शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य आणि साहित्यिकाला जात-धर्म नसतो

By admin | Updated: January 18, 2015 00:52 IST

विठ्ठलराव पाटील देवसरकर साहित्य नगरी : साहित्य आणि साहित्यिकाला कुठलाच जात-धर्म नसतो. साहित्य निर्मिती ही व्यापक आणि मुक्त स्वरूपात व्हायला हवी, असे प्रतिपादन राज्यस्तरीय मराठा

इंद्रजित भालेराव : उमरखेड येथे १०व्या मराठा साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन अविनाश खंदारे - उमरखेडविठ्ठलराव पाटील देवसरकर साहित्य नगरी : साहित्य आणि साहित्यिकाला कुठलाच जात-धर्म नसतो. साहित्य निर्मिती ही व्यापक आणि मुक्त स्वरूपात व्हायला हवी, असे प्रतिपादन राज्यस्तरीय मराठा साहित्य संमेलनाध्यक्ष कवी इंद्रजित भालेराव यांनी येथे केले.जगत्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील विठ्ठलराव पाटील देवसरकर साहित्य नगरी (माहेश्वरी खुले नाट्यगृह) येथे आयोजित १० व्या मराठा साहित्य संमेलनात ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन विचारवंत प्रा. शेषराव मोरे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी स्वागताध्यक्ष माजी आमदार प्रकाश देवसरकर, नवव्या मराठा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बाबा भांड, प्रा. डॉ. अशोक राणा, मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर, प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार, मधुकर मेहकरे, उमरखेडच्या नगराध्यक्ष उषा आलट आदी उपस्थित होते. संमेलनाध्यक्ष भालेराव यांनी छापील भाषण न वाचता, येथे मुले आली आहेत, त्यांच्यासाठी मी कविता म्हणणार आहे, असे म्हणत आपल्या भाषणाला सुरूवात केली. शेतकरी म्हणजे मराठा नाही, जो शेतकरी तो मराठा, असे मी समजतो. शेतकऱ्यांच्या सुख-दु:खावर माझे लिखाण असून, सामाजिक भूमिकाही शेतकऱ्यांच्या दु:खात दडली आहे.जिजाऊच्या बालपणीची कविता लिहिणे किती अवघड होते, असे सांगत ‘जिजाऊ शिकते... एकुलती एकही’ ही कविता सादर केली. ‘बाप’ ही कविता अभ्यासक्रमातून बदलण्याचा शिक्षण विभागाने निर्णय घेतला होता. तेव्हाची आठवण सांगताना भालेराव म्हणाले, बाप कधी बदलता येत नाही. त्यामुळेच आजही अभ्यासक्रमात ती कविता आहे. ‘जिथे राबतो तो माझा शेतकरी बाप’ ही पाचवीच्या अभ्यासक्रमाला असलेली आपली कविता भालेराव यांनी गाऊन सादर केली. शेवटी त्यांनी बहुजन समाजातील युवकांनी साहित्य निर्मितीमध्ये येऊन बहुजन समाजाला स्पर्धेच्या युगात आणण्याची जबाबदारी घेण्याचे आवाहन केले. संमेलनाचे उद्घाटक प्रा. शेषराव मोरे म्हणाले, मी कुठलाही साहित्यिक नाही. मी सतत देशहिताच्या संबंधावर लिखाण करीत असतो. त्याला मी स्वत:चं साहित्य म्हणत नाही. पण साहित्यिकांनी माझ्या भूमिकेतून साहित्य निर्मिती करावी आणि त्याला राष्ट्रीयस्तरावर पोहोचवावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविकातून डॉ. प्र. भा. काळे यांनी उमरखेड तालुक्याच्या जडणघडणीचा आणि साहित्य परंपरेचा आढावा सादर केला. माजी संमेलनाध्यक्ष बाबा भांड यांनी, साहित्य हे न्याय मागण्याचे साधन झाले असून त्यामुळे बहुजन समाजातील युवकांनी साहित्य निर्मितीकडे वळण्याची गरज असल्याचे सांगितले. उद्घाटन समारंभाला माजी आमदार विजय खडसे, डॉ. छाया महाले, राम देवसरकर, डॉ. निर्मला पाटील, प्राकश शिंदे, सुरेश कदम उपस्थित होते. साहित्य संमेलनात युवक आणि महिलांची संख्या लक्षणीय होती. (शहर प्रतिनिधी)