शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
2
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचा पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
3
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
4
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
5
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
7
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
8
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
9
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
10
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
11
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
12
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
13
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
14
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
15
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
16
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
17
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
18
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
19
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
20
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)

महायुती अभेद्य राहणार - शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळेल असा अंदाज

By admin | Updated: September 19, 2014 19:29 IST

महायुती टिकावी ही भाजपची भूमिका असली तरी ११९ चा फॉर्म्यूला जूना झाला असून यात बदल व्हायला पाहिजे अशी भूमिका भाजपने मांडले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १९ - काँग्रेस व राष्ट्रवादी यांना सत्तेवरून खाली खेचायचं असेल तर २५ वर्षांची युती तोडता येणार नाही यावर दोन्ही पक्षांचं एकमत झाल्याचं शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी सांगितलं. आज संध्याकाळी आदित्य ठाकरे यांनी भाजपा नेते ओम माथूर यांच्यासह अनेक नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर काहीही झालं तरी महायुती तुटणार नाही असे बैठकीनंतर आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

जागावाटपाबाबत आज रात्री आणखी एक बैठक होईल आणि अंतिम निर्णय उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत घेतला जाईल असे देसाई व आदित्य यांनी सांगितले. चांगला महाराष्ट्र घडवण्यासाठी शिवसेना व भाजपा या दोघांनी समजंसपणाची भूमिका घेतल्याचे ठाकरे व देसाई यांनी सांगितले.

राजकीय विश्लेषकांच्या मतानुसार उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होतील असे आश्वासन भाजपानं दिलं असेल तर भाजपासाठी काही जागा शिवसेना सोडेल असा अंदाज आहे. त्यामुळे आज रात्री महायुतीचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल अशा स्वरुपाचं आश्वासन भाजपा देईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

याआधी दिवसभरात झालेल्या घडामोडी खालीलप्रमाणे...

आघाडी मुक्त महाराष्ट्रासाठी शिवसेना - भाजप युती तुटू नये असे आम्हालाही वाटत आहे. मात्र ११९ जागा देण्याचा फॉर्म्यूला आता जुना झाला असून ज्या जागांवर शिवसेनेला आजपर्यंत कधीच विजय मिळालेला नाही त्या जागा भाजपला देण्यावर विचार व्हायलाच हवा अशी भूमिका भाजप नेत्यांनी मांडली होती. 

विधानसभा निवडणुकीतील जागावाटपावरुन शिवसेना - भाजपमध्ये सध्या कमालीचा तणाव निर्माण झाला व भाजप जास्त जागांवर ठाम. तर शिवसेनेना याला नकार दिला. त्यामुळे युती तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी भाजपच्या कोअर कमिटीची मुंबईत बैठक झाली. या बैठकीनंतर भाजप नेत्यांनी पत्रकार परिषदेत घेतली. यात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, महायुती तुटू नये हीच आमची इच्छा आहे. सन्मान आणि समाधान हे दोन केंद्रबिंदू ठेवून दोन्ही पक्षांनी नव्याने चर्चेला सुरुवात केली पाहिजे. शिवसेनेकडे नवीन प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय या बैठकीत घेतल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. 

एनडीएतील घटकपक्ष असूनही शिवसेनेने अनेकदा विरोधी भूमिका घेतली आहे. शरद पवार पंतप्रधान झाल्यास त्यांना पाठिंबा देऊ असे शिवसेनेने म्हटले होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्यावेळी शिवसेनेने प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी यांना समर्थन दिले होते. मात्र त्यावेळीही भाजपने सामंजस्याची भूमिका घेत युती कायम ठेवण्यावर भर दिला अशी आठवणही मुनगंटीवार यांनी करुन दिली.

विधानसभेतील ५९ जागांवर शिवसेनेला कधीच विजय मिळवता आलेला नाही. या जागा आघाडीला न देता त्या जागा भाजपला देण्यावर शिवसेनेने विचार करायला पाहिजे असे मुनगंटीवार यांनी सांगितले. तर एकनाथ खडसे म्हणाले, २५ वर्षांपूर्वी युती झाली. त्यावेळी लोकसभेत भाजप ३२ तर शिवसेना १६ जागा लढवायची. पण आता शिवसेनेला सहा जागा जास्त देण्यात आल्या आहेत. तसेच आरपीआय नेते रामदास आठवले यांनाही भाजपच्याच जागेवरुन राज्यसभेत पाठवण्यात आल्याचे एकनाथ खडसे यांनी निंदर्शनास आणून दिले.