शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
4
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
5
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
6
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
7
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
8
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
9
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
10
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
12
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
13
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
14
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
15
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
16
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
17
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
18
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
19
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
20
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 

‘म’ मातृभाषेचा

By admin | Updated: February 20, 2015 23:03 IST

जगभरात २१ फेबु्रवारी हा दिवस मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो.

नवी मुंबई : जगभरात २१ फेबु्रवारी हा दिवस मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. १९५२ साली याच दिवशी बांगला भाषेला पाकिस्तानची राष्ट्रभाषा म्हणून मान्यता मिळावी म्हणुन ढाका मधील विद्यार्थ्यांनी तिथल्या सरकार विरोधी निदर्शने करुन आपल्या मातृभाषेसाठी हौताम्य पत्करले आणि म्हणूनच युनेस्कोने हा दिवस आंतरराष्ट्रीय दिन घोषित केला. माणसाच्या दैनंदिन आयुष्यात, त्याच्या वैचारीक जडण-घडणीत मातृभाषेला सर्वात महत्त्वाचे स्थान असते. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणा-या विद्यार्थ्याला जरी इंग्रजीचे पुरेपुर ज्ञान असले तरीही, तो विचार मात्र आपल्या मातृभाषेतच करतो. सध्या टेक्नोसॅव्ही आयुष्य जगणा-या माणसाला आपल्या मातृभाषेचाच विसर पडत चालला आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करणा-या माणसांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कॉलेज कॅम्पसमध्ये मातृभाषेचा वापर केल्यावर त्या विद्यार्थ्यांला कमी लेखण्यात येते. कॉलेजमध्ये हिंदी, इंग्रजीचा वापर न करणा-या विद्यार्थ्याला मग गावठी या शब्दाचा टॅग लावण्यात येतो. हे एक नवीनच खूळ कॅम्पसमध्ये नक्की दिसेल...भाषा म्हणजे काय?या प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर द्यायचे असेल तर....संवाद साधण्याचे एक प्रभावी माध्यम असे देता येईल. वैचारिक देवाण-घेवाण आणि चारचौघात आपली भावना व्यक्त करण्याचे एक माध्यम म्हणजेच भाषा. मग ही भाषा इंग्रजी, हिंदी,मराठी, बंगाली, पंजाबी, तामिळ..अशी कोणतीही असू शकते. खर सागंयचे झाले तर संवादासाठीच भाषेचा शोध लागला असे म्हणायला हरकत नाही. या भाषेत एवढी ताकद आहे की, आज ही आपल्या जीवनशैलीचा एक अतिमहत्त्वाचा भाग होऊन बसली आहे. निरक्षरतेला लढा देण्यासाठी आणि सांस्कृतिक वैविध्य जपण्यासाठी मातृभाषा खूप महत्त्वाची कामगिरी बजावते.भाषेमध्ये एवढे प्रभुत्व आहे की आपल्याला ती व्यक्त करताना कोणीही बंधने घालू शकत नाही...एकंदरीतच ती आपल्या मूल जन्मल्यापासूनच त्याच्यात रुजत जाते. याचे एक उत्तम उदाहरण द्यायचे झाले तर, मराठी घरातल्या एका लहान मुलाला जेव्हा आपण नाच रे मोरा आणि जॉनी जॉनी या दोन्ही वेगवेगळ््या भाषेतल्या कविता एकत्र शिकवतो तेव्हा ते मुलाला नाच रे मोरा हे गाणं जास्त जिव्हाळ््याचे वाटते आणि तो ते पटकन शिकतो. याचेच कारण म्हणजे रोज मराठी शब्द कानावर पडत असल्याने त्याला आपसुकच त्या भाषेविषयी प्रेम वाटू लागते...