शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर महागणार टोल

By admin | Updated: March 23, 2017 11:34 IST

दर तीन वर्षांनी टोल वाढ करण्याची अधिसूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने 2004 मध्ये काढली होती. त्यानुसार ही टोलवाढ करण्यात आली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 23 - मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवास गतिमान करणा-या 'एक्सप्रेस वे' चा टोल महागणार असल्याचे वृत्त आहे. एक्सप्रेस वे च्या टोलमध्ये तब्बल 35 रुपयांनी वाढ करण्यात येणार आहे. सध्या 195 रुपये असणारा टोल 230 रुपये होणार आहे. तब्बल 18 टक्क्यांची ही टोलवाढ असून 1 एप्रिलपासून नव्या दराने टोलवसुली करण्यात येईल. 
 
दर तीन वर्षांनी टोल वाढ करण्याची अधिसूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने 2004 मध्ये काढली होती. त्यानुसार ही टोलवाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रवाशांचा खिसा आणखी रिकामा होणार आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे मार्गावरुन दररोज मोठया प्रमाणावर वाहनांची ये-जा असते. 
 
माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा प्रस्ताविक टोलवाढीला तीव्र विरोध आहे. कारण राज्य सरकार आणि बांधकाम कंपनीने मुंबई-पुणे एक्सप्रेस वे च्या बांधणीसाठी केलेला सर्व खर्च वसुल झाला आहे. दोघांनी बक्कळ नफा कमावला आहे. मग टोलवसुली कशासाठी ? अशा माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा सवाल आहे.