शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

प्रेक्षकांनाच काय ते ठरवू द्या !

By admin | Updated: June 11, 2016 06:30 IST

प्रेक्षक प्रगल्भ आहेत. त्यामुळे एखादा चित्रपट चांगला की वाईट हे त्यांनाच ठरवू देत, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने ‘उडता पंजाब’वरून सेन्सॉर बोर्डाला फटकारले

मुंबई : सेन्सॉर बोर्डाचे काम चित्रपटांना प्रमाणपत्र देण्याचे आहे, कात्री लावण्याचे नाही. सिनेमागृहात जाणारे प्रेक्षक प्रगल्भ आहेत. त्यामुळे एखादा चित्रपट चांगला की वाईट हे त्यांनाच ठरवू देत, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने ‘उडता पंजाब’वरून सेन्सॉर बोर्डाला फटकारले. या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबतचा निर्णय आता सोमवारी होणार आहे. ‘उडता पंजाब’ चित्रपटातील ८९ दृश्यांना कात्री लावत चित्रपटाच्या नावातील ‘पंजाब’ हा शब्द पंजाब राज्याची बदनामी करणारा आहे. त्यामुळे तो काढून टाकण्याची सूचना सेन्सॉर बोर्डाने केली होती. या निर्णयाला चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सेन्सॉर बोर्डाने टोकाची भूमिका घेऊ नये, नवे प्रयोग करू द्यावेत. हा चित्रपट ड्रग्जला प्रसिद्धी देत आहे असे वाटत असेल, तर या चित्रपटाला प्रमाणपत्र देण्याऐवजी प्रदर्शित करण्याची परवानगीच देऊ नका. उलट तुम्हीच (सेन्सॉर बोर्ड) या चित्रपटाला प्रसिद्धी देत आहात, असे उच्च न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाला खडसावले. चित्रपटाच्या नावातून ‘पंजाब’चा उल्लेख वगळण्याच्या सूचनेवरही न्यायालयाने संताप व्यक्त केला. पंजाब हाच या चित्रपटाचा मूळ गाभा आहे. एखादे स्थळ अथवा व्यक्तीविषयी चित्रपट असेल तर त्या व्यक्तीचा आणि जागेचा उल्लेख चित्रपटातून कसा वगळता येईल? ‘उडता पंजाब’मधील शिवराळ संवाद काढण्यात यावेत, अशीही सूचना सेन्सॉर बोर्डाने केली आहे. त्यावर न्यायालयाने म्हटले की, शिवराळ भाषा वापरल्याने कोणताही चित्रपट यशस्वी होत नाही. आताची पिढी सुजाण आहे. सिनेमात एखाद्या गोष्टीचा अतिरेक असल्यास प्रेक्षक आपोआप कंटाळतात. सध्याच्या काळातील चित्रपट विषय आणि संहितेवर चालतात. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाने टोकाची भूमिका न घेता ते प्रेक्षकांवर सोडावे, असे उच्च न्यायालयाने सांगितले. 

‘बंजर’ आणि ‘कंजर’ ला आक्षेपसेन्सॉर बोर्डाच्या वकिलांनी चित्रपटातील ‘जमीन बंजर तो औलाद कंजर’ या वाक्याला आक्षेप घेतला. त्यांच्या मते, पंजाब कृषिप्रधान असताना त्याचा उल्लेख बंजर असा करणे योग्य होणार नाही. शिवाय पंजाब हे अमली पदार्थाचे केंद्र असल्याचे दाखविण्यात आल्याने राज्याची बदनामी होते, असे वकिलांनी सांगितले. त्यावर न्यायालयाने बोर्डाच्या वकिलांना चांगलेच फैलावर घेतले. चित्रपटात चुकीच्या गोष्टी दाखविण्यात आल्या असतील, तर प्रेक्षकांना त्या आवडणार नाहीत. त्यामुळे त्यांनाच ठरवू देत, तुम्ही कशाला उगीच चिंता करता? सेन्सॉर बोर्ड आणि याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद शुक्रवारी संपल्याने उच्च न्यायालयाने या याचिकेवरील निर्णय सोमवारपर्यंत राखून ठेवला. (प्रतिनिधी)

>काय आहे योजना?सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील एका गाण्यातील ‘चित्ता वे’ या शब्दावर आक्षेप घेतला आहे. परंतु याच गाण्याचा मुखडा असलेल्या ट्रेलरला मात्र मंजुरी दिली. बोर्डाच्या या विसंगतीवर दिग्दर्शकाच्या वकिलांनी बोट ठेवले.