शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
2
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
3
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
4
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
5
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
6
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
7
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
8
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
9
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
10
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
11
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
12
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
13
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
14
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
15
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
16
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
17
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
18
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
19
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
20
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात विद्यार्थी गिरविणार पुरातत्त्व शास्त्राचे धडे

By admin | Updated: June 5, 2017 02:43 IST

मुंबई विद्यापीठात येत्या शैक्षणिक वर्षापासून पुरातत्त्व शास्त्राचे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विद्यापीठात येत्या शैक्षणिक वर्षापासून पुरातत्त्व शास्त्राचे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. ३१ मे रोजी पार पडलेल्या विद्वत परिषदेने या प्रस्तावाला मान्यता दिली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून आता विद्यार्थ्यांना ज्ञानाचे नवे दालन मुंबई विद्यापीठाने खुले करून दिले आहे आणि लवकरच आता विद्यापीठात पुरातत्त्वशास्त्र विभाग सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी शुक्रवारी केली. देशमुख यांनी बहि:शाल विभागाने घेतलेल्या या पुढाकाराबद्दल विभागप्रमुख डॉ. मुग्धा कर्णिक यांचे अभिनंदन करत या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. मुंबई विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन वर्षीय पूर्णवेळ पुरातत्त्व अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षांपासून सुरू होत असल्याचा विशेष आनंद होत असून ही नक्कीच भूषणावह बाब असून पुरातत्त्व अभ्यासक्रमाच्या क्षेत्रात नक्कीच उल्लेखनीय बाब असल्याचे देशमुख यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठाचे माजी विद्यार्थी म्हणून व पुरातत्त्व शास्त्रातील विशेषज्ञ म्हणून ख्याती प्राप्त असलेले प्रा. डॉ. संकालिया यांचा पुरातत्त्व शास्त्रातील कार्याबद्दल विशेष गौरव होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. विद्यापीठ अनुदान आयोग आणि महाराष्ट्र शासनाच्या मदतीने येत्या नजीकच्या काळात या विभागाची स्वतंत्र रचना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभागामार्फत २००६-०७ साली या अभ्यासक्रमाची मुहूर्तमेढ रोवत विभागामार्फत ‘सर्टिफिकेट कोर्स’ म्हणून या अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. या अभ्यासक्रमाची सुरुवात ‘वीकेण्ड कोर्स’ म्हणून झाली. यानंतर हळूहळू अभ्यासक्रमाची पाळेमुळे विस्तारित होत गेली आणि आज प्रत्यक्षात हा अभ्यासक्रम पूर्णवेळ दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम म्हणून विद्यापीठात सुरू होत असल्याचा विशेष आनंद होत असल्याचे विभागाच्या संचालिका डॉ. मुग्धा कर्णिक यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या या सर्टिफिकेट अभ्यासक्रमानंतर पुढील पदवीचे शिक्षण म्हणून विद्यार्थी एक तर डेक्कन कॉलेज किंवा विदेशात जाऊन शिक्षण घ्यायचे, त्यामुळे या अभ्यासक्रमाची वाढती मागणी लक्षात घेता हा अभ्यासक्रम विद्यापीठातच सुरू व्हावा या दृष्टिकोनातून हा अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षापासून सुरू होत असल्याचे त्यांनी सांगितले. या दोन वर्षीय पूर्णवेळ अभ्यासक्रमासाठी ६० प्रवेशित विद्यार्थीसंख्या असून एकूण ४ सत्रांत या अभ्यासक्रमाची मांडणी करण्यात आली आहे. १५ जून २०१७ पासून या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू केली जाणार आहे.