शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

आघाडी पक्की, सरकार नक्की

By admin | Updated: September 13, 2014 04:53 IST

लोकशाही आघाडी सरकारने १५ वर्षांमध्ये केलेल्या अनेक विकासकामांमुळे मतदार पुन्हा एकदा आघाडीलाच संधी देतील

मुंबई : लोकशाही आघाडी सरकारने १५ वर्षांमध्ये केलेल्या अनेक विकासकामांमुळे मतदार पुन्हा एकदा आघाडीलाच संधी देतील, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक जाहीर होताच व्यक्त केला. काँग्रेस-राष्ट्रवादीची सन्मानाने आघाडी होईल, असे ते म्हणाले. निवडणूक आचारसंहिता लागू होताच घेतलेल्या पत्रपरिषदेत ते म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मिळालेले यश, लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतदानाची टक्केवारी, २००९मध्ये कोणी किती जागा लढविल्या, १९९९मध्ये आम्ही वेगळे लढलो तेव्हाची स्थिती अशा सगळ्या निकषांचा आधार आघाडीचा फॉर्म्यूला ठरविताना घेतला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आघाडी सरकारने गेल्या पाच वर्षांत लोकहिताचे घेतलेल्या अनेक निर्णयांच्या पार्श्वभूमीवर आता पुढील पाच वर्षांत महाराष्ट्राला जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी सक्षम करण्याचे आणि जनतेचे जीवन अधिक सुखकर करण्याचे आमचे उद्दिष्ट असून त्यासाठी जनतेचा कौल आघाडीला हवा आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. विधानसभेची निवडणूक लढणार का या प्रश्नात मुख्यमंत्री म्हणाले की, त्याबाबतची भूमिका आपण काँग्रेस श्रेष्ठींकडे कळविली आहे. श्रेष्ठीच काय तो निर्णय घेतील. (विशेष प्रतिनिधी)