शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानात मरणा-या हिंदूंचा आक्रोश ऐका - उद्धव ठाकरे

By admin | Updated: July 29, 2016 09:29 IST

राज्यात व केंद्रातील मंत्रीपदे मुसलमानांच्या चरणी अर्पण करून आपले निधर्मीपण सिद्ध करून दाखविण्याची जणू चढाओढच लागलेली असते अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना अग्रलेखातून केली आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 29 - पाकिस्तानात हिंदूंच्या मताला किंमत नाही व त्यांना मतस्वातंत्र्य नाही. त्यामुळे तेथील हिंदूंना मार खाण्याशिवाय पर्याय नाही. आमच्या देशात मुसलमान राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सरन्यायाधीश, लोकसभेचा सभापती, क्रिकेट टीमचा कप्तान होतो. राज्यात व केंद्रातील मंत्रीपदे मुसलमानांच्या चरणी अर्पण करून आपले निधर्मीपण सिद्ध करून दाखविण्याची जणू चढाओढच लागलेली असते. या चढाओढीत कधीकाळी हिंदुत्वावरून रान उठविणारे आता सामील झाले आहेत. त्यांनी पाकिस्तानात रोज मरणार्‍या हिंदूंचा आक्रोश जरा ऐकावा म्हणजे बरे अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना अग्रलेखातून केली आहे. 
 
'हिंदुस्थानातील एखाद्या भागात मुसलमानांना नुसते खरचटले तरी पाकिस्तानचे राज्यकर्ते थयथयाट करतात व त्यांना आझम खानसारखे येथील पुढारी साथ देतात. हिंदुस्थानातील अल्पसंख्याक समुदायाचे म्हणजे मुसलमानांचे जीवन असुरक्षित असल्याची बांग आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मारली जाते, पण गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानात अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समाजावर निर्घृण हल्ले सुरू आहेत व हे हल्ले दिवसेंदिवस वाढतच जात आहेत', असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
 
'हिंदूंनी एकतर ‘इस्लाम’ कबूल करावा, नाहीतर मरणाला सामोरे जावे, अशी भयंकर स्थिती तेथे निर्माण झाली असली तरी याबाबत पाकड्या राज्यकर्त्यांना जाब कोण विचारणार हा प्रश्‍नच आहे. हिंदुस्थानातील मुसलमानांचे जितके राजकीय, आर्थिक व धार्मिक लाड केले जातात त्याच्या एक टक्का लाडही पाकिस्तानातील मुसलमानांचे होत नसतील. येथे आमच्या हिंदुस्थानातही मुसलमानांना साथ व हिंदूंना लाथ हेच धोरण सेक्युलरवादाच्या नावाखाली राबवले जात असते. त्यामुळे पाकिस्तानात पिचल्या गेलेल्या अल्पसंख्याक हिंदू समाजाने मोदी सरकारकडे आशेची आस लावून बसावे काय', असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. 
 
'दादरीत गोमांसावरून तणाव होताच येथील आझम खानने सरळ आपल्याच देशाविरुद्ध ‘युनो’कडे तक्रार करून धर्मांधतेची माती खाल्ली. हिंदुस्थानात मुसलमान सुरक्षित नसल्याची बोंब ठोकण्याची हिंमत येथे आझम खानसारखे लोक दाखवतात व देशाच्या अब्रूचे युनोत ‘धिंडवडे’ काढणार्‍या आझम खानला कोणी जाब विचारत नाही. पण ही आझम खान मंडळी कश्मीरातील हिंदूंच्या अत्याचाराबाबत चकार शब्द उच्चारायला तयार नाहीत. पाकिस्तानात व बांगलादेशात ज्या पद्धतीने हिंदूंचे शिरकाण केले जात आहे त्याबाबत साधा निषेधाचा सूर काढायला तयार नाहीत. मुसलमानांचे राजकीय रक्षणकर्ते म्हणून या मंडळींना फक्त मतांची ठेकेदारीच हवी आहे', अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.