शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
8
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
9
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
10
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
11
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
12
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
13
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
14
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
15
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
16
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
17
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
18
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
19
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
20
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...

आत्महत्येत महाराष्ट्र अव्वल!

By admin | Updated: July 4, 2014 08:54 IST

भारतात आत्महत्या करणा-यांच्या संख्येत वाढ झाली असून आत्महत्या करण्यांमध्ये महाराष्ट्र राज्य अव्वल क्रमांकावर असल्याची माहिती समोर आली आहे.

ऑनलाइन टीम 
नवी दिल्ली, दि. ३ - भारतात आत्महत्या करणा-यांच्या संख्येत वाढ झाली असून आत्महत्या करण्यांमध्ये महाराष्ट्र राज्य अव्वल क्रमांकावर असल्याची माहिती समोर आली आहे. देशात प्रत्येक वर्षी एक लाख लोक आत्महत्या करीत असून २१.६ टक्क्याने यामध्ये वाढ झाल्याची माहिती सरकारने दिलेल्या एका अहवालातून समोर आली आहे. 
नॅशनल क्राईम रेकॉर्डस्‍ ब्यूरोने दिलेल्या आकडेवारीवरून देशात प्रत्येक तासाला १५ व्यक्ती आत्महत्या करीत आहे. २००३ मध्ये हा आकडा १ लाख १०,८५१ इतका होता तो आता २०१३ साली १ लाख ३४ हजार ७९९ इतका झाला आहे. दहा वर्षामध्ये लोकसंख्या वाढीचा दर १५ टक्के इतका आहे  तर २०१३ मधील आत्महत्येच्या घटनांमध्ये ५.७ टक्के इतकी वाढ झाली आहे. देशातील सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये झाल्या आहेत. २०१३ मध्ये महाराष्ट्रामध्ये तब्बल १६,६२२ जणांनी  आत्महत्या केल्या असून त्यापाठोपाठ तमिळनाडुमध्ये १६,६०१ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. तसेच आंध्र प्रदेशात १४ हजार ६०७ जणांनी तर  पश्‍चिम बंगालमध्ये १३ हजार ०५५ जणांनी आपले जीवन संपवले आहे. कर्नाटकातही ११हजार २६६ जणांनी आत्महत्या केल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे.  
देशातील प्रमुख शहरांमध्येही आत्महत्येचे प्रमाण दिसत असून यामध्ये चेनईमध्ये २ हजार ४५० जणांनी सर्वाधिक आत्महत्या केल्याचे आढळून आले असून त्यापाठोपाठ बंगळुर २ हजार ०३३, दिल्ली १ हजार ७५३ आणि देशाची आर्थिक राजधानी  मुंबई शहरात १ हाजर ३२२ जणांनी आपले जीवन संपवले आहे.  या आत्महत्या करण्यामागे कौटुंबिक समस्या व आजारपण ही दोन मुख्य कारणे असून बेरोजगारी, कर्ज व अंमली पदार्थांचे सेवनदेखील कारणे असल्याचे अहवालात म्हटंले आहे.