शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

उमेदवारीसाठी नेत्यांचा वशिला बिनकामाचा

By admin | Updated: January 4, 2017 18:50 IST

आगामी महानगरपालिका निवडणूकांच्या तिकीटवाटपात गटातटाच्या राजकारणाला तिलांजली देण्यात येणार आहे. मुलाखतींदरम्यान 'मेरिट'च्या भरवशावरच इच्छुक उमेदवारांचे

योगेश पांडे/ ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 4 - आगामी महानगरपालिका निवडणूकांच्या तिकीटवाटपात गटातटाच्या राजकारणाला तिलांजली देण्यात येणार आहे. मुलाखतींदरम्यान 'मेरिट'च्या भरवशावरच इच्छुक उमेदवारांचे नाव तिकीटासाठी अंतिम करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे मनपा निवडणूकांत गटबाजीचा फटका बसू नये यासाठी शहर कॉंग्रेसकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. नेत्यांमधील आपापसातील वैचारिक मतभेदामुळे पक्षात गट निर्माण झाल्याचे दिसून येत असताना या धोरणाचा कितपत फायदा होईल, असा प्रश्न निर्माण होत आहे.आगामी महानगरपालिका निवडणूकांसाठी उमेदवार अंतिम करण्याच्या दिशेने कॉंग्रेसनेदेखील पावले उचलली आहेत. शहरातील ३८ प्रभागांसाठी पक्षाकडे अकराशेहून अधिक इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत.८ जानेवारीपासून इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. याअगोदर कुठे ना कुठे अमूक नेत्याच्या जवळचा उमेदवार किंवा तमूक गटाचा खास या ओळखीवर तिकीट अंतिम व्हायचे. नेत्यांकडून आपल्या उमेदवारासाठी विशेष शिफारसदेखील करण्यात यायची. अशा स्थितीत मुलाखतींना फारसे महत्त्व राहिले नव्हते व यातून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर निर्माण व्हायचा.यंदाच्या मनपा निवडणूकांत योग्य कार्यकर्त्यांनाच उमेदवारी देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिले होते. त्यानुसार शहर कॉंग्रेस कमिटीने  'मेरिट'चे धोरण अवलंबवायचे ठरविले. विशिष्ट गट किंवा नेत्याच्या जवळचा उमेदवार आहे, म्हणून तिकीट अंतिम होणार नाही. संबंधित उमेदवाराचे प्रभागातील काम, जनमानसातील प्रतिमा, कार्यकर्त्यांमधील वावर आणि मुलाखतींमधील एकूण कामगिरी या आधारावरच त्याच्या नावाची तिकीटासाठी शिफारस करण्यात येणार आहे. निवड समितीचे अध्यक्ष शहराध्यक्ष राहणार असून समितीत माजी खासदार, आमदार यांच्यासह २२ ते २४ जणांचा समावेश आहे.