शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

उमेदवारांवर ‘सायबर सेल’ ठेवणार नजर

By admin | Updated: January 23, 2017 21:07 IST

‘सोशल मिडीया’च्या माध्यमातून उमेदवार कसा प्रचार करत आहेत, यावर आयोगाची बारीक नजर राहणार आहे. विशेष म्हणजे ‘सायबर सेल’च्या माध्यमातूनदेखील उमेदवारांच्या ‘आॅनलाईन’ प्रचारावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

उमेदवारांवर ‘सायबर सेल’ ठेवणार नजर
‘सोशल मिडीया’वर निवडणूक आयोगाची बारीक नजर : जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांच्या नेतृत्वात विशेष समिती स्थापन
 
नागपूर : आगामी महानगरपालिका निवडणूकांसाठी उमेदवारांसोबतच निवडणूक आयोगदेखील सज्ज आहे. निवडणूकांच्या प्रचारपद्धतीत काळानुरुप प्रचंड बदल झाले असून ‘सोशल मिडीया’ला विशेष महत्त्व आले आहे. ‘सोशल मिडीया’च्या माध्यमातून उमेदवार कसा प्रचार करत आहेत, यावर आयोगाची बारीक नजर राहणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांच्या नेतृत्वात विशेष समितीदेखील स्थापन करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ‘सायबर सेल’च्या माध्यमातूनदेखील उमेदवारांच्या ‘आॅनलाईन’ प्रचारावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.
मनपा निवडणुकीचे बिगुल वाजू लागले असून, सर्वच पक्षांनी प्रचाराची तयारी सुरू केली आहे. मतदारराजापर्यत पोहचण्यासाठी सोशल मीडियाचा जोरदार वापर राजकीय पक्ष करत आहेत.‘ सोशल मिडिया’ व ‘मोबाईल अ‍ॅप्स’ वापरणाºयांची संख्याही प्रचंड वाढल्याने यावेळचा प्रचार हा असा बहुरंगी बनला आहे. ‘टेक्नो- सॅव्ही’ मतदारांपर्यंत पोचणे सुलभ असल्याने सर्वच पक्ष व बहुतांश उमेदवार आता ‘हाय-टेक’ प्रचारावर भर देणार आहेत.
सोशल मीडियाच्या वाढत्या वापराची दखल निवडणूक आयोगानेही घेतली आहे. उमेदवारांनी त्यांच्या ई-मेल खात्याचा तपशील आणि सोशल मीडियावर वावर असल्यास संबंधित खात्यांची पूर्ण माहिती देणे आयोगाने बंधनकारक केले आहे. त्याचप्रमाणे प्रचारासाठी केल्या जाणाºया जाहिरातींमध्ये इंटरनेट व सोशल मीडियावर केलेल्या जाहिरातींचा खर्च समाविष्ट करण्याचा स्पष्ट उल्लेख आयोगाने केला आहे.
प्रचारादरम्यान ‘सोशल मिडीया’चे महत्त्व लक्षात घेता निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांच्या नेतृत्वात विशेष समितीची स्थापना केली आहे. ‘सायबर सेल’च्या माध्यमातून उमेदवारांच्या ‘आॅनलाईन’ खात्यांवर नजर ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी दिली. निवडणूक आयोगाकडे याचा नियमित अहवाल सादर करावा लागणार आहे.
 
आरोप-प्रत्यारोपांवरदेखील राहणार ‘वॉच’
निवडणुकांदरम्यान प्रचाराची रणनिती म्हणून उमेदवारांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपदेखील होतात.‘सोशल मिडीया’च्या माध्यमातून प्रचारादरम्यान कुणावर चिखलफेक करण्यात येत आहे का व आचारसंहितेचे उल्लंघन होत आहे का यावरदेखील समितीचे विशेष लक्ष राहणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर विशेष ‘सायबर सेल’देखील स्थापन करण्यात आला आहे.