शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात महायुती अशक्य

By admin | Updated: January 17, 2017 04:29 IST

रिपाइंशी परस्पर जागावाटप केल्याने शिवसेनेचे नेते प्रचंड नाराज झाले आहेत.

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेत भाजपाचाच महापौर असेल, अशी घोषणा करून रिपाइंशी परस्पर जागावाटप केल्याने शिवसेनेचे नेते प्रचंड नाराज झाले आहेत. यामुळे शिवसेना, भाजपा, रिपाइं आणि साई पक्षातील जागावाटपात घोळ झाला असून आता महायुती अशक्य असल्याचे शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी स्पष्ट केले. भाजपाच्या नेत्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला, तर साई पक्षाने महायुती गरजेची असल्याचे मत मांडले.सध्या महायुतीतील जागावाटपाची चर्चा पूर्णत: थांबली आहे, याकडेही चौधरी यांनी लक्ष वेधले. उल्हासनगर महापालिकेवर गेले दशकभर शिवसेना, भाजप, साई, रिपाइं, अपक्षांची सत्ता आहे. २००७ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती झाली होती आणि प्रत्येकी ३५ व ४० जागांचे वाटप झाले होते. त्यावेळी शिवसेनेचे १६ तर भाजपाचे ११ नगरसेवक निवडून आले. पालिकेवरील सत्तेसाठी स्थानिक पातळीवरील तेव्हाच्या लोकभारती आणि आताच्या साई पक्षासोबत महायुती करून सत्ता काबीज करण्यात आली. त्यावेळी साई पक्षाचे १४ नगरसेवक निवडून आल्याने सत्तेची सूत्रे त्यांच्याकडे गेली होती. त्यांना पहिल्या सव्वा वर्षाचे महापौरपद देण्यात आले. २०१७ च्या निवडणुकीत पुन्हा भाजप-शिवसेना व रिपाइंची महायुती होवून सेना व भाजपने प्रत्येकी ३३ जागांवर तर रिपाइंनी १२ जागांवर निवडणूक लढवली. शिवसेनेचे-२०, भाजपचे-११ तर रिपाइंचे चार नगरसेवक निवडून आले. शिवसेनेने दोन्ही वेळी भाजपापेक्षा कमी जागा लढविल्या. मात्र त्यांचे जादा नगरसेवक निवडून आले. तसेच विजय पाटील, राजेश वानखडे, सुनील सुर्वे यांच्या रूपाने शिवसेनेचे तीन बंडखोर नगरसेवक निवडून आले. पुन्हा सत्तेची चावी आठ नगरसेवक निवडून आलेल्या साई पक्षाकडे गेली. भाजप-शिवसेनेने पुन्हा साई पक्षासोबत महायुती करून पालिकेत सत्ता मिळविली. मात्र महापौरपद साई पक्षाला दिले. आता तर ओमी टीमच्या प्रवेशाच्या चर्चेने व मोदी लाटेने भाजपा फुगल्याची टीका महायुतीच्या अन्य पक्षांत सुरू आहे. त्यामुळेच भाजपाने मित्रपक्ष शिवसेनेला डावलून रिपाइंसोबत परस्पर युती केली आणि १४ जागा त्यांना देऊन टाकल्या. भाजपाच्या भूमिकेने शिवसेनेत नाराजी पसरली असून महायुती अशक्य असल्याचे शिवसेना नेते आणि शिवसैनिक उघडपणे सांगू लागले आहेत. भाजपाच्या याच भूमिकेमुळे गेल्या १५ दिवसांपासून शिवसेना-भाजपा युतीची बोलणी पूर्णपणे थांबल्याची प्रतिक्रिया राजेंद्र चौधरी यांनी दिली. कलानी कुटुंबाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महायुतीची गरज असल्याचे मत साई पक्षाचे जीवन इदनानी यांनी व्यक्त केले. महायुतीची बोलणी नव्याने होऊ शकतात, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली. (प्रतिनिधी)>जागा सोडण्यावर घोळशिवसेना, भाजपा, रिपाइं व साई पक्षाची महायुती झाल्यास साई पक्षाचा ज्या परिसरात प्रभाव आहे. तेथील जागा दोन्ही पक्षांनी सोडाव्या, असी आमची मागणी असल्याचा पुनरूच्चार साई पक्षाचे जीवन ईदनानी यांनी केला. मात्र या जागा कोणी सोडायच्या, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. त्यामुळे जागावाटपात घोळ होणार आहे. त्यामुळे साई पक्षाला सोबत घेऊन युती करणे अवघड असल्याचे शिवसेना, भाजपाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. >आयलानी यांचे मौन : भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी महायुतीबाबत काहीही भाष्य करण्यास नकार दिला. पक्षाच्या निर्णयानंतरच युतीबाबत चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.