शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
5
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
6
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
7
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
8
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
9
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
10
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
11
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
12
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
13
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
14
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
15
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
16
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
17
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
18
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
19
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
20
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी

उल्हासनगरात महायुती अशक्य

By admin | Updated: January 17, 2017 04:29 IST

रिपाइंशी परस्पर जागावाटप केल्याने शिवसेनेचे नेते प्रचंड नाराज झाले आहेत.

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेत भाजपाचाच महापौर असेल, अशी घोषणा करून रिपाइंशी परस्पर जागावाटप केल्याने शिवसेनेचे नेते प्रचंड नाराज झाले आहेत. यामुळे शिवसेना, भाजपा, रिपाइं आणि साई पक्षातील जागावाटपात घोळ झाला असून आता महायुती अशक्य असल्याचे शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी स्पष्ट केले. भाजपाच्या नेत्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला, तर साई पक्षाने महायुती गरजेची असल्याचे मत मांडले.सध्या महायुतीतील जागावाटपाची चर्चा पूर्णत: थांबली आहे, याकडेही चौधरी यांनी लक्ष वेधले. उल्हासनगर महापालिकेवर गेले दशकभर शिवसेना, भाजप, साई, रिपाइं, अपक्षांची सत्ता आहे. २००७ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती झाली होती आणि प्रत्येकी ३५ व ४० जागांचे वाटप झाले होते. त्यावेळी शिवसेनेचे १६ तर भाजपाचे ११ नगरसेवक निवडून आले. पालिकेवरील सत्तेसाठी स्थानिक पातळीवरील तेव्हाच्या लोकभारती आणि आताच्या साई पक्षासोबत महायुती करून सत्ता काबीज करण्यात आली. त्यावेळी साई पक्षाचे १४ नगरसेवक निवडून आल्याने सत्तेची सूत्रे त्यांच्याकडे गेली होती. त्यांना पहिल्या सव्वा वर्षाचे महापौरपद देण्यात आले. २०१७ च्या निवडणुकीत पुन्हा भाजप-शिवसेना व रिपाइंची महायुती होवून सेना व भाजपने प्रत्येकी ३३ जागांवर तर रिपाइंनी १२ जागांवर निवडणूक लढवली. शिवसेनेचे-२०, भाजपचे-११ तर रिपाइंचे चार नगरसेवक निवडून आले. शिवसेनेने दोन्ही वेळी भाजपापेक्षा कमी जागा लढविल्या. मात्र त्यांचे जादा नगरसेवक निवडून आले. तसेच विजय पाटील, राजेश वानखडे, सुनील सुर्वे यांच्या रूपाने शिवसेनेचे तीन बंडखोर नगरसेवक निवडून आले. पुन्हा सत्तेची चावी आठ नगरसेवक निवडून आलेल्या साई पक्षाकडे गेली. भाजप-शिवसेनेने पुन्हा साई पक्षासोबत महायुती करून पालिकेत सत्ता मिळविली. मात्र महापौरपद साई पक्षाला दिले. आता तर ओमी टीमच्या प्रवेशाच्या चर्चेने व मोदी लाटेने भाजपा फुगल्याची टीका महायुतीच्या अन्य पक्षांत सुरू आहे. त्यामुळेच भाजपाने मित्रपक्ष शिवसेनेला डावलून रिपाइंसोबत परस्पर युती केली आणि १४ जागा त्यांना देऊन टाकल्या. भाजपाच्या भूमिकेने शिवसेनेत नाराजी पसरली असून महायुती अशक्य असल्याचे शिवसेना नेते आणि शिवसैनिक उघडपणे सांगू लागले आहेत. भाजपाच्या याच भूमिकेमुळे गेल्या १५ दिवसांपासून शिवसेना-भाजपा युतीची बोलणी पूर्णपणे थांबल्याची प्रतिक्रिया राजेंद्र चौधरी यांनी दिली. कलानी कुटुंबाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महायुतीची गरज असल्याचे मत साई पक्षाचे जीवन इदनानी यांनी व्यक्त केले. महायुतीची बोलणी नव्याने होऊ शकतात, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली. (प्रतिनिधी)>जागा सोडण्यावर घोळशिवसेना, भाजपा, रिपाइं व साई पक्षाची महायुती झाल्यास साई पक्षाचा ज्या परिसरात प्रभाव आहे. तेथील जागा दोन्ही पक्षांनी सोडाव्या, असी आमची मागणी असल्याचा पुनरूच्चार साई पक्षाचे जीवन ईदनानी यांनी केला. मात्र या जागा कोणी सोडायच्या, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. त्यामुळे जागावाटपात घोळ होणार आहे. त्यामुळे साई पक्षाला सोबत घेऊन युती करणे अवघड असल्याचे शिवसेना, भाजपाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. >आयलानी यांचे मौन : भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी महायुतीबाबत काहीही भाष्य करण्यास नकार दिला. पक्षाच्या निर्णयानंतरच युतीबाबत चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.