शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
4
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
5
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
6
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
7
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
8
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
9
दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
10
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
11
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
12
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
13
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
14
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
15
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
16
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
17
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
18
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
19
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
20
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ

‘जलयुक्त शिवार’मुळे अंधाराच्या दारी येईल प्रकाश!

By admin | Updated: September 15, 2016 04:10 IST

जलयुक्त शिवार योजनेचे काम पाच-सहा वर्षे भ्रष्टाचार विरहीत झाल्यास राज्यातील ५० टक्के शेतीला आठमाही पाणी मिळेल. अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघेल.

विकास पाटील,  जळगावजलयुक्त शिवार योजनेचे काम पाच-सहा वर्षे भ्रष्टाचार विरहीत झाल्यास राज्यातील ५० टक्के शेतीला आठमाही पाणी मिळेल. अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघेल. एखाद्यावर्षी दुष्काळ आला तरी त्याला धैर्याने तोंड देण्याची ताकद बळीराजाकडे येईल,असे कविवर्य ना. धो. महानोर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अवघ्या मऱ्हाटी मुलुखाला निसगकवी म्हणून सुपरिचित असलेले महानोर शुक्रवारी (१६ सप्टेंबर) अमृतमहोत्वी वाढदिवस साजरा करीत आहेत. त्यानिमित्त त्यांनी पळासखेड्यातील साद घालणाऱ्या निसर्गाला कवेत घेत बळीराजाच्या कष्टापासून ते गावागावांमधील लिहिण्यासाठी पुढे येत असलेल्या तरुणाईचे भरभरुन कौतुक केले.पळासखेडे या माझ्या २००-३०० उंबरठ्यांच्या गावाने माझ्यावर संस्कार केले. वाचनामुळे आयुष्य समृद्ध व्हायला मदत झाली. सध्या वाचन संस्कृती कमी झाली आहे, हे खरं असले तरी मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणी स्पर्धा परीक्षांच्या निमित्ताने वाचनात गुंतल्याचे दिसून येते. खेड्यापाड्यातून चांगल्या कथा, कादंबऱ्या येत असून त्यामुळे भाषा अधिक समृद्ध होत आहे. या सगळ्यांशी मी मैत्र बांधून आहे. आतापर्यंत जे साहित्यात दिसले नाही ते आता येऊ लागले आहे. लेखक, कवींनी साधना करावी, घाई न करता पुर्नलेखन करावे, असे केल्यास कसदार व पोत असलेल्या साहित्याची निर्मिती होईल, अशी आशाही त्यांनी बोलून दाखविली.पद्मश्री अप्पासाहेब पवार यांच्या कृषी विकास प्रतिष्ठान बारामती व पद्मश्री भवरलाल जैन, जळगाव यांच्या जैन उद्योग समुहाशी घट्टपणाने जोडून मला काम करता आले, हे माझे भाग्य मी समजतो. या कृषी पंढरीच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी वर्ष, दोन वर्षातून एकदा तरी भेट द्यावी. असे कळकळीचे आवाहनही केले. महाराष्ट्रातील जनतेने माझ्यावर नितांत प्रेम केले. माझ्या कवितेचे गाणे केले. कौतुकाचा वर्षाव केला. त्यामुळे जगण्याला बळ मिळाले. जनतेचे ऋण मी कधीच फेडू शकत नाही, अशी कृतज्ञतेची भावना व्यक्त करुन आता उर्वरित आयुष्य शेतावरच घालविणार असल्याचे महानोर यांनी सांगितले.