शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
3
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
4
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
5
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
6
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
7
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
8
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
9
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
10
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
11
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
12
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
13
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
14
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
15
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
16
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
17
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
18
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!
19
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
20
Tarot Card: पुढच्या आठवड्यात येणार गणपती बाप्पा, कुठल्याही परिस्थितीत, तोच दाखवेल मार्ग सोप्पा

खाणकामगारांच्या भटक्या मुलांना शिक्षणाचे ‘वळण’

By admin | Updated: December 6, 2015 02:30 IST

भटकंती आणि स्थलांतर हे कामाच्या निमित्ताने जगण्याशीच बांधलेलं... पण निदान आपली नातवंडं आणि त्यांच्यासारखीच खाणकामगारांची मुलं शिक्षणाशी जोडता आली तर..?

- प्रवीण गायकवाड,  शिरूर (पुणे)भटकंती आणि स्थलांतर हे कामाच्या निमित्ताने जगण्याशीच बांधलेलं... पण निदान आपली नातवंडं आणि त्यांच्यासारखीच खाणकामगारांची मुलं शिक्षणाशी जोडता आली तर..? या विचाराने ६५ वर्षांचा ‘तरुण’ नव्या उभारीने जागा झाला आणि प्रयत्नांची मोट बांधली. त्यांच्या प्रयत्नांतूनच कर्डेलवाडीच्या शाळेमध्ये आता खाणकामगारांची २३ मुले नियमित शिक्षण घेऊ लागली आहेत. सुभाष कुसाळकर हे ६५ वर्षांचे खाणकामगार गेल्या १२ वर्षांपासून कर्डेलवाडी (ता. शिरूर) येथे रघुनाथ कर्डिले यांच्या दगडखाणीवर काम करतात. कुसाळकरांच्या पाहण्यात कर्डेलवाडी जिल्हा परिषद शाळा आली. आपण शिकलो नाही; मात्र आपली नातवंडे, समाजाची इतर मुले शिकली तर पुढची पिढी शिक्षणाच्या प्रवाहात येईल, असे कुसाळकर यांना जाणवले.खाणमालक कर्डिले यांनीही कुसाळकरांच्या इच्छेला वाट करून दिली. यामुळे कुसाळकर यांनी नाशिक व बुलढाणा येथे असलेल्या आपल्या कुटुंबाला कर्डेलवाडी येथे बोलावून घेतले. भटकंतीचा नाद सोडून मुलांसाठी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यापासून प्रेरणा घेत इतर खाणकामगारांनीही हाच मार्ग अवलंबला. आता या २३ मुलांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. तीन महिन्यांतच त्यांच्यात झालेला बदल वाखाणण्याजोगा आहे. शिक्षणामुळे त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.अन् मुलं लिहू-वाचू लागली!शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय सकट व राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षिका बेबीनंदा सकट या दाम्पत्याने मोठ्या आनंदाने या मुलांना शाळेत प्रवेश दिला. तीन मुले दुसरीत आहेत, तर इतर पहिल्या इयत्तेत शिक्षण घेताहेत.तीन महिन्यांतच या मुलांना लिहिता-वाचता येऊ लागले असून, त्यांचे अक्षरही वळणदार होऊ लागले आहे. एक दिवसही ते शाळेला दांडी मारत नाहीत.