शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

‘जलयुक्त शिवार’मुळे अंधाराच्या दारी येईल प्रकाश!

By admin | Updated: September 15, 2016 04:10 IST

जलयुक्त शिवार योजनेचे काम पाच-सहा वर्षे भ्रष्टाचार विरहीत झाल्यास राज्यातील ५० टक्के शेतीला आठमाही पाणी मिळेल. अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघेल.

विकास पाटील,  जळगावजलयुक्त शिवार योजनेचे काम पाच-सहा वर्षे भ्रष्टाचार विरहीत झाल्यास राज्यातील ५० टक्के शेतीला आठमाही पाणी मिळेल. अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघेल. एखाद्यावर्षी दुष्काळ आला तरी त्याला धैर्याने तोंड देण्याची ताकद बळीराजाकडे येईल,असे कविवर्य ना. धो. महानोर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अवघ्या मऱ्हाटी मुलुखाला निसगकवी म्हणून सुपरिचित असलेले महानोर शुक्रवारी (१६ सप्टेंबर) अमृतमहोत्वी वाढदिवस साजरा करीत आहेत. त्यानिमित्त त्यांनी पळासखेड्यातील साद घालणाऱ्या निसर्गाला कवेत घेत बळीराजाच्या कष्टापासून ते गावागावांमधील लिहिण्यासाठी पुढे येत असलेल्या तरुणाईचे भरभरुन कौतुक केले.पळासखेडे या माझ्या २००-३०० उंबरठ्यांच्या गावाने माझ्यावर संस्कार केले. वाचनामुळे आयुष्य समृद्ध व्हायला मदत झाली. सध्या वाचन संस्कृती कमी झाली आहे, हे खरं असले तरी मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणी स्पर्धा परीक्षांच्या निमित्ताने वाचनात गुंतल्याचे दिसून येते. खेड्यापाड्यातून चांगल्या कथा, कादंबऱ्या येत असून त्यामुळे भाषा अधिक समृद्ध होत आहे. या सगळ्यांशी मी मैत्र बांधून आहे. आतापर्यंत जे साहित्यात दिसले नाही ते आता येऊ लागले आहे. लेखक, कवींनी साधना करावी, घाई न करता पुर्नलेखन करावे, असे केल्यास कसदार व पोत असलेल्या साहित्याची निर्मिती होईल, अशी आशाही त्यांनी बोलून दाखविली.पद्मश्री अप्पासाहेब पवार यांच्या कृषी विकास प्रतिष्ठान बारामती व पद्मश्री भवरलाल जैन, जळगाव यांच्या जैन उद्योग समुहाशी घट्टपणाने जोडून मला काम करता आले, हे माझे भाग्य मी समजतो. या कृषी पंढरीच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी वर्ष, दोन वर्षातून एकदा तरी भेट द्यावी. असे कळकळीचे आवाहनही केले. महाराष्ट्रातील जनतेने माझ्यावर नितांत प्रेम केले. माझ्या कवितेचे गाणे केले. कौतुकाचा वर्षाव केला. त्यामुळे जगण्याला बळ मिळाले. जनतेचे ऋण मी कधीच फेडू शकत नाही, अशी कृतज्ञतेची भावना व्यक्त करुन आता उर्वरित आयुष्य शेतावरच घालविणार असल्याचे महानोर यांनी सांगितले.