शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

एसटीकडे चार वर्षांत १६ कोटी प्रवाशांची पाठ

By admin | Updated: May 17, 2016 05:41 IST

गेल्या चार वर्षांत १६ कोटी २७ लाख प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवल्याचे समोर आले

मुंबई : प्रवासी संख्या वाढविण्याबरोबरच उत्पन्न वाढीसाठी एसटी महामंडळाकडून प्रयत्न केले जात असतानाच गेल्या चार वर्षांत १६ कोटी २७ लाख प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. या कालावधीत ५१४ नव्या बसेस ताफ्यात दाखल झाल्या आहेत. मोडकळीस आलेल्या बसेस, बस आणि स्थानकांत असलेली अस्वच्छता यामुळे प्रवासी संख्या कमी झाल्याचे एसटीचे अधिकारीच सांगतात. याचा परिणाम प्रवासी संख्या आणि उत्पन्नावर होत आहे. अवैध वाहतुकीचाही मोठा फटका महामंडळाला बसत आहे. अवैध वाहतुकीमुळे तब्बल ७ हजार कोटी रुपयांचे उत्पन्नही बुडत आहे. एसटीची प्रवासीसंख्या २0१२-१३मध्ये २६१ कोटी ३७ लाख होती. हीच संख्या २0१५-१६मध्ये २४५ कोटी १0 लाख झाली. जवळपास १६ कोटी २७ लाख प्रवासी कमी झाले आहेत. एसटी महामंडळाला हा सर्वांत मोठा फटका बसला असून, त्यामुळे उत्पन्नही कमी झाले आहे. नवीन गाड्या वाढविण्यावरही भर दिल्याचे दिसत नाही. महामंडळाच्या ताफ्यात २0१२-१३ साली १७ हजार ४९७ बस होत्या. २0१३-१४मध्ये ५५८ बसची भर पडली. त्यानंतरच्या वर्षात ९८ बसेस कमी झाल्या. २0१५-१६मध्ये ५४ बसची भर पडली. आता एसटीच्या ताफ्यातील बसची संख्या ही १८ हजार ११ आहे. ताफ्यात गेल्या चार वर्षांत अवघ्या ५१४ नव्या बस दाखल झाल्या आहेत. एसटी महामंडळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटीच्या बस ८ हजार किमी एवढ्या धावल्या की, सेवेतून बाहेर काढल्या जातात. वर्षाला साधारपणे ३ हजार बसेस मोडीत काढल्या जातात आणि तेवढ्याच ताफ्यात दाखल करून घेणे आवश्यक असते. मात्र हे प्रमाण पूर्ण केले जात नसल्यानेच ही परिस्थिती ओढावली आहे.