शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

तेजस एक्सप्रेसला कणकवलीत थांबा द्या: नितेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2017 21:54 IST

मुंबई येथील छत्रपती शिवाजी टर्मिनस ते गोवा (करमळी) दरम्यान धावणाऱ्या "तेजस एक्सप्रेसला" सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे थांबा द्यावा

ऑनलाइन लोकमत

कणकवली(सिंधुदुर्ग), दि. 23 - मुंबई येथील छत्रपती शिवाजी टर्मिनस ते गोवा (करमळी)  दरम्यान धावणाऱ्या "तेजस एक्सप्रेस"ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे थांबा द्यावा अशी मागणी एका पत्राद्वारे कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे.

या निवेदनात, भारतीय रेल्वेने पहिल्यांदाच मुंबई येथील छत्रपती शिवाजी टर्मिनस ते गोवा करमळी दरम्यान अतिशय वेगवान वातानुकूलित सुसज्ज अशी तेजस एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर सुरु केली आहे. त्याबद्दल आपले आभार मानतो. या एक्सप्रेसला दादर, ठाणे, पनवेल, रत्नागिरी आणि कुडाळ असे थांबे देण्यात आलेले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली रेल्वे स्थानकावरुन कोकण रेल्वेने मोठ्या प्रमाणात प्रवासी ये - जा करीत असतात. तेजस एक्सप्रेसला कणकवली रेल्वे स्थानकावर थांबा न दिल्याने सिंधुदुर्गातील कणकवली, देवगड, वैभववाडी आदी तालुक्यातील असंख्य गावातील रेल्वे प्रवाशांना या गाडीचा लाभ होणार नाही. त्यामुळे या प्रवाशांच्या सुविधेचा विचार करून कणकवली येथे या एक्सप्रेसला थांबा देण्यात यावा,असे म्हटले आहे.