शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

छोटा राजनमुळे दाऊदची माहिती मिळणार

By admin | Updated: November 1, 2015 02:01 IST

इंडोनेशियाच्या बाली बेटावर जेरबंद करण्यात आलेला गँगस्टर छोटा राजन हा भारतात केलेल्या गुन्ह्याबद्दल फारसा उपयोगी नसला, तरीही त्याचा प्रतिस्पर्धी असलेल्या दाऊद इब्राहीमच्या

- डिप्पी वांकाणी,  मुंबईइंडोनेशियाच्या बाली बेटावर जेरबंद करण्यात आलेला गँगस्टर छोटा राजन हा भारतात केलेल्या गुन्ह्याबद्दल फारसा उपयोगी नसला, तरीही त्याचा प्रतिस्पर्धी असलेल्या दाऊद इब्राहीमच्या अंतर्गत कारभाराची माहिती मिळविण्यासाठी तो जास्त उपयुक्त ठरू शकतो. महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक डॉ. पी.एस. पसरिचा यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली.मुंबईत गुन्हेगारी जगत पूर्ण भरात असताना पसरिचा हेच मुंबईचे सह पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) होते. त्यांच्या काळातच मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी जगताच्या कारवायांचा बीमोड करण्यात आला होता. ‘लोकमत’शी बोलताना पसरिचा म्हणाले की, ‘कदाचित त्याच्या कथित ‘शरणागती’मागे गुप्तचरांनी महत्त्वाची भूमिका बजावली असावी. आता मात्र केवळ राजनवर ‘लक्ष्य’ केंद्रित करून विशेष सेल स्थापन केले पाहिजे. कदाचित, गुप्तचर संस्था आणि राजन यांच्यात तसा काही समझोता होण्याची शक्यता मी नाकारत नाही.’राजनची स्थानबद्धता आणि त्याने शरणागती पत्करली, असे आपल्याला वाटते काय? असे विचारले असता, ते म्हणाले की, ‘त्याच्या शरणागतीला मी नकार देत नाही. त्याच्या मूत्रपिंडाची स्थिती (किडनी) गंभीर असून, त्याला मधुमेहही आहे. तशातच आता गेल्या २-३ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढले असून, दहशतवाद आणि संघटित गुन्हेगारी यांचा त्रास सर्वांना समजून चुकला आहे. इंडोनेशिया हा स्वत:च दहशतवादाचा बळी ठरला आहे. त्यामुळे अशा प्रकरणी तो भारताला सहकार्य करीलच.’दाऊदचा मुकाबला करण्यासाठी गुप्तचर संस्था आतापर्यंत राजनचा वापर करीत होत्या काय, असे विचारले असता ते म्हणाले की, ‘एखाद्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी सुरक्षा यंत्रणा दुसऱ्या गुन्हेगाराचा वापर करतात, हे सर्वत्रच आहे. मीसुद्धा गुन्हेगारांची माहिती काढण्यासाठी दुसऱ्या गुन्हेगाराचा खबऱ्या म्हणून वापर केलेला होता. त्यामुळे येथेसुद्धा तसे नाकारता येत नाही. आता गुप्तचरांनाही थोडी-फार परतफेड करावीच लागेल.’राजनच्या जीविताला मुंबईत दाऊदच्या हस्तकांकडून धोका आहे. त्याच्यावर हल्ला होण्याच्या शक्यतेबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘जे झाले ते झाले. आम्हीसुद्धा काही वर्षे कसाबला सुरक्षित जिवंत ठेवले होते. आमची यंत्रणा सुधारली आहे. आता आमच्याकडे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचीही सुविधा आहे.’विशेष सेल स्थापन करण्याची गरजराजनविरुद्ध १९९८ पूर्वी सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यानंतर गुन्हेगारी कारवाया थंडावत गेल्या. तेव्हापासून आतापर्यंत अनेक साक्षीदार मरण पावले असावेत, जे आहेत ते पोलिसांशी सहकार्य करणार नाहीत. त्यामुळेच या प्रकरणाचा चांगला निष्कर्ष निघण्यासाठी विशेष सेल स्थापन करण्याची गरज आहे.