शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाही समृद्ध करणारा नेता गेला...

By admin | Updated: February 18, 2015 02:11 IST

अंजनी (ता. तासगाव) येथे आर. आर. पाटील यांच्यावर मंगळवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी झालेल्या शोकसभेत राज्यातील मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली.

मान्यवरांची आदरांजली : शोकसभेत जागवल्या आबांच्या आठवणीसांगली : अंजनी (ता. तासगाव) येथे आर. आर. पाटील यांच्यावर मंगळवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी झालेल्या शोकसभेत राज्यातील मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यांनी विधानसभेत, अधिवेशनात आजवर जी भाषणे केली, ती जपून ठेवण्यासारखी, राज्याला दिशा देणारी आहेत. अभ्यासू असतानाच, सर्वसामान्यांचा कळवळा असणारे ते नेते होते. आम्हाला त्यांनी खूप काही शिकविले. त्यांचा आवाज कधी सभागृहात किंवा निवडणुकांच्या भाषणात मोठा झाला असेल, तर तो केवळ सर्वसामान्य माणसांसाठीच. व्यक्तिगत प्रश्नांसाठी भांडताना त्यांना मी कधीही पाहिले नाही. माझ्याकडेही त्यांच्या अनेक आठवणी आहेत. आज त्या नजरेसमोर वारंवार येत आहेत. राष्ट्रवादीचे नेते, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार म्हणाले की, हे वय त्यांच्या जाण्याचे नव्हते. त्यांचे अकाली जाणे हे महाराष्ट्राला धक्का देणारे आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत त्यांच्यासारख्या नेत्याची राज्याला गरज होती. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर मी त्यांना या गोष्टीची कल्पनाही दिली होती. आजारावर ते मात करतील, अशी आशा होती. त्यांनी राबविलेल्या योजना राज्याच्या राजकीय, सामाजिक इतिहासात कायम स्मरणात राहतील. पक्षीय पदांपासून अगदी मोठ्या खात्याच्या मंत्रिपदापर्यंत ज्या-ज्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपविल्या, त्या त्यांनी समर्थपणे पेलल्या. प्रत्येक ठिकाणी काम करताना त्यांनी निष्ठा आणि वेगळेपणा दाखवून दिला. सामान्य माणसांसाठी, दुष्काळी भागासाठी सतत ते कार्यरत होते. म्हणून सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करण्याचा त्यांनी दिलेला आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्व राजकारण्यांनी वाटचाल केली, तरच ती खरी आदरांजली ठरेल. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले की, आबांच्या निधनाने राजकारणातील सामान्य माणसाचा आधार हरपला आहे. त्यांचे जीवन, राजकीय कारकीर्द एखाद्या दीपस्तंभासारखे आहे. एखादा मंत्री, एखादा नेता कसा असावा, याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, व्यक्तिगत भूमिका घेऊन ते कधी समोर आले नाहीत. प्रत्येकवेळी सामान्य माणसांच्या प्रश्नांसाठी ते भांडायचे. कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे म्हणाले की, विधानसभेतील आमदार, मंत्रीसुद्धा आर. आर. पाटील यांच्या भाषणाने प्रभावित होत असल्याचे मी पाहिले आहे. १९९६ नंतरच्या काळात ज्यावेळी विरोधी पक्षात ते काम करीत होते, त्यावेळी त्यांनी ज्या पद्धतीने सभागृहात आणि राज्यात सामान्यांच्या प्रश्नांबाबत आवाज उठविला, त्याचे चांगले परिणाम १९९९ च्या निवडणुकीत पहावयास मिळाले. त्यावेळेच्या परिवर्तनाला ते कारणीभूत होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. माजी मंत्री नारायण राणे म्हणाले की, आबांच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्यासारखा दुर्दैवी दिवस कोणता नाही. यावेळी शेकापचे आ.गणपतराव देशमुख, महाराष्ट्र एकीकरण समितीचे वसंतराव पाटील, माजी आमदार विलासराव शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले.आबांच्या अंत्यविधीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आवर्जून उपस्थित होते. लोकशाहीच्या पवित्र मंदिरात पवित्र माणसेच असली पाहिजेत, आबांचे चारित्र्य पवित्र होते, अशा शब्दात पुष्पसुमने वाहताना अण्णांनाही गहिवरून आले होते. गर्दीला शांततेचे आवाहन करताना स्मिता पाटील म्हणाल्या की, आजवर आबांवर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर या मतदारसंघातील जनतेने जे प्रेम दिले, ते प्रेम असेच कायम ठेवावे. आबा आपल्याला सोडून गेले असले तरी त्यांचे विचार, त्यांचे कार्य यांचे अस्तित्व आजही आहे. आबांचे विचार जपतानाच त्यांचे कार्य आपण पुढे नेण्यासाठी मदत केलीत, तर तीच खऱ्याअर्थाने त्यांना आदरांजली ठरेल. अंजनीच्या निवासस्थानी आबांचे पार्थिव पोहोचताच गावात एकच आक्रोश झाला. ‘आबा काय केलंसा हे?’, ‘आम्हासनी फसवून का गेलासा?’ असा हृदय पिळवटून टाकणारे सवाल उपस्थित करतानाच डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंच्या धारांमधून आपल्या लाडक्या नेत्याप्रती त्यांनी प्रेम व्यक्त केले. निवासस्थानापासून अंत्यसंस्काराच्या ठिकाणी पार्थिव जाईपर्यंत महिलांच्या डोळ्यांतील अश्रू थांबत नव्हते.