शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

उदय योजनेत महावितरण सहभागी

By admin | Updated: October 8, 2016 04:33 IST

केंद्र शासनाने राज्य वीज वितरण कंपन्यांची कार्यक्षमता आणि आर्थिक सक्षमता वाढविण्यासाठी ‘उदय योजना’ सुरू केली

मुंबई : केंद्र शासनाने राज्य वीज वितरण कंपन्यांची कार्यक्षमता आणि आर्थिक सक्षमता वाढविण्यासाठी ‘उदय योजना’ सुरू केली असून, या योजनेत सहभागी होण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार, राज्य शासन, महावितरण आणि केंद्र शासनामध्ये शुक्रवारी त्रिपक्षीय करार झाला आहे.महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्राने २० नोव्हेंबर २०१५ रोजी उदय योजना सुरू केली. ४ आॅक्टोबर २०१६ रोजी औरंगाबाद येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेत राज्य शासनाने सहभागी व्हावे; यासाठीची मान्यता मिळाली. उदय योजनेंतर्गत महावितरणकडे ३० सप्टेंबर २०१५ रोजी असणाऱ्या मध्यम व लघू मुदतीच्या कर्ज रकमेच्या ७५ टक्के रक्कम म्हणजे सुमारे ४ हजार ९६० कोटी रकमेचे कर्जरोखे बाजारात उभे केले जातील; आणि त्यायोगे स्वस्त दराने प्राप्त होणारे भांडवल राज्य शासनाकडून महावितरणला अनुदान स्वरूपात देण्यात येईल. शिवाय राज्य शासन या आर्थिक वर्षांपासून पुढील ५ वर्षे म्हणजे २०२०-२१पर्यंत पाच समान हप्त्यांमध्ये ९९२ कोटी अनुदान महावितरणला दरवर्षी देणार असून, यालाही मान्यता मिळाली आहे. याच संदर्भातील त्रिपक्षीय करार शुक्रवारी राज्य शासन, महावितरण आणि केंद्रामध्ये करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)>वीज वितरण हानी कमी करणे, विद्युत पायाभूत सुविधांची श्रेणीवाढ करणे, बिलिंगची कार्यक्षमता वाढविणे, विद्युतभाराचे व्यवस्थापन करून विजेच्या मागणीचे नियोजन करणे हे मुद्दे समोर ठेवून ही योजना आखण्यात आली आहे.