शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

नवीन अधिकाऱ्यांसाठी आता चलो विदर्भ!

By admin | Updated: April 5, 2015 01:51 IST

कुठल्याही खात्यात नव्याने रुजू होणाऱ्या वा पदोन्नती मिळालेल्या शासकीय अधिकाऱ्यांना आता पहिली वारी विदर्भात करावी लागू शकते.

यदु जोशी - मुंबईकुठल्याही खात्यात नव्याने रुजू होणाऱ्या वा पदोन्नती मिळालेल्या शासकीय अधिकाऱ्यांना आता पहिली वारी विदर्भात करावी लागू शकते. राज्याच्या एखाद्या विशिष्ट विभागात रुजू होण्याचा आतापर्यंत देण्यात येत असलेला विभागीय संवर्गाचा पर्याय लवकरच बंद करण्यात येणार आहे. नागपूर आणि अमरावती या विदर्भाच्या दोन विभागांमधील रिक्त पदे प्राधान्याने भरण्यासाठी विभागीय संवर्ग पद्धत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच बंद करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. वर्षानुवर्षे पश्चिम महाराष्ट्र, ठाणे, मुंबई आणि नाशिक या भागात नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जायची. कारण नवीन भरती झाली की अधिकाऱ्यांना आपल्या भागात वजनदार नेते घेऊन जात असत. निवड होणारे बहुतेक जण हे याच विभागातील असल्याने त्यांनाही आपल्या विभागात जायला मिळाल्याने आनंदच असायचा. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा याला चाप लावला आणि विभागीय संवर्गाची पद्धत आणली. त्यानुसार रिक्त जागांच्या प्रमाणात विविध विभागांमधील पदे निश्चित करण्यात यायची आणि नंतर अधिकाऱ्यांना विभागाचा पर्याय दिला जायचा. राज्याच्या विविध भागांत अधिकाऱ्यांची पदे भरली जावीत, हा या मागील उद्देश असला तरी तो तितकासा सफल झाला नाही. निवड झालेले बहुतेक अधिकारी पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, नाशिक भागातील असतात आणि ते पुन्हा याच भागाचा पर्याय द्यायचे. या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर आता विभागीय पर्यायाची पद्धत बंद केली जाईल आणि पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या विभागांमध्ये ती भरण्याचे लक्ष्य असेल. त्याचा सर्वाधिक फायदा विदर्भ आणि त्या खालोखाल मराठवाड्याला होणार आहे. फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर प्रत्येक मंत्री कार्यालयात सामान्य प्रशासन विभागाकडून तात्पुरते कर्मचारी पुरविण्यात आले. नंतर मंत्री आस्थापनेवरील सर्व पदे भरण्यात आली तरी तात्पुरते म्हणून गेलेले कर्मचारी मंत्र्यांच्या कार्यालयातच ठाण मांडून बसले आहेत. त्यांना मूळ विभागात पाठविण्याचे धाडस सामान्य प्रशासन विभाग दाखवत नाही. निवृत्तीच्या वयाची केवळ अफवाचराज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्यात येणार असल्याचा व्हॉट्सअ‍ॅप मॅसेज सध्या सगळीकडे फिरतोय. शासनाचा असा तूर्त कुठलाही विचार नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.राज्यात विविध विभागांमध्ये रिक्त पदांपैकी ५० टक्क्यांहून अधिक रिक्त पदे विदर्भातील मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अलीकडे मोठ्या प्रमाणात विदर्भात बदल्या करण्यात आल्या. त्या वेळी अनेक अधिकाऱ्यांनी आमचा विभागीय संवर्ग नागपूर वा अमरावती नाही, असा उद्दामपणा केला होता. आता विभागीय संवर्गच रद्द होणार असल्याने त्यांना निमूटपणे राज्यात कुठेही जावे लागणार आहे.