शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
2
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
3
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
5
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
6
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
7
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
8
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
9
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
10
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
11
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
12
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
13
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
14
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
15
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
16
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
17
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
18
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
19
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
20
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”

वाढीव पदव्युत्तर जागा गमावल्या

By admin | Updated: October 27, 2015 02:20 IST

रक्तातील विविध घटक वेगळे करणारे गेली सात वर्षे बंद पडलेले यंत्र दुरुस्त न केल्याने किंवा ३०-३५ लाख रुपये खर्च करून नवे यंत्र न घेतल्याने यवतमाळ येथील वसंतराव

मुंबई : रक्तातील विविध घटक वेगळे करणारे गेली सात वर्षे बंद पडलेले यंत्र दुरुस्त न केल्याने किंवा ३०-३५ लाख रुपये खर्च करून नवे यंत्र न घेतल्याने यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या जागा वाढवून घेण्यात किंवा असलेल्या जागांना मान्यता मिळविण्यात वारंवार अपयश आले आहे.मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या नव्या नियमांनुसार पदव्युत्तर जागा वाढविण्यासाठी किंवा त्यांना मान्यता मिळण्यासाठी संबंधित वैद्यकीय महाविद्यालयाकडे असे रक्त विश्लेषक यंत्र असणे ही बाब अनिवार्य आहे. हे यंत्र रक्तातील प्लेटलेट, प्लाझ्मा व लाल रक्तपेशी असे घटक वेगळे करते. यामुळे रुग्णांना प्रत्येक वेळी सर्व रक्त न देता त्यातील घटक गरजेनुसार देणे शक्य होते. परंतु यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील असे यंत्र सन २००८पासून नादुरुस्त असल्याने या महाविद्यालयाचे पदव्युत्तर जागा वाढविण्याचे किंवा आधीपासून असलेल्या जागांची मान्यता पुढे सुरू ठेवण्याचे प्रस्ताव मेडिकल कौन्सिलकडून वारंवार फेटाळण्यात आले आहेत. गेल्याच वर्षी स्त्रीरोग, बालरोग आणि नेत्ररोग विभागांमध्ये प्रत्येकी एक वाढीव पदव्युत्तर जागेचा प्रस्ताव प्रामुख्याने याच कारणावरून अमान्य झाला होता. यवतमाळ कॉलेजमध्ये असे यंत्र १९८९मध्ये घेतले गेले. परंतु कर्मचाऱ्यांनी काळजीपूर्वक न वापरल्याने ते वारंवार बिघडू लागले व २००८मध्ये पूर्णपणे बंद पडले. अशा प्रकारच्या नव्या यंत्राला ३० ते ३५ लाख रुपये खर्च येतो. परंतु राज्य सरकारने गेली इतकी वर्षे काहीच हालचाल न केल्याने त्याचा फटका रुग्णांना व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांनाही बसत आहे.या भागात आदिवासींची लोकसंख्या मोठी आहे व तेथे डेंग्यूचाही प्रादुर्भाव आहे. त्यामुळे शेकडो रुग्णांना प्लेटलेट देण्याची गरज भासते. परंतु शासकीय इस्पितळात ही सोय नसल्याने प्लेटलेट घेण्याऐवजी गरज नसताना संपूर्ण रक्त घ्यावे लागते. ज्यांना फक्त प्लेटलेट हव्या असतात त्यांना त्यासाठी खासगी रुग्णालयांत पाठविले जाते. एका पिशवीसाठी १,४०० रुपये मोजावे लागतात.एका राष्ट्रीय योजनेअंतर्गत स्टेट ब्लड ट्रान्स्फ्युजन कौन्सिलने राज्यातील सर्व १४ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांना अशी रक्ताचे पृथक्करण करणारी यंत्र पुरविणे अपेक्षित होते. परंतु गेल्या वर्षभरात त्या दिशेने काहीच झालेले नाही. आता राज्याच्या अर्थसंकल्यात तरतूद करून ती घ्यावी लागतील. ती घेतल्यावर पहिले यंत्र यवतमाळला दिले जाईल.- डॉ. प्रवीण शिंगारे,वैद्यकीय शिक्षण संचालक