शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राचा धर्मनिरपेक्ष नेता हरपला

By admin | Updated: December 3, 2014 03:38 IST

इंदिराजींच्या पडत्या काळात त्यांना भक्कम साथ दिली. राज्यसभेत त्यावेळी ते काँग्रेसचा किल्ला समर्थपणे लढवत असत.

मुंबई : ९ फेब्रुवारी १९२९ रोजी जन्मलेले अंतुले पाच दशकांहून अधिक काळ सक्रिय राजकारणात राहिले. आमदार, खासदार, मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री अशी त्यांची चढती राजकीय कारकीर्द राहिली. १९८० मध्ये ते मुख्यमंत्री झाले तेव्हा राज्यसभेचे सदस्य होते. विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ते १ लाख ३० हजार मतांनी निवडून आले होते. महाराष्ट्रातील पहिले मुस्लिम मुख्यमंत्री बनण्याचा मान अंतुले यांना मिळाला, पण उक्ती आणि कृतीतून त्यांनी नेहमीच धर्मनिरपेक्ष प्रतिमा जपली. त्यांच्या अवतीभोवती कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील लोकांचा मोठा गोतावळा असे. इंदिरानिष्ठ म्हणून त्यांची ओळख होती. १९६९ मध्ये काँग्रेस पक्षात फूट पडली तेव्हा ते इंदिराजींसोबत राहिले. इंदिराजींच्या पडत्या काळात त्यांना भक्कम साथ दिली. राज्यसभेत त्यावेळी ते काँग्रेसचा किल्ला समर्थपणे लढवत असत.> वरदान ठरलेली ‘पोलिओ मोहीम’तात्कालीन कुलाबा लोकसभा मतदारसंघातून ते सलग दोन वेळा निवडून गेले. त्यांच्या या खासदारकीच्या काळात जून १९९५ ते मे १९९६ या काळात ते केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री होते. आरोग्य मंत्रिपदाच्या काळातील त्यांनी नवी पिढी पोलिओमुक्त करण्याचा विडा उचलला आणि देशात अमलात आणलेली ‘पल्स पोलीओ मोहीम’ ही वरदान ठरली. च्आरोग्य मंत्रिपदाबरोबरच त्यांच्याकडे जलस्त्रोत मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार होता. १९९६ मध्ये ११व्या तर २००४ मध्ये १४व्या लोकसभेत देखील ते कुलाबा (रायगड) लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात अंतुले अल्पसंख्याक विभागाचे केंद्रीय मंत्री होते. २००९ साली अंतुले यांनी लोकसभेची शेवटीची निवडणूक लढविली होती. त्यानंतर राजकारणापासून ते अलिप्त झाले होते.>वादग्रस्त कारकिर्दसिमेंटच्या मोबदल्यात इंदिरा गांधी यांच्या प्रतिभा प्रतिष्ठानला बिल्डरांकडून देणग्या घेतल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आणि याच सिमेंट प्रकरणामुळे अंतुले यांना मुख्यमंत्रिपदावरून पाय उतार व्हावे लागले होते. त्यानंतर १९८५ मध्ये ते पुन्हा आमदार म्हणून निवडून आले आणि १९८९ पर्यंत आमदार होते.शहीद हेमंत करकरे यांच्या मृत्यूला मालेगाव बॉम्बस्फोटाच्या तपासाशी जोडल्याने अंतुले पुन्हा एकदा वादात पडले होते. २००९ मध्ये अंतुलेंनी शेवटची निवडणूक रायगडमधून लढवली. शिवसेनेचे अनंत गिते यांनी अंतुले यांचा पराभव केला़ त्यानंतर त्यांनी सक्रि य राजकारणातून संन्यास घेतला. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान पदास राहुल गांधी व नरेंद्र मोदी हे दोघेही योग्य नसल्याचे भाष्य केले होते.