शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
3
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
4
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
5
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
6
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
7
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
8
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
9
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
10
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
11
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
12
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
14
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
15
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
16
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
17
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
18
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
19
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
20
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या

छोटा राजनमुळे दाऊदची माहिती मिळणार

By admin | Updated: November 1, 2015 02:01 IST

इंडोनेशियाच्या बाली बेटावर जेरबंद करण्यात आलेला गँगस्टर छोटा राजन हा भारतात केलेल्या गुन्ह्याबद्दल फारसा उपयोगी नसला, तरीही त्याचा प्रतिस्पर्धी असलेल्या दाऊद इब्राहीमच्या

- डिप्पी वांकाणी,  मुंबईइंडोनेशियाच्या बाली बेटावर जेरबंद करण्यात आलेला गँगस्टर छोटा राजन हा भारतात केलेल्या गुन्ह्याबद्दल फारसा उपयोगी नसला, तरीही त्याचा प्रतिस्पर्धी असलेल्या दाऊद इब्राहीमच्या अंतर्गत कारभाराची माहिती मिळविण्यासाठी तो जास्त उपयुक्त ठरू शकतो. महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक डॉ. पी.एस. पसरिचा यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली.मुंबईत गुन्हेगारी जगत पूर्ण भरात असताना पसरिचा हेच मुंबईचे सह पोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) होते. त्यांच्या काळातच मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी जगताच्या कारवायांचा बीमोड करण्यात आला होता. ‘लोकमत’शी बोलताना पसरिचा म्हणाले की, ‘कदाचित त्याच्या कथित ‘शरणागती’मागे गुप्तचरांनी महत्त्वाची भूमिका बजावली असावी. आता मात्र केवळ राजनवर ‘लक्ष्य’ केंद्रित करून विशेष सेल स्थापन केले पाहिजे. कदाचित, गुप्तचर संस्था आणि राजन यांच्यात तसा काही समझोता होण्याची शक्यता मी नाकारत नाही.’राजनची स्थानबद्धता आणि त्याने शरणागती पत्करली, असे आपल्याला वाटते काय? असे विचारले असता, ते म्हणाले की, ‘त्याच्या शरणागतीला मी नकार देत नाही. त्याच्या मूत्रपिंडाची स्थिती (किडनी) गंभीर असून, त्याला मधुमेहही आहे. तशातच आता गेल्या २-३ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढले असून, दहशतवाद आणि संघटित गुन्हेगारी यांचा त्रास सर्वांना समजून चुकला आहे. इंडोनेशिया हा स्वत:च दहशतवादाचा बळी ठरला आहे. त्यामुळे अशा प्रकरणी तो भारताला सहकार्य करीलच.’दाऊदचा मुकाबला करण्यासाठी गुप्तचर संस्था आतापर्यंत राजनचा वापर करीत होत्या काय, असे विचारले असता ते म्हणाले की, ‘एखाद्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी सुरक्षा यंत्रणा दुसऱ्या गुन्हेगाराचा वापर करतात, हे सर्वत्रच आहे. मीसुद्धा गुन्हेगारांची माहिती काढण्यासाठी दुसऱ्या गुन्हेगाराचा खबऱ्या म्हणून वापर केलेला होता. त्यामुळे येथेसुद्धा तसे नाकारता येत नाही. आता गुप्तचरांनाही थोडी-फार परतफेड करावीच लागेल.’राजनच्या जीविताला मुंबईत दाऊदच्या हस्तकांकडून धोका आहे. त्याच्यावर हल्ला होण्याच्या शक्यतेबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘जे झाले ते झाले. आम्हीसुद्धा काही वर्षे कसाबला सुरक्षित जिवंत ठेवले होते. आमची यंत्रणा सुधारली आहे. आता आमच्याकडे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचीही सुविधा आहे.’विशेष सेल स्थापन करण्याची गरजराजनविरुद्ध १९९८ पूर्वी सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यानंतर गुन्हेगारी कारवाया थंडावत गेल्या. तेव्हापासून आतापर्यंत अनेक साक्षीदार मरण पावले असावेत, जे आहेत ते पोलिसांशी सहकार्य करणार नाहीत. त्यामुळेच या प्रकरणाचा चांगला निष्कर्ष निघण्यासाठी विशेष सेल स्थापन करण्याची गरज आहे.