शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

अल्पवयीन मुलींच्या हत्येत महाराष्ट्र देशात आघाडीवर

By admin | Updated: October 11, 2015 04:11 IST

एकेकाळी स्त्री भ्रूणहत्येने राज्य हादरले असताना त्यापाठोपाठ आता, चिमुरडींच्या हत्येच्या घटनांमध्ये राज्य आघाडीवर असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

-  मनीषा म्हात्रे, मुंबईएकेकाळी स्त्री भ्रूणहत्येने राज्य हादरले असताना त्यापाठोपाठ आता, चिमुरडींच्या हत्येच्या घटनांमध्ये राज्य आघाडीवर असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे मुली वाचवा, अशी म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आंतरराष्ट्रीय कन्या दिन देशभरात उद्या (रविवारी) साजरा होत असताना त्यांच्या सुरक्षेबाबत शासनस्तरावर गांभीर्याने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालेली आहे. ‘मुलगी नको, वंशाचा दिवा हवा, म्हणून मुलींची गर्भाशयातच हत्या केली जात होती. यामुळे दरहजारी मुलींच्या प्रमाणात दिवसेंदिवस घट होत असताना, शासनाने यावर कडक भूमिका घेतल्याने त्यावर काही प्रमाणात रोख आणणे शक्य झाले आहे. मात्र त्यातच आता सहा वर्षांखालील चिमुकल्यांच्या हत्येच्या गुन्ह्यात राज्य आघाडीवर असल्याने मुलगी वाचविण्यासाठी पुन्हा एकदा पुढे येण्याची गरज भासत आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने जारी केलेल्या गेल्या वर्षाच्या आकडेवारीनुसार, ६ वर्षांखालील मुलींच्या सर्वाधिक हत्या ६२ महाराष्ट्रात झाल्या आहेत. या चिमुरडींच्या हत्येमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल तामिळनाडू (३४), उत्तर प्रदेश (२७), मध्य प्रदेश (२६) यांचा क्रमांक आहे. अल्पवयीन मुलींवरील अत्याचार कमी करण्यासाठी आणि आरोपींना जरब बसवून जास्तीत जास्त शिक्षा देण्यासाठी देशामध्ये ‘पॉस्को’ कायदा करण्यात आला. तसेच अल्पवयीन मुले हरवल्यास अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेशसुद्धा न्यायालयाने दिले. असे असले तरी अल्पवयीन मुलींच्या अत्याचारांमध्ये घट न होता अत्याचारांंचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. देशाची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये अल्पवयीन मुलींचे अपहरण, लंैगिक अत्याचार असे दर दिवसाला किमान तीन ते चार गुन्हे दाखल होतात. या वर्षीच्या ४ आक्टोबरपर्यंत ३२२ मुली लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरल्या आहेत.कायद्याची अंमलबजावणी होणे गरजेचेमुलींच्या अत्याचारांच्या घटनांवर रोख आणण्यासाठी शासनाने कायद्यामध्ये कठोरता आणली आहे. मात्र याची अंमलबजावणी योग्य रीतीने होत नसल्याने मुलींच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशात समाजाने यासाठी पुढाकार घेऊन मुलगा, मुलगी यातील भेदाबाबत असलेली वृत्ती बदलणे गरजेचे आहे. याची सुरुवात प्रत्येक कुटुंबीयांनी त्यांच्या स्वत:पासून करणे गरजेचे आहे.- कुमार निलेंदु, क्राय संस्थामुलीची हत्या ही गंभीर बाब : अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेबाबत पोलिसांची जितकी जबाबदारी आहे तितकीच ती त्यांच्या कुटुंबीयांचीदेखील आहे. इतर देशांतील पालक आपल्या लहान मुलांना कधी एकटे घरात सोडत नाहीत. त्यांच्या प्रत्येक हालचालींवर त्यांचे लक्ष असते. त्यात अल्पवयीन मुलींच्या हत्येतील वाढ ही गंभीर बाब असून याबाबत ठोस पावले उचलण्यात येतील, असे आश्वासन राज्याचे नवनिर्वाचित पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी ’लोकमत’शी बोलताना दिले आहे. प्रत्येक पाल्य हा त्यांच्या कुटुंबीयांची खरी मालमत्ता आहे विशेषत: म्हणजे मुलगी. यासाठी सर्वांनी पुढे येऊन याबाबत पुढे येणे गरजेचे असल्याचे आवाहनही त्यांनी केले.