शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
5
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
6
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
7
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
8
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
9
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
10
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
11
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
12
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
13
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
14
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
15
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
16
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
17
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
18
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
19
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
20
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 

भाषिक समानता हा जागतिकीकरणाचा नवा टप्पा : अनिल गोरे  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 06:00 IST

मराठीचा सर्वत्र वापर करण्यासाठी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधाच राज्यात उपलब्ध नाहीत.

ठळक मुद्दे महाराष्ट्रात आता सोशल मिडियापासून अनेक ठिकाणी मराठीचा लक्षणीयरित्या वापर भाषिक कौशल्य केवळ एका भाषेपुरते मर्यादित नसते, तर सर्वच भाषांच्या विकासासाठी

मराठी लोकांनी शुध्द भाषा किंवा प्रमाण भाषा अशा वादात न अडकता भाषेचा सन्मान करायला हवा. प्रमाण भाषा पुस्तकांमध्ये वापरली जावी, इथपर्यंत ठीक आहे. मात्र, बोलीभाषेत प्रमाण भाषेचा आग्रह धरणे अतिशयोक्तीचे आहे : अनिल गोरे  

..............................................

- प्रज्ञा केळकर-सिंग राज्य मराठी विकास संस्थेतर्फे कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार अनिल गोरे उर्फ मराठी काका यांना जाहीर झाला आहे. यानिमित्त त्यांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीशी साधलेला संवाद.   

.....................

महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेची काय स्थिती आहे?  -  महाराष्ट्राइतका भाषेबाबतचा भेदभाव जगात इतरत्र कोठेच पहायला मिळत नाही. स्थानिक भाषेबाबतच दुजाभाव उपयोगाचा नाही. भेदभाव दूर केल्यास भाषांकडे पाहण्याची नवी दृष्टी विकसित होईल. सध्याच्या काळात भाषिक समानता अत्यंत गरजेची आहे. किंबहुना भाषिक समानता हा जागतिकीकरणाचा नवा टप्पा आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळण्याच्या प्रक्रियेतील सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत, केवळ घोषणा होणे बाकी आहे. अभिजातचा मुद्दा राजकीय फायद्यासाठी राखून ठेवलेला असू शकतो. आपली सत्ता धोक्यात आली आहे, असे वाटेपर्यंत निर्णय घेतला जाणार नाही, असे माझे मत आहे. भाषा हे राजकारणाचे मोठे हत्यार असते आणि राजकीय लोक स्वत:च्या सोयीनुसार योग्य वेळी हे हत्यार वापरत असावेत. 

मराठी भाषिकांमध्येच भाषेची उदासिनता कशामुळे ?मराठीचा सर्वत्र वापर करण्यासाठी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधाच राज्यात उपलब्ध नाहीत. सामान्य माणसाचे ७० टक्के  आयुष्य शासनाशी संबंधित असते. मात्र, मराठीचा आग्रह धरला तर आपण मुर्ख ठरू, अशी भीती नागरिकांना वाटते. इतर राज्यांमध्ये दैनंदिन व्यवहार स्थानिक भाषेमध्ये करण्याची सोय असल्याने टोकाची भाषिक अस्मिता पहायला मिळते. महाराष्ट्रात आता सोशल मिडियापासून अनेक ठिकाणी मराठीचा वापर लक्षणीयरित्या वाढला आहे. बँक, न्यायालय, मोबाईल अशा अनेक ठिकाणी मराठीतून व्यवहार करणे सोपे झाले आहे. अस्मिता व्यक्त करण्याची साधने उपलब्ध झाली की लोकांचे भाषाप्रेमही आपोआप दिसू लागते. 

शाळांमध्ये मराठी भाषेची काय स्थिती आहे? बऱ्याच इंग्रजी शाळांमध्ये मुले एकमेकांशी मराठीत बोलतात. मात्र, इंग्रजी भाषेतच संवाद साधावा असा आग्रह शिक्षकांकडून केला जातो. मराठीत बोलणे कमीपणाचे मानले जाते. मात्र, ज्यांना मराठी नीट बोलता येत नाही, त्यांचे इंग्रजीही कच्चे राहते, असा आजवरचा अनुभव आहे. सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी भाषेची सक्ती झाल्यास मुलांना अर्थछटा, शब्दछटा समजू लागतील आणि त्यांचे भाषिक कौशल्य वाढीस लागेल. भाषिक कौशल्य केवळ एका भाषेपुरते मर्यादित नसते, तर त्याचा उपयोग सर्वच भाषांच्या विकासासाठी होतो. ...........व्यवहारात मराठी भाषेचा वापर वाढणार नाही, तोवर बदल घडणार नाहीत. त्यामुळे व्यापारामध्ये मराठीचा वापर व्हायला हवा. उदाहरणादाखल, मार्केटिंगसाठी आलेल्या कोणत्याही कॉलला मराठीतच उत्तर द्यायचे असे प्रत्येकाने ठरवल्यास कॉल सेंटरला मराठी भाषेचा वापर वाढवाला लागेल आणि मराठी युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. 

टॅग्स :PuneपुणेmarathiमराठीState Governmentराज्य सरकार