शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भाषिक समानता हा जागतिकीकरणाचा नवा टप्पा : अनिल गोरे  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 06:00 IST

मराठीचा सर्वत्र वापर करण्यासाठी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधाच राज्यात उपलब्ध नाहीत.

ठळक मुद्दे महाराष्ट्रात आता सोशल मिडियापासून अनेक ठिकाणी मराठीचा लक्षणीयरित्या वापर भाषिक कौशल्य केवळ एका भाषेपुरते मर्यादित नसते, तर सर्वच भाषांच्या विकासासाठी

मराठी लोकांनी शुध्द भाषा किंवा प्रमाण भाषा अशा वादात न अडकता भाषेचा सन्मान करायला हवा. प्रमाण भाषा पुस्तकांमध्ये वापरली जावी, इथपर्यंत ठीक आहे. मात्र, बोलीभाषेत प्रमाण भाषेचा आग्रह धरणे अतिशयोक्तीचे आहे : अनिल गोरे  

..............................................

- प्रज्ञा केळकर-सिंग राज्य मराठी विकास संस्थेतर्फे कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार अनिल गोरे उर्फ मराठी काका यांना जाहीर झाला आहे. यानिमित्त त्यांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीशी साधलेला संवाद.   

.....................

महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेची काय स्थिती आहे?  -  महाराष्ट्राइतका भाषेबाबतचा भेदभाव जगात इतरत्र कोठेच पहायला मिळत नाही. स्थानिक भाषेबाबतच दुजाभाव उपयोगाचा नाही. भेदभाव दूर केल्यास भाषांकडे पाहण्याची नवी दृष्टी विकसित होईल. सध्याच्या काळात भाषिक समानता अत्यंत गरजेची आहे. किंबहुना भाषिक समानता हा जागतिकीकरणाचा नवा टप्पा आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळण्याच्या प्रक्रियेतील सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत, केवळ घोषणा होणे बाकी आहे. अभिजातचा मुद्दा राजकीय फायद्यासाठी राखून ठेवलेला असू शकतो. आपली सत्ता धोक्यात आली आहे, असे वाटेपर्यंत निर्णय घेतला जाणार नाही, असे माझे मत आहे. भाषा हे राजकारणाचे मोठे हत्यार असते आणि राजकीय लोक स्वत:च्या सोयीनुसार योग्य वेळी हे हत्यार वापरत असावेत. 

मराठी भाषिकांमध्येच भाषेची उदासिनता कशामुळे ?मराठीचा सर्वत्र वापर करण्यासाठी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधाच राज्यात उपलब्ध नाहीत. सामान्य माणसाचे ७० टक्के  आयुष्य शासनाशी संबंधित असते. मात्र, मराठीचा आग्रह धरला तर आपण मुर्ख ठरू, अशी भीती नागरिकांना वाटते. इतर राज्यांमध्ये दैनंदिन व्यवहार स्थानिक भाषेमध्ये करण्याची सोय असल्याने टोकाची भाषिक अस्मिता पहायला मिळते. महाराष्ट्रात आता सोशल मिडियापासून अनेक ठिकाणी मराठीचा वापर लक्षणीयरित्या वाढला आहे. बँक, न्यायालय, मोबाईल अशा अनेक ठिकाणी मराठीतून व्यवहार करणे सोपे झाले आहे. अस्मिता व्यक्त करण्याची साधने उपलब्ध झाली की लोकांचे भाषाप्रेमही आपोआप दिसू लागते. 

शाळांमध्ये मराठी भाषेची काय स्थिती आहे? बऱ्याच इंग्रजी शाळांमध्ये मुले एकमेकांशी मराठीत बोलतात. मात्र, इंग्रजी भाषेतच संवाद साधावा असा आग्रह शिक्षकांकडून केला जातो. मराठीत बोलणे कमीपणाचे मानले जाते. मात्र, ज्यांना मराठी नीट बोलता येत नाही, त्यांचे इंग्रजीही कच्चे राहते, असा आजवरचा अनुभव आहे. सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी भाषेची सक्ती झाल्यास मुलांना अर्थछटा, शब्दछटा समजू लागतील आणि त्यांचे भाषिक कौशल्य वाढीस लागेल. भाषिक कौशल्य केवळ एका भाषेपुरते मर्यादित नसते, तर त्याचा उपयोग सर्वच भाषांच्या विकासासाठी होतो. ...........व्यवहारात मराठी भाषेचा वापर वाढणार नाही, तोवर बदल घडणार नाहीत. त्यामुळे व्यापारामध्ये मराठीचा वापर व्हायला हवा. उदाहरणादाखल, मार्केटिंगसाठी आलेल्या कोणत्याही कॉलला मराठीतच उत्तर द्यायचे असे प्रत्येकाने ठरवल्यास कॉल सेंटरला मराठी भाषेचा वापर वाढवाला लागेल आणि मराठी युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. 

टॅग्स :PuneपुणेmarathiमराठीState Governmentराज्य सरकार