शोभाताई फडणवीस यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी विदर्भाचा दुष्काळ महाभयंकर तर मराठवाडय़ातील दुष्काळ महाभीषण असल्याचे म्हटले. दुष्काळग्रस्त परिसरात शेतक:यांच्या आत्महत्या होत आहेत. मुख्यमंत्र्यांनी जर वेळीच शेतक:यांना आधार देणारी भूमिका घेतली असती तर अनेकांचे जीव वाचले असते. शेतकरी अक्षरश: हतबल झाला आहे. हमीभावाहून कमी दराने शेतकरी व्यापा:यांना कापूस विकत आहे. मराठवाडय़ात 51 लाख जनावरांच्या चा:याची अडचण उपस्थित झाली आहे.
 
अनुपस्थितीमुळेा गदारोळ
ही चर्चा सुरू असताना सभागृहात संबंधित खात्याचे मंत्री उपस्थित नसल्याच्या मुद्यावरुन विरोधकांनी गदारोळ केला. भाई जगताप यांनी हा मुद्दा उपस्थित करीत सरकार शेतक:यांच्या प्रश्नांवर गंभीर नसल्याची टीका केली. दुसरीकडे राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी मुख्य किंवा प्रधान सचिव का उपस्थित नाही, यावरुन संताप व्यक्त केला.