शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात महायुती अशक्य

By admin | Updated: January 17, 2017 04:29 IST

रिपाइंशी परस्पर जागावाटप केल्याने शिवसेनेचे नेते प्रचंड नाराज झाले आहेत.

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेत भाजपाचाच महापौर असेल, अशी घोषणा करून रिपाइंशी परस्पर जागावाटप केल्याने शिवसेनेचे नेते प्रचंड नाराज झाले आहेत. यामुळे शिवसेना, भाजपा, रिपाइं आणि साई पक्षातील जागावाटपात घोळ झाला असून आता महायुती अशक्य असल्याचे शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी स्पष्ट केले. भाजपाच्या नेत्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला, तर साई पक्षाने महायुती गरजेची असल्याचे मत मांडले.सध्या महायुतीतील जागावाटपाची चर्चा पूर्णत: थांबली आहे, याकडेही चौधरी यांनी लक्ष वेधले. उल्हासनगर महापालिकेवर गेले दशकभर शिवसेना, भाजप, साई, रिपाइं, अपक्षांची सत्ता आहे. २००७ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती झाली होती आणि प्रत्येकी ३५ व ४० जागांचे वाटप झाले होते. त्यावेळी शिवसेनेचे १६ तर भाजपाचे ११ नगरसेवक निवडून आले. पालिकेवरील सत्तेसाठी स्थानिक पातळीवरील तेव्हाच्या लोकभारती आणि आताच्या साई पक्षासोबत महायुती करून सत्ता काबीज करण्यात आली. त्यावेळी साई पक्षाचे १४ नगरसेवक निवडून आल्याने सत्तेची सूत्रे त्यांच्याकडे गेली होती. त्यांना पहिल्या सव्वा वर्षाचे महापौरपद देण्यात आले. २०१७ च्या निवडणुकीत पुन्हा भाजप-शिवसेना व रिपाइंची महायुती होवून सेना व भाजपने प्रत्येकी ३३ जागांवर तर रिपाइंनी १२ जागांवर निवडणूक लढवली. शिवसेनेचे-२०, भाजपचे-११ तर रिपाइंचे चार नगरसेवक निवडून आले. शिवसेनेने दोन्ही वेळी भाजपापेक्षा कमी जागा लढविल्या. मात्र त्यांचे जादा नगरसेवक निवडून आले. तसेच विजय पाटील, राजेश वानखडे, सुनील सुर्वे यांच्या रूपाने शिवसेनेचे तीन बंडखोर नगरसेवक निवडून आले. पुन्हा सत्तेची चावी आठ नगरसेवक निवडून आलेल्या साई पक्षाकडे गेली. भाजप-शिवसेनेने पुन्हा साई पक्षासोबत महायुती करून पालिकेत सत्ता मिळविली. मात्र महापौरपद साई पक्षाला दिले. आता तर ओमी टीमच्या प्रवेशाच्या चर्चेने व मोदी लाटेने भाजपा फुगल्याची टीका महायुतीच्या अन्य पक्षांत सुरू आहे. त्यामुळेच भाजपाने मित्रपक्ष शिवसेनेला डावलून रिपाइंसोबत परस्पर युती केली आणि १४ जागा त्यांना देऊन टाकल्या. भाजपाच्या भूमिकेने शिवसेनेत नाराजी पसरली असून महायुती अशक्य असल्याचे शिवसेना नेते आणि शिवसैनिक उघडपणे सांगू लागले आहेत. भाजपाच्या याच भूमिकेमुळे गेल्या १५ दिवसांपासून शिवसेना-भाजपा युतीची बोलणी पूर्णपणे थांबल्याची प्रतिक्रिया राजेंद्र चौधरी यांनी दिली. कलानी कुटुंबाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महायुतीची गरज असल्याचे मत साई पक्षाचे जीवन इदनानी यांनी व्यक्त केले. महायुतीची बोलणी नव्याने होऊ शकतात, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली. (प्रतिनिधी)>जागा सोडण्यावर घोळशिवसेना, भाजपा, रिपाइं व साई पक्षाची महायुती झाल्यास साई पक्षाचा ज्या परिसरात प्रभाव आहे. तेथील जागा दोन्ही पक्षांनी सोडाव्या, असी आमची मागणी असल्याचा पुनरूच्चार साई पक्षाचे जीवन ईदनानी यांनी केला. मात्र या जागा कोणी सोडायच्या, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. त्यामुळे जागावाटपात घोळ होणार आहे. त्यामुळे साई पक्षाला सोबत घेऊन युती करणे अवघड असल्याचे शिवसेना, भाजपाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. >आयलानी यांचे मौन : भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी महायुतीबाबत काहीही भाष्य करण्यास नकार दिला. पक्षाच्या निर्णयानंतरच युतीबाबत चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.