शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

एसटीकडे चार वर्षांत १६ कोटी प्रवाशांची पाठ

By admin | Updated: May 17, 2016 05:41 IST

गेल्या चार वर्षांत १६ कोटी २७ लाख प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवल्याचे समोर आले

मुंबई : प्रवासी संख्या वाढविण्याबरोबरच उत्पन्न वाढीसाठी एसटी महामंडळाकडून प्रयत्न केले जात असतानाच गेल्या चार वर्षांत १६ कोटी २७ लाख प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. या कालावधीत ५१४ नव्या बसेस ताफ्यात दाखल झाल्या आहेत. मोडकळीस आलेल्या बसेस, बस आणि स्थानकांत असलेली अस्वच्छता यामुळे प्रवासी संख्या कमी झाल्याचे एसटीचे अधिकारीच सांगतात. याचा परिणाम प्रवासी संख्या आणि उत्पन्नावर होत आहे. अवैध वाहतुकीचाही मोठा फटका महामंडळाला बसत आहे. अवैध वाहतुकीमुळे तब्बल ७ हजार कोटी रुपयांचे उत्पन्नही बुडत आहे. एसटीची प्रवासीसंख्या २0१२-१३मध्ये २६१ कोटी ३७ लाख होती. हीच संख्या २0१५-१६मध्ये २४५ कोटी १0 लाख झाली. जवळपास १६ कोटी २७ लाख प्रवासी कमी झाले आहेत. एसटी महामंडळाला हा सर्वांत मोठा फटका बसला असून, त्यामुळे उत्पन्नही कमी झाले आहे. नवीन गाड्या वाढविण्यावरही भर दिल्याचे दिसत नाही. महामंडळाच्या ताफ्यात २0१२-१३ साली १७ हजार ४९७ बस होत्या. २0१३-१४मध्ये ५५८ बसची भर पडली. त्यानंतरच्या वर्षात ९८ बसेस कमी झाल्या. २0१५-१६मध्ये ५४ बसची भर पडली. आता एसटीच्या ताफ्यातील बसची संख्या ही १८ हजार ११ आहे. ताफ्यात गेल्या चार वर्षांत अवघ्या ५१४ नव्या बस दाखल झाल्या आहेत. एसटी महामंडळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटीच्या बस ८ हजार किमी एवढ्या धावल्या की, सेवेतून बाहेर काढल्या जातात. वर्षाला साधारपणे ३ हजार बसेस मोडीत काढल्या जातात आणि तेवढ्याच ताफ्यात दाखल करून घेणे आवश्यक असते. मात्र हे प्रमाण पूर्ण केले जात नसल्यानेच ही परिस्थिती ओढावली आहे.