शहरं
Join us  
Trending Stories
1
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
2
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
3
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
4
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
5
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
6
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
7
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
8
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
9
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
10
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
11
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
12
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
13
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
14
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
15
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
16
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
17
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
18
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
19
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
20
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक

शेतीचे गणित मांडणारा नेता

By admin | Updated: December 13, 2015 01:27 IST

देशातील विस्कळीत असलेल्या शेतकऱ्यांना संघटित करीत हक्कांसाठी त्यांच्यामध्ये जागृती करण्याचे काम सर्वप्रथम शरद जोशी यांनी केले. शेतीमालाला दर किती मिळतो,

- सुभाष जोशी

देशातील विस्कळीत असलेल्या शेतकऱ्यांना संघटित करीत हक्कांसाठी त्यांच्यामध्ये जागृती करण्याचे काम सर्वप्रथम शरद जोशी यांनी केले. शेतीमालाला दर किती मिळतो, उत्पादन खर्च किती येतो, याचे गणितच शेतकऱ्यांना माहीत नव्हते. त्यांच्या जागृतीची चळवळ संपूर्ण देशात उभी करून त्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या हक्कांची जाणीव करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले. सरकारच्या शेतीविषयीच्या उदासीन धोरणाविरोधात सरकारला कोंडीत पकडण्याचे काम त्यांनी केले. ‘भारत’ व ‘इंडिया’ हे देश वेगळे कसे आहेत, हे दाखवून सरकारच्या डोळ्यांत त्यांनी अंजन घातले. शेतकऱ्यांची पिळवणूक कोणत्या मार्गाने सुरू आहे, याची शास्त्रशुद्ध मांडणी त्यांनी भाषणासह लेखणीतून केली. शेतकऱ्यांवरील अन्यायाला वाचा फोडण्याचे काम महात्मा जोतिराव फुले यांनी केले. त्यांच्यानंतर तेवढ्याच ताकदीचे नाव कोणाचे घ्यायचे झाले, तर ते शरद जोशी यांचेच घ्यावे लागेल. देशातील कोणत्याही प्रांतात शेतकरी अडचणीत असेल, तर तिथे धावून जाऊन मदतीचा हात पुढे करण्याची त्यांची पद्धत होती. तंबाखूचे आंदोलन चिघळल्यानंतर तितक्याच धैर्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणारे शरद जोशी हे एकमेव शेतकरी नेते होते. अस्मिता काय असते, हे दाखवून देण्याचे काम त्यांनी केले. सीमाभागातील शेतकऱ्यांमध्ये जागरूकता आणून त्यांच्या हक्कासाठी ते मैदानात उतरले. आयुष्यभर शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून त्यांनी काम केले. हे करीत असताना त्यांच्यावर अनेक हल्ले झाले, गुन्हे दाखल झाले, पण त्याची पर्वा न करता शेतकरी सुखी झाला पाहिजे, यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची त्यांच्याकडे उमेद होती. त्यांच्या जाण्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावरील छत्र हरपले असून, शेतकऱ्यांच्या आंदोलनात त्यांच्या नेतृत्वाची पोकळी सदैव जाणवत राहील.

(लेखक निपाणीचे माजी आमदार व शरद जोशी यांचे सहकारी आहेत.)