शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

शेतीचे गणित मांडणारा नेता

By admin | Updated: December 13, 2015 01:27 IST

देशातील विस्कळीत असलेल्या शेतकऱ्यांना संघटित करीत हक्कांसाठी त्यांच्यामध्ये जागृती करण्याचे काम सर्वप्रथम शरद जोशी यांनी केले. शेतीमालाला दर किती मिळतो,

- सुभाष जोशी

देशातील विस्कळीत असलेल्या शेतकऱ्यांना संघटित करीत हक्कांसाठी त्यांच्यामध्ये जागृती करण्याचे काम सर्वप्रथम शरद जोशी यांनी केले. शेतीमालाला दर किती मिळतो, उत्पादन खर्च किती येतो, याचे गणितच शेतकऱ्यांना माहीत नव्हते. त्यांच्या जागृतीची चळवळ संपूर्ण देशात उभी करून त्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या हक्कांची जाणीव करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले. सरकारच्या शेतीविषयीच्या उदासीन धोरणाविरोधात सरकारला कोंडीत पकडण्याचे काम त्यांनी केले. ‘भारत’ व ‘इंडिया’ हे देश वेगळे कसे आहेत, हे दाखवून सरकारच्या डोळ्यांत त्यांनी अंजन घातले. शेतकऱ्यांची पिळवणूक कोणत्या मार्गाने सुरू आहे, याची शास्त्रशुद्ध मांडणी त्यांनी भाषणासह लेखणीतून केली. शेतकऱ्यांवरील अन्यायाला वाचा फोडण्याचे काम महात्मा जोतिराव फुले यांनी केले. त्यांच्यानंतर तेवढ्याच ताकदीचे नाव कोणाचे घ्यायचे झाले, तर ते शरद जोशी यांचेच घ्यावे लागेल. देशातील कोणत्याही प्रांतात शेतकरी अडचणीत असेल, तर तिथे धावून जाऊन मदतीचा हात पुढे करण्याची त्यांची पद्धत होती. तंबाखूचे आंदोलन चिघळल्यानंतर तितक्याच धैर्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणारे शरद जोशी हे एकमेव शेतकरी नेते होते. अस्मिता काय असते, हे दाखवून देण्याचे काम त्यांनी केले. सीमाभागातील शेतकऱ्यांमध्ये जागरूकता आणून त्यांच्या हक्कासाठी ते मैदानात उतरले. आयुष्यभर शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून त्यांनी काम केले. हे करीत असताना त्यांच्यावर अनेक हल्ले झाले, गुन्हे दाखल झाले, पण त्याची पर्वा न करता शेतकरी सुखी झाला पाहिजे, यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची त्यांच्याकडे उमेद होती. त्यांच्या जाण्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावरील छत्र हरपले असून, शेतकऱ्यांच्या आंदोलनात त्यांच्या नेतृत्वाची पोकळी सदैव जाणवत राहील.

(लेखक निपाणीचे माजी आमदार व शरद जोशी यांचे सहकारी आहेत.)