शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

केंद्राच्या पॅकेजकडे नजरा

By admin | Updated: November 17, 2014 00:36 IST

ऊसदर प्रश्न : शासनाच्या मदतीशिवाय एफ. आर. पी. देणे अशक्य

कोल्हापूर : साखरेच्या घसरलेल्या दरामुळे एफ. आर. पी.प्रमाणे दर देणे साखर कारखान्यांना अवघड असल्याने राज्यातील सर्वच कारखान्यांच्या नजरा आता राज्य व केंद्र शासनांच्या पॅकेजकडे लागल्या आहेत. शासनाच्या मदतीशिवाय दर देणे अशक्य असल्याने ऊसदर नियामक मंडळाच्या बैठकीतही ठोस निर्णय होऊ शकला नाही. राज्यातील बहुतांश साखर कारखाने सुरू झाले आहेत. यंदा ऊसदर नियामक मंडळाची स्थापना झाल्याने गेल्या बारा वर्र्षांत प्रथमच ऊसदराच्या आंदोलनाशिवाय कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. साखरेचे दर गेल्यावर्षीप्रमाणेच घसरल्याने राज्य बॅँकेचे साखर पोत्याचे मूल्यांकन कमी झाले आहे. राज्य बॅँकेने एका पोत्याचे मूल्यांकन २६३० रूपये केले आहे. त्यातील ८५ टक्के उचल बॅँक कारखान्यांना देणार आहे. त्यातून ऊसतोडणी, वाहतूक व उत्पादनखर्च वजा जाता शेतकऱ्यांना देण्यासाठी १४०० ते १५०० रुपयेच राहणार आहेत. राज्यातील कारखान्यांची एफ. आर. पी. सरासरी २२०० ते २६०० रूपयांपर्यंत असल्याने उर्वरित रक्कम कोठून उपलब्ध करायची, या चिंतेत कारखानदार आहेत. यावरूनच काल, शनिवारी ऊसदर नियामक मंडळाची झालेली बैठक निष्फळ ठरली. अशा कितीही बैठका घेतल्या, तरी दराचा गुंता सुटणार नाही, हे निश्चित आहे. मोलॅसिस, बगॅसचे पैसे लगेच मिळणार नाहीत. महिन्या-दीड महिन्यानंतर यातून कारखान्यांना पैसे उपलब्ध होणार आहेत; पण आता बिले द्यायची कशी, असा पेच कारखान्यांसमोर असल्यामुळे एफ. आर. पी.प्रमाणे दर देण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने प्रतिटन किमान पाचशे रूपये मदत देणे गरजेचे आहे. कर्ज फेडणार कसे ?गेल्या वर्षी केंद्र शासनाकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते आगामी हंगामापासून सुरू होणार आहेत. त्यातच यावर्षीच्या एफ. आर. पी.साठी कर्ज घ्यायचे म्हटले, तर कारखाने आर्थिक अरिष्टात येण्यास वेळ लागणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. केंद्र शासनाने द्विस्तरीय साखरेचे दर ठरविले पाहिजेत. घरगुती व उद्योगासाठी, असे दोन दर ठरविले, तर हा प्रश्नच येणार नाही. यासंबंधी खासदार धनंजय महाडिक यांच्याशी चर्चा झालेली असून, ते संसदेत हा प्रश्न लावून धरणार आहेत. - पी. जी. मेढे (तज्ज्ञ संचालक, राजाराम साखर कारखाना)असे झाले विभागनिहाय गाळपविभागकारखाने सुरूगाळप टनसाखर उत्पादनउतारा टक्केवारीलाख क्विंटल पुणे४०१८.०९१६.४२९.०८अहमदनगर१६३.९९३.०९७.८०कोल्हापूर१२१.४१०.६९४.८०औरंगाबाद१०१.४५०.२२१.५४नांदेड९२.८५१.९१६.८२