शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
4
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
5
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
7
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
8
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
9
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
10
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
11
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
12
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
13
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
14
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
15
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
16
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
17
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
18
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
19
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
20
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

महाराष्ट्राला मिळणार 400 कोटींची मोफत वीज

By admin | Updated: August 17, 2014 01:22 IST

गुजरातमधील सरदार सरोवराची उंची वाढविण्यासाठी यापूर्वीचे केंद्रातील सरकार परवानगी देत नव्हते, मात्र मी पंतप्रधान झाल्यानंतर 15 दिवसांत याला मंजुरी दिली़

शिवाजी सुरवसे - सोलापूर
गुजरातमधील सरदार सरोवराची उंची वाढविण्यासाठी यापूर्वीचे केंद्रातील सरकार परवानगी देत नव्हते, मात्र मी पंतप्रधान झाल्यानंतर 15 दिवसांत याला मंजुरी दिली़ यामुळे येथे जलविद्युत प्रकल्प होण्यास गती मिळाली असून, या प्रकल्पामुळे महाराष्ट्राला 400 कोटींची वीज मोफत मिळणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितल़े वीज बचत हे राष्ट्रीय कार्य असून, विद्यार्थी हे कार्य करू शकतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला़
 रायचूर-सोलापूर या 765 केव्ही पॉवरग्रीडचा तसेच पुणो-सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 चा लोकार्पण सोहळा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शनिवारी होम मैदानावर पार पडला़, त्या वेळी ते बोलत होत़े व्यासपीठावर राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय रस्ते विकास व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, खासदार शरद बनसोडे, केंद्रीय ऊर्जा सचिव पी़ क़ेसिन्हा, आऱ पी़ सिंग आदी उपस्थित होत़े 
पंतप्रधान मोदींनी आपल्या 25 मिनिटांच्या भाषणात वीज, रस्ते, पाणी या महत्त्वाच्या मुद्दय़ांवर भर दिला़ मोदी म्हणाले, संपत्तीमुळे रस्ते तयार होत नाहीत तर रस्त्यांमुळे संपत्ती वाढत़े तसेच अटलबिहारी वाजपेयी यांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला.
 
भाषणात व्यत्यय
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे भाषण सुरू असताना उपस्थित प्रेक्षकांनी व्यत्यय आणला़ ‘मोदी मोदी’चा सतत नारा सुरू ठेवला. शिवाय त्यांचे भाषण सुरू असताना तुमचे भाषण नको, असे हातवारे करून सांगितले; तरीही मुख्यमंत्र्यांनी आपले भाषण रेटल़े
शिंदेंचा विसऱ़़
या सोहळ्याचे मला निमंत्रण नव्हते, काही हरकत नाही़ या कामासाठी दूरदृष्टी असावी लागत़े देशाच्या विकासात भर घालणारा मुख्य प्रकल्प सोलापूरसाठी आणू शकलो याचा मला आनंद आहे, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केल़े गडकरी यांनी आळंदी ते पंढरपूर या मार्गाच्या चौपदरीकरणाची घोषणा केली़   
असा रंगला कलगीतुरा 
मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर सोलापुरात प्रथमच आले होत़े यानिमित्ताने मोदी आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगला. प्रारंभी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे भाषण झाले. त्यांनी उद्योगधंद्याच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचा उल्लेख करीत राज्यातील विजेची समस्या सोडविण्यासाठी कोळसा आणि गॅसची वाढीव मागणी केली. याचवेळी त्यांनी राज्यातील दुष्काळ निवारणासाठीही निधीची मागणी केली. हाच मुद्दा धरून पंतप्रधान
मोदी म्हणाले, आपण गुजरातचे मुख्यमंत्री असताना कुणाकडे काही मागत नव्हतो़ मुख्यमंत्र्यांकडे पाहात ‘मी तुमची व्यथा समजू शकतो, असे मोदी म्हणाल़े