शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

साहित्य आणि साहित्यिकाला जात-धर्म नसतो

By admin | Updated: January 18, 2015 00:52 IST

विठ्ठलराव पाटील देवसरकर साहित्य नगरी : साहित्य आणि साहित्यिकाला कुठलाच जात-धर्म नसतो. साहित्य निर्मिती ही व्यापक आणि मुक्त स्वरूपात व्हायला हवी, असे प्रतिपादन राज्यस्तरीय मराठा

इंद्रजित भालेराव : उमरखेड येथे १०व्या मराठा साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन अविनाश खंदारे - उमरखेडविठ्ठलराव पाटील देवसरकर साहित्य नगरी : साहित्य आणि साहित्यिकाला कुठलाच जात-धर्म नसतो. साहित्य निर्मिती ही व्यापक आणि मुक्त स्वरूपात व्हायला हवी, असे प्रतिपादन राज्यस्तरीय मराठा साहित्य संमेलनाध्यक्ष कवी इंद्रजित भालेराव यांनी येथे केले.जगत्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील विठ्ठलराव पाटील देवसरकर साहित्य नगरी (माहेश्वरी खुले नाट्यगृह) येथे आयोजित १० व्या मराठा साहित्य संमेलनात ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन विचारवंत प्रा. शेषराव मोरे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी स्वागताध्यक्ष माजी आमदार प्रकाश देवसरकर, नवव्या मराठा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बाबा भांड, प्रा. डॉ. अशोक राणा, मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर, प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार, मधुकर मेहकरे, उमरखेडच्या नगराध्यक्ष उषा आलट आदी उपस्थित होते. संमेलनाध्यक्ष भालेराव यांनी छापील भाषण न वाचता, येथे मुले आली आहेत, त्यांच्यासाठी मी कविता म्हणणार आहे, असे म्हणत आपल्या भाषणाला सुरूवात केली. शेतकरी म्हणजे मराठा नाही, जो शेतकरी तो मराठा, असे मी समजतो. शेतकऱ्यांच्या सुख-दु:खावर माझे लिखाण असून, सामाजिक भूमिकाही शेतकऱ्यांच्या दु:खात दडली आहे.जिजाऊच्या बालपणीची कविता लिहिणे किती अवघड होते, असे सांगत ‘जिजाऊ शिकते... एकुलती एकही’ ही कविता सादर केली. ‘बाप’ ही कविता अभ्यासक्रमातून बदलण्याचा शिक्षण विभागाने निर्णय घेतला होता. तेव्हाची आठवण सांगताना भालेराव म्हणाले, बाप कधी बदलता येत नाही. त्यामुळेच आजही अभ्यासक्रमात ती कविता आहे. ‘जिथे राबतो तो माझा शेतकरी बाप’ ही पाचवीच्या अभ्यासक्रमाला असलेली आपली कविता भालेराव यांनी गाऊन सादर केली. शेवटी त्यांनी बहुजन समाजातील युवकांनी साहित्य निर्मितीमध्ये येऊन बहुजन समाजाला स्पर्धेच्या युगात आणण्याची जबाबदारी घेण्याचे आवाहन केले. संमेलनाचे उद्घाटक प्रा. शेषराव मोरे म्हणाले, मी कुठलाही साहित्यिक नाही. मी सतत देशहिताच्या संबंधावर लिखाण करीत असतो. त्याला मी स्वत:चं साहित्य म्हणत नाही. पण साहित्यिकांनी माझ्या भूमिकेतून साहित्य निर्मिती करावी आणि त्याला राष्ट्रीयस्तरावर पोहोचवावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविकातून डॉ. प्र. भा. काळे यांनी उमरखेड तालुक्याच्या जडणघडणीचा आणि साहित्य परंपरेचा आढावा सादर केला. माजी संमेलनाध्यक्ष बाबा भांड यांनी, साहित्य हे न्याय मागण्याचे साधन झाले असून त्यामुळे बहुजन समाजातील युवकांनी साहित्य निर्मितीकडे वळण्याची गरज असल्याचे सांगितले. उद्घाटन समारंभाला माजी आमदार विजय खडसे, डॉ. छाया महाले, राम देवसरकर, डॉ. निर्मला पाटील, प्राकश शिंदे, सुरेश कदम उपस्थित होते. साहित्य संमेलनात युवक आणि महिलांची संख्या लक्षणीय होती. (शहर प्रतिनिधी)