शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
3
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
4
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
5
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
7
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
8
लग्नानंतर घरी कोणालंच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
9
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
10
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
11
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
12
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
13
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
14
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
15
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
16
"सोनम ढाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
17
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
18
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
19
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
20
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...

महायुती अभेद्य राहणार - शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळेल असा अंदाज

By admin | Updated: September 19, 2014 19:29 IST

महायुती टिकावी ही भाजपची भूमिका असली तरी ११९ चा फॉर्म्यूला जूना झाला असून यात बदल व्हायला पाहिजे अशी भूमिका भाजपने मांडले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १९ - काँग्रेस व राष्ट्रवादी यांना सत्तेवरून खाली खेचायचं असेल तर २५ वर्षांची युती तोडता येणार नाही यावर दोन्ही पक्षांचं एकमत झाल्याचं शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी सांगितलं. आज संध्याकाळी आदित्य ठाकरे यांनी भाजपा नेते ओम माथूर यांच्यासह अनेक नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर काहीही झालं तरी महायुती तुटणार नाही असे बैठकीनंतर आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

जागावाटपाबाबत आज रात्री आणखी एक बैठक होईल आणि अंतिम निर्णय उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत घेतला जाईल असे देसाई व आदित्य यांनी सांगितले. चांगला महाराष्ट्र घडवण्यासाठी शिवसेना व भाजपा या दोघांनी समजंसपणाची भूमिका घेतल्याचे ठाकरे व देसाई यांनी सांगितले.

राजकीय विश्लेषकांच्या मतानुसार उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होतील असे आश्वासन भाजपानं दिलं असेल तर भाजपासाठी काही जागा शिवसेना सोडेल असा अंदाज आहे. त्यामुळे आज रात्री महायुतीचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल अशा स्वरुपाचं आश्वासन भाजपा देईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

याआधी दिवसभरात झालेल्या घडामोडी खालीलप्रमाणे...

आघाडी मुक्त महाराष्ट्रासाठी शिवसेना - भाजप युती तुटू नये असे आम्हालाही वाटत आहे. मात्र ११९ जागा देण्याचा फॉर्म्यूला आता जुना झाला असून ज्या जागांवर शिवसेनेला आजपर्यंत कधीच विजय मिळालेला नाही त्या जागा भाजपला देण्यावर विचार व्हायलाच हवा अशी भूमिका भाजप नेत्यांनी मांडली होती. 

विधानसभा निवडणुकीतील जागावाटपावरुन शिवसेना - भाजपमध्ये सध्या कमालीचा तणाव निर्माण झाला व भाजप जास्त जागांवर ठाम. तर शिवसेनेना याला नकार दिला. त्यामुळे युती तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी भाजपच्या कोअर कमिटीची मुंबईत बैठक झाली. या बैठकीनंतर भाजप नेत्यांनी पत्रकार परिषदेत घेतली. यात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, महायुती तुटू नये हीच आमची इच्छा आहे. सन्मान आणि समाधान हे दोन केंद्रबिंदू ठेवून दोन्ही पक्षांनी नव्याने चर्चेला सुरुवात केली पाहिजे. शिवसेनेकडे नवीन प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय या बैठकीत घेतल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. 

एनडीएतील घटकपक्ष असूनही शिवसेनेने अनेकदा विरोधी भूमिका घेतली आहे. शरद पवार पंतप्रधान झाल्यास त्यांना पाठिंबा देऊ असे शिवसेनेने म्हटले होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्यावेळी शिवसेनेने प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी यांना समर्थन दिले होते. मात्र त्यावेळीही भाजपने सामंजस्याची भूमिका घेत युती कायम ठेवण्यावर भर दिला अशी आठवणही मुनगंटीवार यांनी करुन दिली.

विधानसभेतील ५९ जागांवर शिवसेनेला कधीच विजय मिळवता आलेला नाही. या जागा आघाडीला न देता त्या जागा भाजपला देण्यावर शिवसेनेने विचार करायला पाहिजे असे मुनगंटीवार यांनी सांगितले. तर एकनाथ खडसे म्हणाले, २५ वर्षांपूर्वी युती झाली. त्यावेळी लोकसभेत भाजप ३२ तर शिवसेना १६ जागा लढवायची. पण आता शिवसेनेला सहा जागा जास्त देण्यात आल्या आहेत. तसेच आरपीआय नेते रामदास आठवले यांनाही भाजपच्याच जागेवरुन राज्यसभेत पाठवण्यात आल्याचे एकनाथ खडसे यांनी निंदर्शनास आणून दिले.