शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
4
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
5
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
6
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
7
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
8
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
9
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
10
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
11
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
12
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
13
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
14
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
15
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
16
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
17
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
19
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
20
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल

स्कूल बॅगच्या ओझ्यावर करडी नजर

By admin | Updated: January 14, 2016 02:26 IST

स्कूल बॅगचे ओझे कमी करण्यासंदर्भात शासन निर्णय काढण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. त्यामुळे यासंदर्भातील जनहित याचिका निकाली काढावी,

मुंबई : स्कूल बॅगचे ओझे कमी करण्यासंदर्भात शासन निर्णय काढण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. त्यामुळे यासंदर्भातील जनहित याचिका निकाली काढावी, अशी मागणी राज्य सरकारने उच्च न्यायालयाकडे केली. प्रत्यक्षात समितीने केलेल्या शिफारसीची अंमलबजावणी करण्यात येते की नाही हे पाहायचे आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढण्यास नकार दिला.विद्यार्थ्यांच्या वयाच्या व वजनाच्या मानाने त्यांच्या खांद्यावर असलेल्या दप्तराचे ओझे अधिक असल्याने त्यांना अनेक विकार जडतात. त्यामुळे त्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्य सरकारला आवश्यक ते आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका चेंबूरच्या स्वाती पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठापुढे होती.बुधवारच्या सुनावणीवेळी सरकारी वकील अंजली हेळेकर यांनी दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शासन निर्णय काढण्यात आला आहे आणि त्याची अंमलबजावणीही सुरू आहे. याचिकाकर्त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत, त्यामुळे ही याचिका निकाली काढावी, अशी विनंती खंडपीठाला केली होती. (प्रतिनिधी) निर्णयानंतर दुर्लक्ष होतेकोणत्याही बाबतीत शासन निर्णय काढणे, ही सरकारची पहिली पायरी असते. त्यानंतर ते त्याकडे दुर्लक्ष करतात. त्याची अंमलबजावणी केलीच जात नाही. दप्तराचे ओझे कमी करण्यासंदर्भात समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी प्रत्येक शाळा करते की नाही, हे आम्हाला पाहायचे आहे. त्यामुळे आम्ही ही याचिका निकाली काढणार नाही, असे म्हणत खंडपीठाने याचिका निकाली काढण्याची सरकारची विनंती फेटाळली.