शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! वरळी डोमच्या बाहेर तुफान गर्दी, अनेक नेते प्रवेशद्वारावरच अडकले
2
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
3
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
4
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
5
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
6
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
7
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
8
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
9
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
10
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
11
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
12
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
13
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
14
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
15
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
16
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
17
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
18
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
19
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
20
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी

डावे, उजवे आणि मधले!

By admin | Updated: August 30, 2015 02:02 IST

गेला बाजार ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारावरून प्रबोधनाची उच्च परंपरा वगैरे लाभलेल्या महाराष्ट्रात केवढी वैचारिक घुसळण झाली! चखलंब्यापासून पुणतांब्यापर्यंत आणि पुण्यनगरीपासून

(तिसरी बाजू)

-  नंदकिशोर पाटील 

(लेखक हे लोकमतचे कार्यकारी संपादक आहेत.)गेला बाजार ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारावरून प्रबोधनाची उच्च परंपरा वगैरे लाभलेल्या महाराष्ट्रात केवढी वैचारिक घुसळण झाली! चखलंब्यापासून पुणतांब्यापर्यंत आणि पुण्यनगरीपासून महानगरांपर्यंत घोळक्याघोळक्यांनी बौद्धिक रुदन झालं. डावे-उजवे, आतले-बाहेरचे, पुरोगामी-प्रतिगामी, उर्ध्वगामी आणि अर्ध्वगामी अशा साऱ्यांनी कुंभपर्वातील या मांदियाळीत डुबकी मारून अभिव्यक्तीचे पुण्य पदरी पाडून घेतले. काहींनी आपली इयत्ता पाजळत ऐपतीनुसार या वणव्यात जातीय वंगण ओतून विषय धडधडत राहील याची पुरती काळजी घेतली. वादाचा विषयच मुळी अत्यंतिक ज्वलनशील असल्याने पोळी भाजण्यासाठी चालून आलेली संधी कोणी दवडली नाही, हे बरीक बरे झाले. जर ती दवडली गेली असती तर तो करंटेपणाच ठरला असता. पण तेवढी सावधानता आणि समयसूचकता आपल्या अंगी असतेच असते! त्यामुळे काय की हल्ली कोणताच वाद वाया जात नाही. खरं म्हणजे वादीविरुद्ध प्रतिवादी असा सरळ सामना असताना त्यात महाजनवादी, बहुजनवादी, मार्क्सवादी, आंबेडकरवादी, समाजवादी... असे सगळे इझमवादी घुसल्याने वादाचा पुरता इस्कोट झाला. पण बुद्धिभेदाचे आणखी एक रिंगण पूर्ण झाले, हेही नसे थोडके.बळवंत ऊर्फ बाळासाहेब पुरंदरे यांना शासनाने पुरस्कृत करावे की करू नये, यावरून समस्त मराठी जणांत उभे तट पडावेत, हा गनिमी कावा ज्यांनी कोणी आखला असेल त्यांच्या सवाईपणाला कुर्निसातच केला पाहिजे. कावेबाज आणि छावेबाज यांच्यात प्रासादिक लढाईला जुंपून, दोहोंपैकी कोणीही जिंकले तरी आपला झेंडा शाबूत ठेवण्याची खेळी काही औरच म्हटली पाहिजे. अशा कलागतींसाठी अंगी वेगळे कौशल्य असावे लागते. काहींना ही कला उपजतच अवगत असते. पण अशा खेळाचे डावपेच माहिती नसल्याने फसगत होते ती आपली. त्यांचे झेंडे उभेच.या वादात एक नवी समता आणि समरसताही दिसून आली. एरवी ऊठसूठ ब्राह्मणांवर तोंडसुख घेणारे पळीभर पुण्य पदरी पाडून घेण्यासाठी धडपडताना दिसले, तर काही जण छावणीच्या चिंतेमुळे तापून गेले होते. खरं तर असा ऐतिहासिक ऐवज आणि सावज हाती घावल्यानंतर अस्मितांचे भाले-बरचे, लेखण्या परजणारच. विषयाची खोली लक्षात घेता, उत्खननाला भरपूर वाव. त्यामुळं ज्याच्या हाती कुदळ, तो संशोधक बनून जमेल तेवढं खणून गेला. मोजायचं कोणालाच नव्हतं, फक्त खड्डा खोदण्याशी मतलब. साहित्यिकांचं बरं असतं. एकमेकांना ते चांगलं जोखून असतात. कोणी कितीही ‘पॉप्युलर’ असले तरी दुसऱ्यांना ते कद्यपि ‘मौज’त नाहीत! ‘पानिपत’कारांना नेमाडे साहित्यातील दशहतवादी वाटतात, तर नेमाडेबुवांच्या लेखी खांडेकर, अत्रे, करंदीकर साहित्यिक नसतात. जुने हिशेब कोणी कुठेही चुकते करतं!एक बरं झालं. चॅनेल्स नि वर्तमानपत्रांमधून काही दिवस तरी त्याच त्या रटाळ बातम्यांऐवजी ऐतिहासिक, सामाजिक, वर्गीय अशा विषयांवर ‘बखर’दार चर्चा झडल्या. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, टिष्ट्वटर यासारख्या सोशल मीडियावर आपापल्या वकुबानुसार प्रत्येकांनी थॉट्स शेअरिंग केलं. त्यातही बरचसं फॉरवर्डेड, तरी स्वत:चं म्हणून खपवलेलं. विचारतंय कोण? कल्ला होण्याशी मतलब! पण या वादात जे कोणत्याच बाजूचे नव्हते, धड इकडचे ना तिकडचे, त्यांचं काय? प्रश्न वेडगळ असला तरी उच्चारायला हवा. कारण टीआरपीच्या जमान्यात तुम्हाला मत नसून कसं चालेल? डावं असो की उजवं, पण मत हवं! काठावर राहाल तर गुदमरून जाल. मधल्यांचा नेहमीच कोंडमारा होतो. रस्त्यांवरून चालताना अपघात होऊ नये, म्हणून डावीकडून चालायचं आणि घड्याळाचे काटे डावीकडून उजवीकडे फिरतात म्हणून उजवा विचार करायचा, अशी कसरत आपण करतोच ना; मग झालं तर! कालचक्र उजवीकडं झुलकलं असेल तर सरळमार्गी राहून कसं चालेल? ‘डावखुऱ्यांनीच घडविला इतिहास’ असला मजकूर वाचून डावीकडे झुकाल तर कपाळमोक्ष करून घ्याल. बाकी, ग्लोबल वॉर्मिंगमुळं गरमी आणि गुर्मी कधी वाढेल याचा नेम नाही. तेव्हा तुम्ही पंख्याखाली बसलं पाहिजे!ता. क. गेले काही दिवस कसे मंतरलेले होते. विद्वजणांची चर्चा, वाद-प्रतिवाद असं सगळं बौद्धिक मंथन सुरू असताना मध्येच नापिकी आणि कर्जबाजारीमुळे काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. लोक अन्नपाण्याविना नव्हे, तर वैचारिक उणेपण आले की मरतात, हा सिद्धान्त आहे. त्यामुळे सुज्ञांनी त्या आत्महत्यांकडे दुर्लक्ष केलं, ते बरंच झालं म्हणायचं !