शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

आघाडीला क्लीन चिट

By admin | Updated: April 11, 2015 04:15 IST

भाजपा-शिवसेनेच्या सरकारने आज गेल्या १० वर्षांतील आघाडी सरकारच्या आर्थिक कारभाराची श्वेतपत्रिका विधिमंडळात मांडताना कोणत्याही वित्तीय अनियमिततांवर बोट ठेवले नाही. तसेच, महसुली उत्पन्नातील वाढ

यदु जोशी, मुंबई -भाजपा-शिवसेनेच्या सरकारने आज गेल्या १० वर्षांतील आघाडी सरकारच्या आर्थिक कारभाराची श्वेतपत्रिका विधिमंडळात मांडताना कोणत्याही वित्तीय अनियमिततांवर बोट ठेवले नाही. तसेच, महसुली उत्पन्नातील वाढ इतर प्रगत राज्यांशी तुलना करता समतुल्य आणि समाधानकारक असल्याची पावतीही देऊन टाकली आहे!१९९९मध्ये युतीचे सरकार जाऊन आघाडीचे सरकार आल्यानंतर तत्कालीन वित्त मंत्री जयंत पाटील यांनी युती सरकारच्या कारभाराची चिरफाड करणारी श्वेतपत्रिका काढली होती. आज जाहीर झालेल्या श्वेतपत्रिकेत मात्र अशी कोणतीही चिरफाड दिसत नाही. मात्र, राज्याच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने नव्या सरकारचा भर कशावर राहील, हे अधोरेखित करण्यात आले आहे. श्वेतपत्रिकेत म्हटले आहे की, गेल्या १० वर्षांत राज्याच्या महसुली उत्पन्नाचे सकल उत्पादनाशी असलेले प्रमाण ९.९ टक्के ते १०.७ टक्के दरम्यान राहिले. तसेच राज्याचा महसूल वार्षिक १६ टक्के या दराने वाढला. या दोन्ही बाबी सर्वसाधारणपणे इतर प्रगत राज्यांशी तुलना करता समाधानकारक आहेत. राज्याच्या उत्पन्नात केंद्रीय साहाय्यक अनुदानाचा वाटा १२.९ टक्क्यांहून  १७ टक्के (११ हजार २०३ कोटींवरून ३० हजार ६५९ कोटी) इतका वाढला, असे नमूद करताना या काळात सत्तेत असलेल्या यूपीए सरकारचे एकप्रकारे कौतुकच केले आहे. राज्यावरील कर्ज २००४ मध्ये १ लाख ९ हजार १६७ कोटी रुपये होते. पुढील दहा वर्षांत ते ३ लाख २ हजार ५७८ कोटी रुपये इतके झाले. ही वाढ लक्षणीय असली तरी राज्याच्या उत्पन्नाच्या तुलनेत संचित कर्ज गेल्या दहा वर्षांत २६६ टक्क्यांवरून १६७.४ टक्के पर्यंत कमी झाले. दरवर्षीची निव्वळ राजकोषीय तूटसुद्धा राज्याच्या उत्पन्नाच्या तुलनेत (२००९-१० चा अपवाद वगळता) गेल्या पाच वर्षांत ३ टक्के मर्यादेच्या आत राहिली, असे श्वेतपत्रिकेत म्हटले आहे. राज्याच्या महसुलात झालेली वाढ समाधानकारक असली तरी महसुली खर्चातही त्याच प्रमाणात किंबहुना काहीशा जास्त दराने वाढ झाली आहे. परिणामी, राज्यास महसुली संतुलन टिकविता आलेली नाही, ही अत्यंत चिंतेची बाब असल्याची एकमेव थेट टीका श्वेतपत्रिकेत आहे. या शिवाय, गेल्या दहा वर्षांत घेतलेल्या १ लाख ९३ हजार ४११ कोटी रुपयांच्या कर्जापैकी १८ हजार ३०४ कोटी रुपये महसुली खर्चासाठी वापरण्यात आले. महसुली खर्च वाढल्याने भांडवली खर्च मर्यादित झाला. परिणामी, राज्याच्या अर्थव्यस्थेस चालना देणारी दीर्घकालिन टिकणारी मत्ता आवश्यक त्या प्रमाणात तयार करता आली नाही. साधने मर्यादित असली तरी राज्याच्या वार्षिक योजनांचे नियोजन मर्यादित ठेवले नाही, असा दोषारोपही करण्यात आला आहे.