शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

डावे, उजवे आणि मधले!

By admin | Updated: August 30, 2015 02:02 IST

गेला बाजार ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारावरून प्रबोधनाची उच्च परंपरा वगैरे लाभलेल्या महाराष्ट्रात केवढी वैचारिक घुसळण झाली! चखलंब्यापासून पुणतांब्यापर्यंत आणि पुण्यनगरीपासून

(तिसरी बाजू)

-  नंदकिशोर पाटील 

(लेखक हे लोकमतचे कार्यकारी संपादक आहेत.)गेला बाजार ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारावरून प्रबोधनाची उच्च परंपरा वगैरे लाभलेल्या महाराष्ट्रात केवढी वैचारिक घुसळण झाली! चखलंब्यापासून पुणतांब्यापर्यंत आणि पुण्यनगरीपासून महानगरांपर्यंत घोळक्याघोळक्यांनी बौद्धिक रुदन झालं. डावे-उजवे, आतले-बाहेरचे, पुरोगामी-प्रतिगामी, उर्ध्वगामी आणि अर्ध्वगामी अशा साऱ्यांनी कुंभपर्वातील या मांदियाळीत डुबकी मारून अभिव्यक्तीचे पुण्य पदरी पाडून घेतले. काहींनी आपली इयत्ता पाजळत ऐपतीनुसार या वणव्यात जातीय वंगण ओतून विषय धडधडत राहील याची पुरती काळजी घेतली. वादाचा विषयच मुळी अत्यंतिक ज्वलनशील असल्याने पोळी भाजण्यासाठी चालून आलेली संधी कोणी दवडली नाही, हे बरीक बरे झाले. जर ती दवडली गेली असती तर तो करंटेपणाच ठरला असता. पण तेवढी सावधानता आणि समयसूचकता आपल्या अंगी असतेच असते! त्यामुळे काय की हल्ली कोणताच वाद वाया जात नाही. खरं म्हणजे वादीविरुद्ध प्रतिवादी असा सरळ सामना असताना त्यात महाजनवादी, बहुजनवादी, मार्क्सवादी, आंबेडकरवादी, समाजवादी... असे सगळे इझमवादी घुसल्याने वादाचा पुरता इस्कोट झाला. पण बुद्धिभेदाचे आणखी एक रिंगण पूर्ण झाले, हेही नसे थोडके.बळवंत ऊर्फ बाळासाहेब पुरंदरे यांना शासनाने पुरस्कृत करावे की करू नये, यावरून समस्त मराठी जणांत उभे तट पडावेत, हा गनिमी कावा ज्यांनी कोणी आखला असेल त्यांच्या सवाईपणाला कुर्निसातच केला पाहिजे. कावेबाज आणि छावेबाज यांच्यात प्रासादिक लढाईला जुंपून, दोहोंपैकी कोणीही जिंकले तरी आपला झेंडा शाबूत ठेवण्याची खेळी काही औरच म्हटली पाहिजे. अशा कलागतींसाठी अंगी वेगळे कौशल्य असावे लागते. काहींना ही कला उपजतच अवगत असते. पण अशा खेळाचे डावपेच माहिती नसल्याने फसगत होते ती आपली. त्यांचे झेंडे उभेच.या वादात एक नवी समता आणि समरसताही दिसून आली. एरवी ऊठसूठ ब्राह्मणांवर तोंडसुख घेणारे पळीभर पुण्य पदरी पाडून घेण्यासाठी धडपडताना दिसले, तर काही जण छावणीच्या चिंतेमुळे तापून गेले होते. खरं तर असा ऐतिहासिक ऐवज आणि सावज हाती घावल्यानंतर अस्मितांचे भाले-बरचे, लेखण्या परजणारच. विषयाची खोली लक्षात घेता, उत्खननाला भरपूर वाव. त्यामुळं ज्याच्या हाती कुदळ, तो संशोधक बनून जमेल तेवढं खणून गेला. मोजायचं कोणालाच नव्हतं, फक्त खड्डा खोदण्याशी मतलब. साहित्यिकांचं बरं असतं. एकमेकांना ते चांगलं जोखून असतात. कोणी कितीही ‘पॉप्युलर’ असले तरी दुसऱ्यांना ते कद्यपि ‘मौज’त नाहीत! ‘पानिपत’कारांना नेमाडे साहित्यातील दशहतवादी वाटतात, तर नेमाडेबुवांच्या लेखी खांडेकर, अत्रे, करंदीकर साहित्यिक नसतात. जुने हिशेब कोणी कुठेही चुकते करतं!एक बरं झालं. चॅनेल्स नि वर्तमानपत्रांमधून काही दिवस तरी त्याच त्या रटाळ बातम्यांऐवजी ऐतिहासिक, सामाजिक, वर्गीय अशा विषयांवर ‘बखर’दार चर्चा झडल्या. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, टिष्ट्वटर यासारख्या सोशल मीडियावर आपापल्या वकुबानुसार प्रत्येकांनी थॉट्स शेअरिंग केलं. त्यातही बरचसं फॉरवर्डेड, तरी स्वत:चं म्हणून खपवलेलं. विचारतंय कोण? कल्ला होण्याशी मतलब! पण या वादात जे कोणत्याच बाजूचे नव्हते, धड इकडचे ना तिकडचे, त्यांचं काय? प्रश्न वेडगळ असला तरी उच्चारायला हवा. कारण टीआरपीच्या जमान्यात तुम्हाला मत नसून कसं चालेल? डावं असो की उजवं, पण मत हवं! काठावर राहाल तर गुदमरून जाल. मधल्यांचा नेहमीच कोंडमारा होतो. रस्त्यांवरून चालताना अपघात होऊ नये, म्हणून डावीकडून चालायचं आणि घड्याळाचे काटे डावीकडून उजवीकडे फिरतात म्हणून उजवा विचार करायचा, अशी कसरत आपण करतोच ना; मग झालं तर! कालचक्र उजवीकडं झुलकलं असेल तर सरळमार्गी राहून कसं चालेल? ‘डावखुऱ्यांनीच घडविला इतिहास’ असला मजकूर वाचून डावीकडे झुकाल तर कपाळमोक्ष करून घ्याल. बाकी, ग्लोबल वॉर्मिंगमुळं गरमी आणि गुर्मी कधी वाढेल याचा नेम नाही. तेव्हा तुम्ही पंख्याखाली बसलं पाहिजे!ता. क. गेले काही दिवस कसे मंतरलेले होते. विद्वजणांची चर्चा, वाद-प्रतिवाद असं सगळं बौद्धिक मंथन सुरू असताना मध्येच नापिकी आणि कर्जबाजारीमुळे काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. लोक अन्नपाण्याविना नव्हे, तर वैचारिक उणेपण आले की मरतात, हा सिद्धान्त आहे. त्यामुळे सुज्ञांनी त्या आत्महत्यांकडे दुर्लक्ष केलं, ते बरंच झालं म्हणायचं !