तर जॉनी जॉनी शिकताना त्याचा नक्की अर्थ काय हे समजून घेण्यापासून त्याला तयार व्हावे लागते.या स्पर्धात्मक युगात शैक्षणिक तसेच व्यावसायिक प्रगतीसाठी आणि गरजेपोटी भाषेचा वापर केला जातो. भाषेकडेही व्यावसायिक आणि वास्तववादी दृष्टीकोनातूनच पाहिले जाते. जाणून घेऊया वेगवेगळ््या वयोगटातील व्यक्तींचे आपल्या मातृभाषेबद्दल काय मत आहे? मराठी या भाषेमध्ये एवढा शब्दभंडार आहे की इतर कोणत्याही भाषेमध्ये आपल्याला एवढी शब्दसंपत्ती पहायला मिळणार नाही. काळानुरुप होणा-या बदलामूळे भाषेचा वापर कमी झाला आहे. मुलांना मराठी भाषेविषयी आवड निर्माण व्हावी म्हणुन वाचन, कविता पठण, म्हणी यांची मी सवय लावली आहे. मी स्वत: सोशल मिडीयाच्या माध्यमातून मराठी शब्दांचाच वापर करते.- अनिता कासारे,शिक्षिका मला मराठी असल्याचा खूप अभिमान वाटतो. सध्या माझ्या सारख्या तरुणांनी पुढाकार घेऊन आपल्या मातृभाषेचे जतन केले पाहिजे. मी स्वत: माझे पदवीचे शिक्षण मराठी भाषेत घेत आहे आणि पुढेही एक चांगली मराठी लेखक व्हायची माझी इच्छा आहे.-शीतल शिंदे, पत्रकारीता विद्यार्थीनीतंत्रज्ञानात झपाट्याने बदल होत आहे आणि त्यामुळे बदलत्या परिस्थितीनुसार भाषा ही बदलणारचं...आणि याचा स्विकार केलाच पाहिचे. संस्कृती बद्दल बोलायच झाले तर मग आजही आपल्याला आपल्या मातृभाषेतली जुनी काव्य, साहित्य, कादंब-या आॅनलाईन वाचता येतात त्यामुळे मातृभाषेबरोबरीनेच इतरही भाषेचे ज्ञान महत्त्वाचे आहे .-प्रसून सहा, नोकरीमातृभाषेविषयी सांगताना मला एक मुद्दा महत्त्वाचा वाटतो तो म्हणजे ,नुसताच शब्दभंडार असून उपयोगी ठरत नाही. आपण वापरलेले शब्द जर समोरच्याला कळलेच नाही तर त्या शब्दश्रीमंतीचा काय उपयोग नाही. यशवंत दिडवाघ , मुक्तपत्रकारसध्याची परिस्थिती पाहता मला आपल़्या मातृभाषेविषयी खूपच खंत वाटते. माझी मातृभाषा उडीया आहे. पण मला सोशल मिडियाशी कनेक्टेड राहायचे असेल तर इंग्रजी येणे आवश्यक आहे आणि माझ्या भाषेत संवाद साधता येत नाही. स्मिता मोहंती, गृहिणीमी सध्या जर्मन भाषा शिकतेय. ही भाषा शिकण्यात मला काही वावगं वाटत नाही. माझ़्या घरात मी आई-बाबांशी संवाद साधण्यासाठी माझी मातृभाषा वापरते हे पुरेसे आहे. मातृभाषा आलीच पाहिचे असे मला वाटते पण त्याचबरोबरीने इतर भाषांचे ज्ञानही तेवढेच महत्त्वाचे आहे. - दीप्ती ठाकुर, विद्यार्थीनीभाषा म्हणजे काय?या प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर द्यायचे असेल तर....संवाद साधण्याचे एक प्रभावी माध्यम असे देता येईल. वैचारीक देवाण-घेवाण आणि चारचौघात आपली भावनौ व्यक्त करण्याचे एक माध्यम म्हणजेच भाषा. मग ही भाषा इंग्रजी,हिंदी, मराठी,बंगाली,पंजाबी,तामिळ..अशी कोणतीही असू शकते. खर सागंयचे झाले तर संवादासाठीच भाषेचा शोध लागला असे म्हणायला हरकत नाही. या भाषेत एवढी ताकद आहे की, आज ही आपल्या जीवशैलीचा एक अतिमहत्त्वाचा भाग होऊन बसली आहे. निरक्षरतेला लढा देण्यासाठी आणि सास्कृंतिक वैविध्य जपण्यासाठी मातृभाषा खूप महत्त्वाची कामगिरी बजावते.असेही म्हटले जाते की आपल्या मातृभाषेत शिकलेला माणूस हा अधिक प्रगल्भपणे विचार करू लागतो. त्याउपर म्हणजे इतर भाषेत झालेले शिक्षण हे आपल्याला इतर जगाची माहिती देण्यास किंवा विचार करावयास लावण्यास अपूर्नच ठरत असते, त्यामुळे मातृभाषेत प्राथमिक अवस्थेतील झालेले शिक्षण हेच पूरक शिक्षण मानले जाते.