शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

हेक्टरी 25 हजार नुकसान भरपाई द्या

By admin | Updated: December 11, 2014 01:33 IST

राज्य शासनाच्या धोरणांवर हल्लाबोल करीत विरोधकांनी शेतक:यांना हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.

नागपूर : राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर बुधवारी विधान परिषदेत चर्चेला सुरुवात झाली. राज्य शासनाच्या धोरणांवर हल्लाबोल करीत विरोधकांनी शेतक:यांना हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. तर सत्ताधा:यांनी या परिस्थितीला मागील शासन जबाबदार असल्याचा आरोप लावला. जर ‘पॅकेज’ जाहीर झाले नाही तर विधिमंडळाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारादेखील देण्यात आला.
शेतक:यांच्या मुद्यावर चर्चा घेण्यात येऊन तातडीने ‘पॅकेज’ जाहीर करण्यात यावे, या मागणीवरून विरोधकांनी मंगळवारी गोंधळ केला होता. बुधवारीदेखील प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान या मागणीसाठी परत गदारोळ झाला व सभागृह 12 वाजेर्पयत तहकूब झाले. त्यानंतर काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी 26क् अन्वये दुष्काळ व शेतक:यांच्या परिस्थितीवर चर्चा करण्याचा प्रस्ताव मांडला. शासनासमोर अडचणी असतात हे मान्य असले तरी संकटात सापडलेल्या शेतक:याला मदत करण्याचे धैर्य शासनात आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. शेतक:यांनी यापुढे आत्महत्या केल्या तर त्याची जबाबदारी शासनावरच राहील. राज्य शासनाने अद्याप दुष्काळ जाहीर केलेला नाही. त्यामुळे केंद्राकडून मदत आलेली नाही. केंद्रीय कृषिमंत्र्यांनीच ही बाब बोलून दाखवली आहे. यावरून शासनाची उदासिनता दिसून येत आहे, असे म्हणत खडसेंवर त्यांनी टीका केली. राज्य शासनाने ओलिताखालील शेतीसाठी हेक्टरी 5क् हजार व कोरडवाहू शेतीसाठी 25 हजार रुपयांची घोषणा करावी, अशी मागणी त्यांनी केली. जर ‘पॅकेज’ जाहीर केले नाही तर कामकाज चालू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
शासनाने शेतीची पाहणी करुन शेतक:यांना मदत द्यावी. आणोवारी काढत असताना ‘टेबल’ बदलण्याची आवश्यकता आहे. शिवाय कालबद्ध कार्यक्रम आखून आत्महत्याग्रस्त शेतक:यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याची गरज असल्याचे मत भाजपच्या शोभाताई फडणवीस यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी विदर्भाचा दुष्काळ महाभयंकर तर मराठवाडय़ातील दुष्काळ महाभीषण असल्याचे म्हटले. दुष्काळग्रस्त परिसरात शेतक:यांच्या आत्महत्या होत आहेत. मुख्यमंत्र्यांनी जर वेळीच शेतक:यांना आधार देणारी भूमिका घेतली असती तर अनेकांचे जीव वाचले असते. शेतकरी अक्षरश: हतबल झाला आहे. हमीभावाहून कमी दराने शेतकरी व्यापा:यांना कापूस विकत आहे. मराठवाडय़ात 51 लाख जनावरांच्या चा:याची अडचण उपस्थित झाली आहे.
 
अनुपस्थितीमुळेा गदारोळ
ही चर्चा सुरू असताना सभागृहात संबंधित खात्याचे मंत्री उपस्थित नसल्याच्या मुद्यावरुन विरोधकांनी गदारोळ केला. भाई जगताप यांनी हा मुद्दा उपस्थित करीत सरकार शेतक:यांच्या प्रश्नांवर गंभीर नसल्याची टीका केली. दुसरीकडे राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी मुख्य किंवा प्रधान सचिव का उपस्थित नाही, यावरुन संताप व्यक्त केला.