शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र देशात अव्वल, आंध्र दुसरे

By admin | Updated: December 7, 2015 00:16 IST

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान : १२ लाख शेतकऱ्यांना मिळणार मृदा आरोग्य पत्रिका

शिवाजी गोरे-- दापोली--जागतिक मृदा दिनी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका वाटप करण्यात येत आहे. यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर असून, १२ लाख शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका वाटप करण्यात येणार आहे. त्या पाठोपाठ आंध्रप्रदेशातील ८ लाख तसेच तामिळनाडूतील ७ लाख शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकेचे वाटप केले जाणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी उद्योगाला गती देण्यासाठी शाश्वत शेतीचा मार्ग स्वीकारला असून, यासाठीच केंद्र व राज्य शासनाच्या सहयोगाने राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत मृदा आरोग्य पत्रिका ही योजना सन २०१५ - १६ पासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत देशातील विविध राज्यातील शेतीचे माती परीक्षण करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि दापोली कोकण कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दापोली तालुक्यातील साखरोली येथे जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून मृदा आरोग्य पत्रिकेचे शनिवारी वाटप करण्यात आले. यावेळी कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य उपस्थित होते. त्यांच्यासमवेत संशोधन संचालक डॉ. उत्तम महाडकर, सहयोगी अधिष्ठाता सुभाष चव्हाण, विभागप्रमुख डॉ. प्रमोद सावंत, उपविभागीय कृषी अधिकारी जांबुवंत घोडके, तालुका कृषी अधिकारी मुरलीधर नागदिवे, अनिल दुसाणे, राजेश धोपावकर, डॉ. भैरमकर आदी उपस्थित होते.मृदा आरोग्य पत्रिका वितरण अभियानांतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना येत्या ३ वर्षात त्यांच्या जमिनीची मृदा आरोग्य पत्रिका उपलब्ध करुन देण्यात येणार असून, हा कार्यक्रम सन २०१५ - १६ ते २०१७ - १८ या तीन वर्षाच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. जमीन आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनीची रासायनिक गुणधर्म स्थिती, प्रमुख अन्नद्रव्याची पातळी व सूक्ष्म मूलद्रव्य कमतरता स्थितीची माहिती जमीन आरोग्य पत्रिकेतील अहवालानुसार पिकांना खत मात्रेची शिफारस शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. यासाठी राज्यामध्ये मृदा चाचणी तपासणीसाठी शासकीय २९ व नोंदणीकृत अशासकीय १३१ अशा एकूण १६० मृदा चाचणी प्रयोगशाळा आहेत.कृषी पद्धतीत रासायनिक खतांचा वापर त्याचबरोबर पाण्याच्या अर्निबंधीत वापरामुळे तसेच तद्नुषंगीक कारणांमुळे जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे. त्याचा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ लागल्याने मृदा आरोग्य अबाधित राखण्यासाठी मृदा तपासणीवर आधारीत खतांच्या संतुलीत तसेच परिणामकारक वापराला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनाच्या सहयोगाने मृदा आरोग्य पत्रिका ही योजना सन २०१५ - १६ पासून राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील १ कोटी ३७ लाख शेतकऱ्यांच्या शेत जमिनीची माती परिक्षणातून मृदा आरोग्य पत्रिका तयार केली जाणार आहे. यामध्ये लागवडीखालील क्षेत्रामधून जिरायत क्षेत्रासाठी १० हेक्टर क्षेत्राला १ मृदा नमुना व बागायती क्षेत्रासाठी २.५ हेक्टर क्षेत्राला १ मृदा नमुना घेऊन त्यांचे प्रमुख व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे विश्लेषण करण्यात येत आहे.रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर कमी करुन मृदा तपासणीवर आधारीत, अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार खतांच्या संतुलीत व कार्यक्षम वापराला प्रोत्साहन देणे.मृदा आरोग्य सुधारण्यासाठी तसेच मुलद्रव्यांची परिणामकारकता वाढविण्यासाठी जैविक खते, सेंद्रीय खते, गांडुळ खत, निंबोळी सल्फर आच्छादीत युरियासारख्या संथगतीने नत्र पुरवठा करणाऱ्या खतांच्या वापराला प्रोत्साहन देणे.एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाद्वारे पिकांच्या उत्पादकतेत वाढ करणे.जमिनीच्या उत्पादकतेविषयीच्या समस्या जाणून घेऊन त्यावर खतांच्या शिफारशी विकसीत करणे.मृदा तपासणीवर खतांच्या संतुलित वापराला महत्व.जमिनीचे आरोग्य बिघडल्याने भविष्यातील धोका लक्षात आल्याने संयुक्त राष्ट्राच्या ६८ व्या सर्वसाधारण सभेत ‘२०१५ आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष’ म्हणून घोषीत करण्यात आले. जमिनीच्या आरोग्याबाबत संपूर्ण जगात याबाबतचा संदेश पोहचविणे तसेच शेतकरी व समाजात जाणीव व जागृती करुन देण्याच्या मुख्य हेतूने ५ डिसेंबर ‘जागतिक मृदा दिवस’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने एकाच दिवशी राज्यातील १२ लाख शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिका देण्यात येत आहेत.