शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे साहित्यिकांचे लक्ष

By admin | Updated: February 5, 2017 10:54 IST

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत साहित्य संमेलनाचा समारोप होतो आहे.

ऑनलाइन लोकमत

पु. भा. भावे. साहित्यनगरी (डोंबिवली), दि. 5 - भाजपा-राष्ट्रवादीच्या जवळिकीची फारशी चर्चा होऊ नये, यासाठी अधिवेशनाला गैरहजर राहणारे शरद पवार, शिवसेना-भाजपातील राजकीय मतभेदांमुळे मुख्यमंत्र्यांसोबत व्यासपीठावर येणे टाळणारे पालकमंत्री एकनाथ शिंदे अशा उद्घाटन सोहळ्यातील राजकीय अनुपस्थितीनंतर आज (रविवारी) शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत साहित्य संमेलनाचा समारोप होतो आहे. त्यांच्यासोबत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडेही असतील. मुंबई, ठाण्यासह विविध महापालिका निवडणुकांच्या धामधुमीत उद्धव ठाकरे संमेलनाला कसा वेळ देतात आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात कमी पडलेल्या आपल्याच राज्य सरकारचा कसा समाचार घेतात, त्याकडे साहित्य वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मराठी भाषेवर इंग्रजीचे होणारे अतिक्रमण, बंद पडणाऱ्या मराठी शाळा हा शिवसेनेच्या अस्मितेचा विषय. पण साहित्य संमेलनाचे अध्यश्र डॉ. अक्षयकुमार काळे यांनी मराठीसोबतच हिंदी आणि इंग्रजीशी जुळवून घ्या, असा सल्ला आपल्या अध्यक्षीय भाषणातून दिला आहे. या त्रिभाषा सूत्राला ठाकरे पसंती देतात का, तेही पाहणे महत्त्वाचे आहे. राम गणेश गडकरी यांचा पुतळा फोडून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध ते कसा करतात त्याकडे राजकीय मंडळींचे लक्ष आहे. मावळते संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी नथुरामी प्रवृत्ती मला गोळ्या घालू शकतात आणि तशा त्या घातल्या तर त्याला राज्य सरकार जबाबदार असेल, असे विधान मुख्यमंत्र्यांच्या आणि राज्याच्या गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत केले होते. त्यावर उद्धव काय भूमिका घेतात ते महत्त्वाचे आहे. कारण त्यांचेच उपनेते असलेले शरद पोंक्षे सध्या सर्वत्र नथुरामसंदर्भातील नाटकाचे प्रयोग करत आणि व्याख्याने देत आहेत.मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी वारंवार केली आहे. पण ती प्रत्यक्षात आलेली नाही. त्यामुळे त्यावर ते नव्याने कोणते आश्वासन देतात, हा मराठी भाषाप्रेमींच्या औत्सुक्याचा विषय आहे. शिवाय बंद पडणाऱ्या मराठी भाषा, मराठीशी जोडून असलेल्या अनेक संस्थांची रिक्त असलेली पदे, एकंदर भाषा व्यवहाराला राज्य सरकारचे प्रोत्साहन यावरील त्यांचे भाषण महत्त्वाचे ठरणार आहे. राम गणेश गडकरी यांचा पुतळा पुण्यात फोडल्याबद्दल संभाजी ब्रिगेडचा निषेध करणारा ठराव साहित्य संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात करावा, यासाठी मोहीम सुरू आहे. तसेच संमेलनाचे आयोजन करणाऱ्या आगरी युथ फोरमला 27 गावे कल्याण-डोंबिवली महापालिकेतून वेगळी करण्याचा ठराव व्हावा असे वाटते. ते ठराव होतात का हे संध्याकाळी पाच वाजता कळेल.