शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

‘लाडक्या बहिणीं’ना हवे स्वाभिमानाचे भरलेले ताट

By संदीप प्रधान | Updated: October 14, 2024 12:06 IST

गोरगरीब लाडक्या बहिणींना महागाई व बेरोजगारी या दोन समस्या प्रामुख्याने भेडसावत आहेत. सध्या अनेक जणींकडे अर्धवेळ रोजगार आहे; मात्र त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांचे भागत नाही.

संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक

महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस स्वाभिमानी आहे. कुणाच्याही दारात फुकट भाकरीचे तुकडे मोडायला त्याला आवडत नाही. याचाच प्रत्यय मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ठाण्यात झालेल्या जाहीर कार्यक्रमात आला. सभेला आलेल्या बहुतांश बहिणींशी संवाद साधला असता सरकार आम्हाला दरमहा दीड हजार रुपये देतेय त्याचा आनंद आहे; पण आम्हाला पूर्णवेळ रोजगार द्या, अशी मागणी बहिणींनी केली.  लाडक्या बहिणींना स्वाभिमानाने जगायचे असेल तर त्यांच्या तशा जगण्याचा बंदोबस्त सरकारने करायला हवा.

गोरगरीब लाडक्या बहिणींना महागाई व बेरोजगारी या दोन समस्या प्रामुख्याने भेडसावत आहेत. सध्या अनेक जणींकडे अर्धवेळ रोजगार आहे; मात्र त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांचे भागत नाही. भाजीपाला व रोजच्या जेवणातील डाळी, कडधान्ये यांचे दर चढे आहेत. कधी कांदा तर कधी लसूण भडकतो. सरकार देत असलेल्या पैशांमुळे अनेकींना आधार मिळालाय; परंतु हा कायमस्वरूपी मार्ग नाही, याची जाणीव त्यांना आहे. सरकारने दिलेल्या पैशांतून अनेकींनी मुलांची फी भरली. रेशनवरील धान्य भरले. क्वचित एखाद्या बहिणीने साडी खरेदी केली. दिवाळीत पोराबाळांना कपडे करावेत याकरिता बँक खात्यात पैसे जमा करणाऱ्याच अधिक आहेत. महात्मा जोतिबा फुले यांनी म्हटलंय की, घरातील बाई शिकली तर घराचा उद्धार होतो. जर या महिलांना रोजगार मिळाला तर अनेक घरातील मुलांचे शिक्षण मार्गी लागेल. मुले चांगली शिकली व भविष्यात त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर केले तर कुटुंबाची आर्थिक हलाखी संपुष्टात येईल.

महाराष्ट्रातील शहरी बेरोजगारीचा दर २०१८-१९ मध्ये ६.३ टक्के होता. तो २०२०-२१ मध्ये ६.५ टक्के झाला. गेल्या दोन वर्षांत राज्यात दररोज सरासरी दोनजण बेरोजगारीमुळे आत्महत्या करीत आहेत. २०२० मध्ये महाराष्ट्रात ६२५ जणांनी बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केली. २०२१ मध्ये देशात बेरोजगारीमुळे ३५४१ जणांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी ७९६ महाराष्ट्रातील होते. २०२२ मध्ये देशात बेरोजगारीमुळे ३१७० लोकांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी ६४२ महाराष्ट्रातील होते. तरुणांच्या बेरोजगारीचा दर २०२०-२१ मध्ये १२.९ टक्के होता. २०२१-२२ मध्ये तो १२.४ टक्के होता. २०२२-२३ मध्ये तो १० टक्के होता.

२०१८ ते २०२४ मधील तरुणांच्या बेरोजगारीचा सरासरी दर ८.१७ टक्के होता. देशातील एकूण बेरोजगारांपैकी ८३ टक्के तरुण आहेत, असे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आणि इन्स्टिट्यूट फॉर ह्युमन डेव्हलपमेंटच्या अहवालात नमूद केले आहे. देशातील श्रमशक्तीत महिलांचा सहभाग २००० ते २०१९ या काळात १४.४ टक्क्यांनी कमी झाला. २०२२ मध्ये पूर्णवेळ काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण ३२.८ टक्के होते तर पुरुषांचे प्रमाण ७९.२ टक्के होते. आम्हाला पूर्णवेळ काम द्या ही कैफियत लाडक्या बहिणींनी मांडण्याचे हेच कारण आहे. कोरोना काळात लोकांच्या रोजगारावर जी गदा आली त्यातून अजूनही लक्षावधी कुटुंबे सावरलेली नाहीत. पाच किलो धान्य व पंधराशे रुपयांचे आकर्षण आहेच; परंतु सोशल मीडियामुळे सुखी जीवनाच्या आशा-आकांक्षा वाढलेल्यांना मदतीची खिरापत नव्हे तर सुग्रास भोजनाचे ताट हवे आहे.

टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाNarendra Modiनरेंद्र मोदीWomenमहिला