शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

स्कूल बॅगच्या ओझ्यावर करडी नजर

By admin | Updated: January 14, 2016 02:26 IST

स्कूल बॅगचे ओझे कमी करण्यासंदर्भात शासन निर्णय काढण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. त्यामुळे यासंदर्भातील जनहित याचिका निकाली काढावी,

मुंबई : स्कूल बॅगचे ओझे कमी करण्यासंदर्भात शासन निर्णय काढण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. त्यामुळे यासंदर्भातील जनहित याचिका निकाली काढावी, अशी मागणी राज्य सरकारने उच्च न्यायालयाकडे केली. प्रत्यक्षात समितीने केलेल्या शिफारसीची अंमलबजावणी करण्यात येते की नाही हे पाहायचे आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढण्यास नकार दिला.विद्यार्थ्यांच्या वयाच्या व वजनाच्या मानाने त्यांच्या खांद्यावर असलेल्या दप्तराचे ओझे अधिक असल्याने त्यांना अनेक विकार जडतात. त्यामुळे त्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्य सरकारला आवश्यक ते आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका चेंबूरच्या स्वाती पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठापुढे होती.बुधवारच्या सुनावणीवेळी सरकारी वकील अंजली हेळेकर यांनी दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शासन निर्णय काढण्यात आला आहे आणि त्याची अंमलबजावणीही सुरू आहे. याचिकाकर्त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत, त्यामुळे ही याचिका निकाली काढावी, अशी विनंती खंडपीठाला केली होती. (प्रतिनिधी) निर्णयानंतर दुर्लक्ष होतेकोणत्याही बाबतीत शासन निर्णय काढणे, ही सरकारची पहिली पायरी असते. त्यानंतर ते त्याकडे दुर्लक्ष करतात. त्याची अंमलबजावणी केलीच जात नाही. दप्तराचे ओझे कमी करण्यासंदर्भात समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी प्रत्येक शाळा करते की नाही, हे आम्हाला पाहायचे आहे. त्यामुळे आम्ही ही याचिका निकाली काढणार नाही, असे म्हणत खंडपीठाने याचिका निकाली काढण्याची सरकारची विनंती फेटाळली.