शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

‘जलयुक्त शिवार’मुळे अंधाराच्या दारी येईल प्रकाश!

By admin | Updated: September 15, 2016 04:10 IST

जलयुक्त शिवार योजनेचे काम पाच-सहा वर्षे भ्रष्टाचार विरहीत झाल्यास राज्यातील ५० टक्के शेतीला आठमाही पाणी मिळेल. अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघेल.

विकास पाटील,  जळगावजलयुक्त शिवार योजनेचे काम पाच-सहा वर्षे भ्रष्टाचार विरहीत झाल्यास राज्यातील ५० टक्के शेतीला आठमाही पाणी मिळेल. अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघेल. एखाद्यावर्षी दुष्काळ आला तरी त्याला धैर्याने तोंड देण्याची ताकद बळीराजाकडे येईल,असे कविवर्य ना. धो. महानोर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अवघ्या मऱ्हाटी मुलुखाला निसगकवी म्हणून सुपरिचित असलेले महानोर शुक्रवारी (१६ सप्टेंबर) अमृतमहोत्वी वाढदिवस साजरा करीत आहेत. त्यानिमित्त त्यांनी पळासखेड्यातील साद घालणाऱ्या निसर्गाला कवेत घेत बळीराजाच्या कष्टापासून ते गावागावांमधील लिहिण्यासाठी पुढे येत असलेल्या तरुणाईचे भरभरुन कौतुक केले.पळासखेडे या माझ्या २००-३०० उंबरठ्यांच्या गावाने माझ्यावर संस्कार केले. वाचनामुळे आयुष्य समृद्ध व्हायला मदत झाली. सध्या वाचन संस्कृती कमी झाली आहे, हे खरं असले तरी मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणी स्पर्धा परीक्षांच्या निमित्ताने वाचनात गुंतल्याचे दिसून येते. खेड्यापाड्यातून चांगल्या कथा, कादंबऱ्या येत असून त्यामुळे भाषा अधिक समृद्ध होत आहे. या सगळ्यांशी मी मैत्र बांधून आहे. आतापर्यंत जे साहित्यात दिसले नाही ते आता येऊ लागले आहे. लेखक, कवींनी साधना करावी, घाई न करता पुर्नलेखन करावे, असे केल्यास कसदार व पोत असलेल्या साहित्याची निर्मिती होईल, अशी आशाही त्यांनी बोलून दाखविली.पद्मश्री अप्पासाहेब पवार यांच्या कृषी विकास प्रतिष्ठान बारामती व पद्मश्री भवरलाल जैन, जळगाव यांच्या जैन उद्योग समुहाशी घट्टपणाने जोडून मला काम करता आले, हे माझे भाग्य मी समजतो. या कृषी पंढरीच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी वर्ष, दोन वर्षातून एकदा तरी भेट द्यावी. असे कळकळीचे आवाहनही केले. महाराष्ट्रातील जनतेने माझ्यावर नितांत प्रेम केले. माझ्या कवितेचे गाणे केले. कौतुकाचा वर्षाव केला. त्यामुळे जगण्याला बळ मिळाले. जनतेचे ऋण मी कधीच फेडू शकत नाही, अशी कृतज्ञतेची भावना व्यक्त करुन आता उर्वरित आयुष्य शेतावरच घालविणार असल्याचे महानोर यांनी सांगितले.