शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
6
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
7
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
8
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
9
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
10
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
11
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
12
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
13
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
14
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
15
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
16
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
17
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
18
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
19
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
20
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

महात्मा फुले यांची पगडी आयुष्यातील सर्वोच्च मानबिंदू

By admin | Updated: April 12, 2015 00:39 IST

पगडी डोक्यावर ठेवणे म्हणजे एका अर्थाने प्रकाश पाडणे. अनेक पगड्या डोक्यावर असतात किंवा त्या दुसऱ्याच्या डोक्यावर घातल्या जातात.

पुणे : पगडी डोक्यावर ठेवणे म्हणजे एका अर्थाने प्रकाश पाडणे. अनेक पगड्या डोक्यावर असतात किंवा त्या दुसऱ्याच्या डोक्यावर घातल्या जातात. आता पगड्या डोक्यावर ठेवण्याचा जणू धंदाच झाला आहे. पण महात्मा फुले यांच्या पगडीला एक विशिष्ट अर्थ आहे, त्यांची पगडी हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च मानबिंदू असल्याची भावना प्रसिद्ध नाटककार आणि दिग्दर्शक अतुल पेठे यांनी शनिवारी येथे व्यक्त केली. पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीने अतुल पेठे यांना ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांच्या हस्ते पहिला ‘सत्यशोधक’ पुरस्कार देऊन आणि महात्मा फुले यांची पगडी अर्पण करून सन्मानित करण्यात आले. ५१ हजार रुपये रोख आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रा. हरी नरके, रोहिणी पेठे, कामगारनेत्या मुक्ता मनोहर, युनियनचे अध्यक्ष उदय भट आणि युनियनचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च क्षण असून, जीवन सार्थक झाल्यासारखे वाटत असल्याचे सांगून पेठे म्हणाले, खूप वर्षांपूर्वी एसीझेडवर ‘अराजकाची नांदी’ हा माहितीपट बनविला आणि त्यातून सर्वसामान्यांचे प्रश्न कॅमेऱ्याच्या कॅनव्हासमधूनसुद्धा समोर आणता येतात, याची प्रचिती आली. विकासाचा डांगोरा विवेकाच्या वृत्तीमधून पिटला जात शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या जातात, तेव्हा शेतकऱ्यांची अवस्था बांडगुळासारखी होते, हे जवळून पाहता आले. पण विकास झाला का? हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहिला. ‘कचराकुंडी’ मधून सफाई कामगारांच्या जीवनाचा वेध घेताना मी नक्की कुठे जगतो आहे, हा प्रश्न मला पडला. कॅमेऱ्यातून त्यांचे जीवन टिपताना मी स्वत:लाच त्यामध्ये पाहायला लागलो. त्यातून माझे आयुष्यच बदलले. ‘सत्यशोधक’ नाटकाद्वारे डोक्यावरून मैला वाहणाऱ्या सफाई कामगारांच्या माथ्यावर सांस्कृतिकतेचे नवे आयाम वसले. हा वास्तववाद जवळून पाहिल्यानंतर आज माझी ओळख नव्याने लोकांना सांगतो. माझे वडील महात्मा फुले, आई सावित्रीबाई फुले, काका महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत, असे त्यांनी सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. नव्या काळात युनियन मोडकळीस येणार असून, मूठ तोडून विभाजन कसे करायचे याचे राजकारण होणार आहे. मात्र विचलित न होता त्याविरूद्ध लढायचे कसे? याचा विचार करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)जगातील सर्वच क्रांत्या या सामाजिक आणि सांस्कृतिक पायावर उभ्या राहिल्या आहेत. भारतीय क्रांतीचे प्रेरणास्थान हे महात्मा ज्योतिबा फुले होते. मात्र गेल्या 50 वर्षात आपला देश माकर््स-फुले-शाहू-आंबेडकरांच्या परंपरेला मुकला असून, देशाच्या इतिहासाची मीमांसा योग्यरितीने झालेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच ‘सत्यशोधक’ हे नाटक अन्य प्रादेशिक भाषांमध्ये व्हावे आणि भारतातील सर्व साहित्यिक आणि कलावंत यांना एकत्र आणून त्यांचे संमेलन भरविले जावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.- रावसाहेब कसबे कन्नड भाषेत ‘सत्यशोधक’ येणार?४कर्नाटकातील हेगडू या गावातील जन गण मन दाता संस्था ‘ सत्यशोधक’ हे नाटक कन्नड भाषेत करू इच्छित आहे, त्यासाठी त्यांचे मला आमंत्रण आले असून, महात्मा फुले नव्याने मांडता येतील का? हे पहायचे आहे असे सांगत आपल्या पुरस्काराची रक्कम या संस्थेला प्रदान करीत असल्याचे अतुल पेठे यांनी जाहीर केले.