शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

महात्मा फुले यांची पगडी आयुष्यातील सर्वोच्च मानबिंदू

By admin | Updated: April 12, 2015 00:39 IST

पगडी डोक्यावर ठेवणे म्हणजे एका अर्थाने प्रकाश पाडणे. अनेक पगड्या डोक्यावर असतात किंवा त्या दुसऱ्याच्या डोक्यावर घातल्या जातात.

पुणे : पगडी डोक्यावर ठेवणे म्हणजे एका अर्थाने प्रकाश पाडणे. अनेक पगड्या डोक्यावर असतात किंवा त्या दुसऱ्याच्या डोक्यावर घातल्या जातात. आता पगड्या डोक्यावर ठेवण्याचा जणू धंदाच झाला आहे. पण महात्मा फुले यांच्या पगडीला एक विशिष्ट अर्थ आहे, त्यांची पगडी हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च मानबिंदू असल्याची भावना प्रसिद्ध नाटककार आणि दिग्दर्शक अतुल पेठे यांनी शनिवारी येथे व्यक्त केली. पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीने अतुल पेठे यांना ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांच्या हस्ते पहिला ‘सत्यशोधक’ पुरस्कार देऊन आणि महात्मा फुले यांची पगडी अर्पण करून सन्मानित करण्यात आले. ५१ हजार रुपये रोख आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रा. हरी नरके, रोहिणी पेठे, कामगारनेत्या मुक्ता मनोहर, युनियनचे अध्यक्ष उदय भट आणि युनियनचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च क्षण असून, जीवन सार्थक झाल्यासारखे वाटत असल्याचे सांगून पेठे म्हणाले, खूप वर्षांपूर्वी एसीझेडवर ‘अराजकाची नांदी’ हा माहितीपट बनविला आणि त्यातून सर्वसामान्यांचे प्रश्न कॅमेऱ्याच्या कॅनव्हासमधूनसुद्धा समोर आणता येतात, याची प्रचिती आली. विकासाचा डांगोरा विवेकाच्या वृत्तीमधून पिटला जात शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या जातात, तेव्हा शेतकऱ्यांची अवस्था बांडगुळासारखी होते, हे जवळून पाहता आले. पण विकास झाला का? हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहिला. ‘कचराकुंडी’ मधून सफाई कामगारांच्या जीवनाचा वेध घेताना मी नक्की कुठे जगतो आहे, हा प्रश्न मला पडला. कॅमेऱ्यातून त्यांचे जीवन टिपताना मी स्वत:लाच त्यामध्ये पाहायला लागलो. त्यातून माझे आयुष्यच बदलले. ‘सत्यशोधक’ नाटकाद्वारे डोक्यावरून मैला वाहणाऱ्या सफाई कामगारांच्या माथ्यावर सांस्कृतिकतेचे नवे आयाम वसले. हा वास्तववाद जवळून पाहिल्यानंतर आज माझी ओळख नव्याने लोकांना सांगतो. माझे वडील महात्मा फुले, आई सावित्रीबाई फुले, काका महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत, असे त्यांनी सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. नव्या काळात युनियन मोडकळीस येणार असून, मूठ तोडून विभाजन कसे करायचे याचे राजकारण होणार आहे. मात्र विचलित न होता त्याविरूद्ध लढायचे कसे? याचा विचार करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)जगातील सर्वच क्रांत्या या सामाजिक आणि सांस्कृतिक पायावर उभ्या राहिल्या आहेत. भारतीय क्रांतीचे प्रेरणास्थान हे महात्मा ज्योतिबा फुले होते. मात्र गेल्या 50 वर्षात आपला देश माकर््स-फुले-शाहू-आंबेडकरांच्या परंपरेला मुकला असून, देशाच्या इतिहासाची मीमांसा योग्यरितीने झालेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच ‘सत्यशोधक’ हे नाटक अन्य प्रादेशिक भाषांमध्ये व्हावे आणि भारतातील सर्व साहित्यिक आणि कलावंत यांना एकत्र आणून त्यांचे संमेलन भरविले जावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.- रावसाहेब कसबे कन्नड भाषेत ‘सत्यशोधक’ येणार?४कर्नाटकातील हेगडू या गावातील जन गण मन दाता संस्था ‘ सत्यशोधक’ हे नाटक कन्नड भाषेत करू इच्छित आहे, त्यासाठी त्यांचे मला आमंत्रण आले असून, महात्मा फुले नव्याने मांडता येतील का? हे पहायचे आहे असे सांगत आपल्या पुरस्काराची रक्कम या संस्थेला प्रदान करीत असल्याचे अतुल पेठे यांनी जाहीर केले.