शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, पोलीस तपासात संतापजनक प्रकार उघड
5
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
6
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
7
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
8
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
9
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
10
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
11
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
12
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
13
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
14
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
15
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
16
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
17
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
18
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
19
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
20
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी

शेतक-यांना कजर्मुक्त करा - उध्दव ठाकरे

By admin | Updated: May 4, 2016 12:44 IST

शासनाने शेतक-यांना कर्जावरील व्याजमाफी दिली ही चांगली बाब आह़े परंतु, यंदा पेरण्या झाल्या नाहीत़ त्यामुळे शेतकरी खचला आह़े.

ऑनलाइन लोकमत 

लातूर, दि. ४ -  शासनाने शेतक-यांना कर्जावरील व्याजमाफी दिली ही चांगली बाब आह़े परंतु, यंदा पेरण्या झाल्या नाहीत़ त्यामुळे शेतकरी खचला आह़े शिवाय, त्याच्यावर कर्जाचा डोंगरही आह़े केंद्र व राज्य शासनाने विचार विनिमय करुन शेतक-यांना एकदाचे कजर्मुक्त कराव़े, असे आवाहन  शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बुधवारी दुपारी येथे कले. 
 
शिवसेनेच्या वतीने लातूर शहर व जिल्ह्यात ५० टँकरने मोफत पाणीपुरवठा तसेच तीन हजार पाण्याच्या टाक्यांचे लोकार्पण उध्दव यांच्या हस्ते बुधवारी लातुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे झाल़े याप्रसंगी ते बोलत होत़े दुष्काळ निवारणासाठी शासनाला सूचना करण्यास काही हरकत नाही़ परंतु, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसेल तर पावसाळी अधिवेशनात जाब विचारता येईल, असेही उध्दव म्हणाल़े.
 
मी भाषणासाठी आलेलो नाही, भाषणाने तहान भागत नाही़ मी दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या मराठवाडय़ातील जनतेला भेटायला आणि दिलासा द्यायला आलो आह़े भाषणो करणारे दुसरे आहेत़ आम्ही कोरडा दिलासा देत नाही अन दुष्काळावर राजकारणही करत नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.  राज्यातील ३३ कोटी जनता दुष्काळाच्या खाईत होरपळत आह़े त्यांना या दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न आहेत़ शेतक-यांच्या मुलींचे कन्यादान तसेच जलसंधारणाच्या कामाचा लोकवाटा शिवसेनेने भरलेला आह़े शिवसेना नुसतीच बडबड करीत नाही तर प्रत्यक्ष मदत करुन दुष्काळातून जनतेला सावरण्याचा प्रयत्न करीत आह़े सामाजिक बांधिलकीतून शिवसेनेचे काम सुरु आह़े असे काम कोणता राजकीय पक्ष दुष्काळात करीत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
 
सरकार कुठे कमी पडले त्यावर नंतर बोलू़
गेल्या १३७ वर्षात सर्वात उष्ण वर्ष यंदाचे आह़े. शिवाय, गेल्या सहा वर्षापासून पजर्न्यमान कमी झाल्याने मराठवाडाच काय, राज्यच दुष्काळात होरपळत आह़े  हा दुष्काळ निवारण करण्यास सरकार कुठे कमी पडले, यावर नंतर बोलू़ विरोधकांनाही पावसाळी अधिवेशनात बोलता येईल़ पण सध्या दुष्काळातून सावरण्यासाठी सर्वानी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे उध्दव ठाकरे म्हणाले.
 
विदर्भाकडे महाराष्ट्राचे नेतृत्व
मराठवाडा संयुक्त महाराष्ट्राच्या विचारांचा आहे. त्यामुळे स्वतंत्र राज्याची मागणी मराठवाडा करुच शकत नाही़ विदर्भातील चार- दोन लोक वगळले तर संयुक्त महाराष्ट्रच त्यांनाही हवा आह़े सध्या तर विदर्भ महाराष्ट्राचे नेतृत्व करीत आह़े मग वेगळे राज्य कशाला हवे, असा सवालही त्यांनी केला.