शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
2
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
3
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
4
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
5
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
6
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
7
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
8
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
9
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
10
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
11
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
12
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
13
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
14
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
15
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
16
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
17
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
18
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
19
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

‘लव्ह’चा ‘जिहाद’शी काहीही संबंध नाही - ओवेसी

By admin | Updated: September 13, 2014 04:39 IST

लव्ह’चा ‘जिहाद’शी काहीही संबंध नसल्याचे वक्तव्य आॅल इंडिया मजलिस ए इत्तेहादउल मुसलमीन संघटनेचे नेते आणि आमदार अकबरूद्दीन ओवेसी यांनी येथे केले

मुंबई : ‘लव्ह’चा ‘जिहाद’शी काहीही संबंध नसल्याचे वक्तव्य आॅल इंडिया मजलिस ए इत्तेहादउल मुसलमीन संघटनेचे नेते आणि आमदार अकबरूद्दीन ओवेसी यांनी येथे केले. नागपाडा येथे शुक्रवारी रात्री झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. ओवेसी यांचे भाषण ऐकण्यास हजारोंच्या संख्येने जनसमुदाय लोटला होता.या वेळी ओवेसी म्हणाले, ‘प्रेमाशी जिहादचा संबंध जोडणारे योगी आदित्यनाथ कोणत्या काळात जगत आहेत? मोघल काळात राणी जोधा आणि राजा अकबर यांनी लग्न केले, त्यावेळी अकबर या मुस्लिम कुटुंबाने हिंदू सुनेचा स्वीकार केला. त्यावेळी यांनी टीका केली नाही. आता मात्र घाणेरडे राजकारण करत या मुद्द्याचा प्रचारासाठी वापर करीत आहेत.’दरम्यान भारतीय जनता पार्टीवर टीका करताना ओवेसी म्हणाले, ‘केंद्रात भाजपा सरकार आल्यापासून बेरोजगारी, महागाई आणि गरिबी हे मुद्दे दूर झाले आहेत,’ ‘देश हिंदूंचा आहे’, ‘सर्व भारतीय हिंदू आहेत’, अशी मुस्लिमविरोधी वक्तव्ये करण्यातच भाजपा धन्यता मानत आहे.’राज्यात निवडणूक लढून येथील मुस्लिम उमेदवारांना पाडण्याचा एआयएमआयएमचा इरादा नाही. शिवाय महायुतीच्या उमेदवारांना जिंकून देण्याचा पक्षाचा मानस नाही. तर येथील मुस्लिम समाजाला एकत्र आणून न्याय मिळवून देण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुस्लिम मतांशिवायही जिंकण्याचा दावा करणाऱ्यांना आपली शक्ती मतपेटीतून दाखवून देण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यासाठी प्रथम सर्व मुस्लिमांनी मतदार यादीतील नाव तपासून नाव नोंदणी करण्याचे आवाहनही ओवेसी यांनी केले. (प्रतिनिधी)