शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

शेतक-यांना कजर्मुक्त करा - उध्दव ठाकरे

By admin | Updated: May 4, 2016 12:44 IST

शासनाने शेतक-यांना कर्जावरील व्याजमाफी दिली ही चांगली बाब आह़े परंतु, यंदा पेरण्या झाल्या नाहीत़ त्यामुळे शेतकरी खचला आह़े.

ऑनलाइन लोकमत 

लातूर, दि. ४ -  शासनाने शेतक-यांना कर्जावरील व्याजमाफी दिली ही चांगली बाब आह़े परंतु, यंदा पेरण्या झाल्या नाहीत़ त्यामुळे शेतकरी खचला आह़े शिवाय, त्याच्यावर कर्जाचा डोंगरही आह़े केंद्र व राज्य शासनाने विचार विनिमय करुन शेतक-यांना एकदाचे कजर्मुक्त कराव़े, असे आवाहन  शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बुधवारी दुपारी येथे कले. 
 
शिवसेनेच्या वतीने लातूर शहर व जिल्ह्यात ५० टँकरने मोफत पाणीपुरवठा तसेच तीन हजार पाण्याच्या टाक्यांचे लोकार्पण उध्दव यांच्या हस्ते बुधवारी लातुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे झाल़े याप्रसंगी ते बोलत होत़े दुष्काळ निवारणासाठी शासनाला सूचना करण्यास काही हरकत नाही़ परंतु, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसेल तर पावसाळी अधिवेशनात जाब विचारता येईल, असेही उध्दव म्हणाल़े.
 
मी भाषणासाठी आलेलो नाही, भाषणाने तहान भागत नाही़ मी दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या मराठवाडय़ातील जनतेला भेटायला आणि दिलासा द्यायला आलो आह़े भाषणो करणारे दुसरे आहेत़ आम्ही कोरडा दिलासा देत नाही अन दुष्काळावर राजकारणही करत नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.  राज्यातील ३३ कोटी जनता दुष्काळाच्या खाईत होरपळत आह़े त्यांना या दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न आहेत़ शेतक-यांच्या मुलींचे कन्यादान तसेच जलसंधारणाच्या कामाचा लोकवाटा शिवसेनेने भरलेला आह़े शिवसेना नुसतीच बडबड करीत नाही तर प्रत्यक्ष मदत करुन दुष्काळातून जनतेला सावरण्याचा प्रयत्न करीत आह़े सामाजिक बांधिलकीतून शिवसेनेचे काम सुरु आह़े असे काम कोणता राजकीय पक्ष दुष्काळात करीत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
 
सरकार कुठे कमी पडले त्यावर नंतर बोलू़
गेल्या १३७ वर्षात सर्वात उष्ण वर्ष यंदाचे आह़े. शिवाय, गेल्या सहा वर्षापासून पजर्न्यमान कमी झाल्याने मराठवाडाच काय, राज्यच दुष्काळात होरपळत आह़े  हा दुष्काळ निवारण करण्यास सरकार कुठे कमी पडले, यावर नंतर बोलू़ विरोधकांनाही पावसाळी अधिवेशनात बोलता येईल़ पण सध्या दुष्काळातून सावरण्यासाठी सर्वानी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे उध्दव ठाकरे म्हणाले.
 
विदर्भाकडे महाराष्ट्राचे नेतृत्व
मराठवाडा संयुक्त महाराष्ट्राच्या विचारांचा आहे. त्यामुळे स्वतंत्र राज्याची मागणी मराठवाडा करुच शकत नाही़ विदर्भातील चार- दोन लोक वगळले तर संयुक्त महाराष्ट्रच त्यांनाही हवा आह़े सध्या तर विदर्भ महाराष्ट्राचे नेतृत्व करीत आह़े मग वेगळे राज्य कशाला हवे, असा सवालही त्यांनी केला.