शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकू

By admin | Updated: August 15, 2015 01:36 IST

सहकार टिकल्याशिवाय ग्रामीण भागाचा विकास होणार नाही. सहकार क्षेत्र निकोप व्हावे म्हणून राज्य सरकार कडक धोरण राबविणार आहे. सहकारात गैरकारभार, भ्रष्टाचार, करणाऱ्यांना

कऱ्हाड : सहकार टिकल्याशिवाय ग्रामीण भागाचा विकास होणार नाही. सहकार क्षेत्र निकोप व्हावे म्हणून राज्य सरकार कडक धोरण राबविणार आहे. सहकारात गैरकारभार, भ्रष्टाचार, करणाऱ्यांना तुरूंगात टाकल्याशिवाय याला शिस्त लागणार नाही, असे प्रतिपादन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.कऱ्हाड येथे आयोजित सहकार मेळाव्यात सहकारमंत्री पाटील बोलत होते. ते म्हणाले, सहकार कायद्यात मध्यंतरी केलेले बदल घाईगडबडीत केले आहेत. त्यात अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे त्याचा अभ्यास सुरू असून लवकरच सहकार कायद्यात आवश्यक असणारे नवे बदल राज्य सरकार करणार आहे.राज्यात आज अनेक संस्था चांगला आदर्श घालून देत आहेत. पण एक लाखाहून अधिक सहकारी संस्थांची फक्त उपनिबंधक कार्यालयात नोंद दिसते. प्रत्यक्षात काम मात्र दिसत नाही. अशा ‘पिशवी’तील संस्थांचा लवकरच शोध घेत असून, त्या बंद करणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी) शंभर कर्मचाऱ्यांना केले बडतर्फ सहकार क्षेत्रात गैरकारभार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाते. पण पाठीमागच्या सरकारने अशा अनेक कर्मचाऱ्यांच्या चौकशी फाईलींवर कोणताच निर्णय न घेता सही करणे टाळले होते. पण मी सहकार मंत्री झाल्यानंतर अशा शंभरहून अधिक फाईलवर सह्या करून संबंधित कर्मचारी बडतर्फ केले आहेत, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले. पतसंस्थांतील ठेवींना संरक्षणराज्यात सहकारी पतसंस्थांचे जाळे मोठे आहे, पण तेथे ठेवी ठेवणाऱ्या ठेवीदारांना ठेवींबाबत संरक्षण दिसत नाही. सहकार विभाग याचा बारकाईने अभ्यास करीत असून लवकरच पतसंस्थांतील ठेवींना संरक्षण देईल, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.