शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांवर ‘सायबर सेल’ ठेवणार नजर

By admin | Updated: January 23, 2017 21:07 IST

‘सोशल मिडीया’च्या माध्यमातून उमेदवार कसा प्रचार करत आहेत, यावर आयोगाची बारीक नजर राहणार आहे. विशेष म्हणजे ‘सायबर सेल’च्या माध्यमातूनदेखील उमेदवारांच्या ‘आॅनलाईन’ प्रचारावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

उमेदवारांवर ‘सायबर सेल’ ठेवणार नजर
‘सोशल मिडीया’वर निवडणूक आयोगाची बारीक नजर : जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांच्या नेतृत्वात विशेष समिती स्थापन
 
नागपूर : आगामी महानगरपालिका निवडणूकांसाठी उमेदवारांसोबतच निवडणूक आयोगदेखील सज्ज आहे. निवडणूकांच्या प्रचारपद्धतीत काळानुरुप प्रचंड बदल झाले असून ‘सोशल मिडीया’ला विशेष महत्त्व आले आहे. ‘सोशल मिडीया’च्या माध्यमातून उमेदवार कसा प्रचार करत आहेत, यावर आयोगाची बारीक नजर राहणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांच्या नेतृत्वात विशेष समितीदेखील स्थापन करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ‘सायबर सेल’च्या माध्यमातूनदेखील उमेदवारांच्या ‘आॅनलाईन’ प्रचारावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
मनपा निवडणुकीचे बिगुल वाजू लागले असून, सर्वच पक्षांनी प्रचाराची तयारी सुरू केली आहे. मतदारराजापर्यत पोहचण्यासाठी सोशल मीडियाचा जोरदार वापर राजकीय पक्ष करत आहेत.‘ सोशल मिडिया’ व ‘मोबाईल अ‍ॅप्स’ वापरणाºयांची संख्याही प्रचंड वाढल्याने यावेळचा प्रचार हा असा बहुरंगी बनला आहे. ‘टेक्नो- सॅव्ही’ मतदारांपर्यंत पोचणे सुलभ असल्याने सर्वच पक्ष व बहुतांश उमेदवार आता ‘हाय-टेक’ प्रचारावर भर देणार आहेत.
सोशल मीडियाच्या वाढत्या वापराची दखल निवडणूक आयोगानेही घेतली आहे. उमेदवारांनी त्यांच्या ई-मेल खात्याचा तपशील आणि सोशल मीडियावर वावर असल्यास संबंधित खात्यांची पूर्ण माहिती देणे आयोगाने बंधनकारक केले आहे. त्याचप्रमाणे प्रचारासाठी केल्या जाणाºया जाहिरातींमध्ये इंटरनेट व सोशल मीडियावर केलेल्या जाहिरातींचा खर्च समाविष्ट करण्याचा स्पष्ट उल्लेख आयोगाने केला आहे.
प्रचारादरम्यान ‘सोशल मिडीया’चे महत्त्व लक्षात घेता निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांच्या नेतृत्वात विशेष समितीची स्थापना केली आहे. ‘सायबर सेल’च्या माध्यमातून उमेदवारांच्या ‘आॅनलाईन’ खात्यांवर नजर ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी दिली. निवडणूक आयोगाकडे याचा नियमित अहवाल सादर करावा लागणार आहे.
 
आरोप-प्रत्यारोपांवरदेखील राहणार ‘वॉच’
निवडणुकांदरम्यान प्रचाराची रणनिती म्हणून उमेदवारांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपदेखील होतात.‘सोशल मिडीया’च्या माध्यमातून प्रचारादरम्यान कुणावर चिखलफेक करण्यात येत आहे का व आचारसंहितेचे उल्लंघन होत आहे का यावरदेखील समितीचे विशेष लक्ष राहणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर विशेष ‘सायबर सेल’देखील स्थापन करण्यात आला आहे.