शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

राज्यावर ‘प्रभू’कृपा होईना!

By admin | Updated: July 10, 2015 02:19 IST

राज्य सरकारने ५० टक्के निधी देण्याची तयारी दाखवलेल्या तीन रेल्वे प्रकल्पांना मान्यता देणे दूर राहिले, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे नवनवीन प्रकल्पांच्या घोषणा करीत आहे

मुंबई : राज्य सरकारने ५० टक्के निधी देण्याची तयारी दाखवलेल्या तीन रेल्वे प्रकल्पांना मान्यता देणे दूर राहिले, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे नवनवीन प्रकल्पांच्या घोषणा करीत आहे. प्रभूंच्या अवकृपेने महाराष्ट्रातील सरकार खट्टू झालेले असतानाच ‘प्रभू’कृपा झालेल्या प्रकल्पांकरिता कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने कर्ज काढण्याचे ठरवले आहे.महाराष्ट्रातील आठ रेल्वे प्रकल्पांकरिता ५० टक्के रक्कम देण्याचे राज्य सरकारने ठरवले असून, त्याकरिता खर्च होणाऱ्या ११ हजार ५०० कोटी रुपयांपैकी निम्मी रक्कम सुमारे ५ हजार कोटी रुपये मंजूर केले आहे. या आठ प्रकल्पांपैकी पाच प्रकल्पांना रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असली तरी पुणे-नाशिक, मनमाड-धुळे-इंदौर, गडचांदूर-आदिलाबाद या तीन प्रकल्पांना रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिलेली नाही. हे प्रकल्प महाराष्ट्रातील प्रवाशांकरिता महत्त्वाचे असल्याचे वारंवार रेल्वेमंत्री व मंत्रालय यांच्या निदर्शनास आणूनही ‘प्रभू’कृपा होण्याची चिन्हे दिसत नाहीत.रेल्वेमंत्री झाल्यापासून प्रभू यांनी को.रे.चे दुपदरीकरण, विद्युतीकरण, सावंतवाडी टर्मिनलचे भूमिपूजन आणि कराड-चिपळूण मार्ग यांची घोषणा केली. राज्याच्या आठ प्रकल्पांच्या यादीत केवळ कराड-चिपळूणचा समावेश आहे.सावंतवाडी टर्मिनससाठी २०० कोटींचा खर्च अपेक्षित असून, हा खर्च कोकण रेल्वे स्वत: करणार आहे; तर दुपदरीकरण व विद्युतीकरणाचा एकूण खर्च १० हजार कोटी रुपये आहे, अशी माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक भानू तायल यांनी दिली. विद्युतीकरणावर ७५० कोटींचा खर्च आहे. प्रायोगिक तत्त्वावर ५० कि.मी. दुपदरीकरणासाठी ३०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.